शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

मजुरांना घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला अपघात, एक ठार, ११ जण गंभीर; गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावरील घटना

By अंकुश गुंडावार | Updated: June 10, 2024 16:51 IST

मध्य प्रदेशातील लांजी येथून हैदराबाद जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स सुरू आहे. दररोज शेकडो प्रवासी या ट्रॅव्हल्सने प्रवास करतात. दरम्यान, हैदराबाद येथे कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करण्यासाठी मध्य प्रदेश राज्यातील अनेक मजुरांची ौहैदराबाद येथे ने-आण करण्यात येते.

गोरेगाव : हैदराबाद येथून मध्य प्रदेशातील लांजी येथे मजुरांना घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावरील मिलटोली गावाजवळ अपघात झाला. या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला, तर ११ जण गंभीर गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. १०) सकाळी ६ वाजता घडली. थानसिंग यादव (३०, रा. रेलवाडी, जि. बालाघाट) असे मृतक मजुराचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, मध्य प्रदेशातील लांजी येथून हैदराबाद जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स सुरू आहे. दररोज शेकडो प्रवासी या ट्रॅव्हल्सने प्रवास करतात. दरम्यान, हैदराबाद येथे कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करण्यासाठी मध्य प्रदेश राज्यातील अनेक मजुरांची ौहैदराबाद येथे ने-आण करण्यात येते. सोमवारी सकाळी हैदराबादवरून जवळपास ५० ते ६० प्रवाशांना घेऊन लांजी येथील पायल ट्रॅव्हल्स कंपनीची ट्रॅव्हल्स (क्रमांक एमपी १३-पी ७९९९) मध्य प्रदेशातील लांजीकडे जात असताना गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावर मिलटोलीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दरम्यान, रस्त्याच्या कडेला असलेल्या मजुरांच्या घरावर ट्रॅव्हल्स धडकली. यात चालकाच्या कॅबिनमध्ये बसलेले १२ मजूर गंभीर जखमी झाले. दरम्यान, सर्व जखमींना गोंदिया येथील केटीएस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना थानसिंग यादव या मजुराचा मृत्यू झाला. तर ११ गंभीर प्रवाशांवर उपचार सुरू आहे. ६ किरकोळ जखमींना औषधोपचार करून घरी पाठविण्यात आले.हे झाले अपघातात गंभीर जखमी -साहिल धनलाल काळसर्पे (२२), गजानन उईके (२४), अशोक काटीवाल (२१, सर्व रा. बालाघाट), गीता लटारे (३८ रा. लांजी), जयपाल गावड (३८ रा. दर्रेकसा), उर्मिला बेहेरे (४० रा. परसवाडा), राजेश पुसाम (२६ रा. भजेपार), शैलेश परते (३२ रा. तैरेपार), बाबूलाल नागपुरे, भेरूराम नागपुरे (५०, रा. वारासिवनी) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. तर बाबूलाल नागपुरे, लेखराम नागपुरे, यादव लिल्हारे, उमेश लिल्हारे, जयकिशोर रणभिरे, राकेश उपवंशी (सर्व रा. नरसाळा, वारासिवनी, जि. बालाघाट, म. प्र.) किरकोळ जखमींची नावे आहेत.मोठा अनर्थ टळला -हैदराबादहून लांजीला परत जात असलेल्या ट्रॅव्हल्सच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेवरील एका घरावर धडकली. यात घराचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा या घरात राहणारे सर्व मजूर क्वार्टरच्या बाहेर असल्याने मोठी जीवित हानी टळली.खासगी ट्रॅव्हल्सवर नियंत्रण कुणाचेगेल्या काही महिन्यांपासून लांजी ते हैदराबाद यादरम्यान तीन ते चार ट्रॅव्हल्स चालविण्यात येत आहेत. दररोज सायंकाळी लांजी येथून, तर हैदराबादवरून रात्री २ वाजता ट्रॅव्हल्स सोडण्यात येते. रात्रभर प्रवास केला जातो. अनेकदा चालकाला डुलकी येऊन वाहनावरील नियंत्रण सुटते व अपघात घडतात. मात्र, या प्रकाराकडे वाहतूक पोलिस व परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :Accidentअपघातpassengerप्रवासी