शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांना घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला अपघात, एक ठार, ११ जण गंभीर; गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावरील घटना

By अंकुश गुंडावार | Updated: June 10, 2024 16:51 IST

मध्य प्रदेशातील लांजी येथून हैदराबाद जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स सुरू आहे. दररोज शेकडो प्रवासी या ट्रॅव्हल्सने प्रवास करतात. दरम्यान, हैदराबाद येथे कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करण्यासाठी मध्य प्रदेश राज्यातील अनेक मजुरांची ौहैदराबाद येथे ने-आण करण्यात येते.

गोरेगाव : हैदराबाद येथून मध्य प्रदेशातील लांजी येथे मजुरांना घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावरील मिलटोली गावाजवळ अपघात झाला. या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला, तर ११ जण गंभीर गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. १०) सकाळी ६ वाजता घडली. थानसिंग यादव (३०, रा. रेलवाडी, जि. बालाघाट) असे मृतक मजुराचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, मध्य प्रदेशातील लांजी येथून हैदराबाद जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स सुरू आहे. दररोज शेकडो प्रवासी या ट्रॅव्हल्सने प्रवास करतात. दरम्यान, हैदराबाद येथे कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करण्यासाठी मध्य प्रदेश राज्यातील अनेक मजुरांची ौहैदराबाद येथे ने-आण करण्यात येते. सोमवारी सकाळी हैदराबादवरून जवळपास ५० ते ६० प्रवाशांना घेऊन लांजी येथील पायल ट्रॅव्हल्स कंपनीची ट्रॅव्हल्स (क्रमांक एमपी १३-पी ७९९९) मध्य प्रदेशातील लांजीकडे जात असताना गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावर मिलटोलीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दरम्यान, रस्त्याच्या कडेला असलेल्या मजुरांच्या घरावर ट्रॅव्हल्स धडकली. यात चालकाच्या कॅबिनमध्ये बसलेले १२ मजूर गंभीर जखमी झाले. दरम्यान, सर्व जखमींना गोंदिया येथील केटीएस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना थानसिंग यादव या मजुराचा मृत्यू झाला. तर ११ गंभीर प्रवाशांवर उपचार सुरू आहे. ६ किरकोळ जखमींना औषधोपचार करून घरी पाठविण्यात आले.हे झाले अपघातात गंभीर जखमी -साहिल धनलाल काळसर्पे (२२), गजानन उईके (२४), अशोक काटीवाल (२१, सर्व रा. बालाघाट), गीता लटारे (३८ रा. लांजी), जयपाल गावड (३८ रा. दर्रेकसा), उर्मिला बेहेरे (४० रा. परसवाडा), राजेश पुसाम (२६ रा. भजेपार), शैलेश परते (३२ रा. तैरेपार), बाबूलाल नागपुरे, भेरूराम नागपुरे (५०, रा. वारासिवनी) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. तर बाबूलाल नागपुरे, लेखराम नागपुरे, यादव लिल्हारे, उमेश लिल्हारे, जयकिशोर रणभिरे, राकेश उपवंशी (सर्व रा. नरसाळा, वारासिवनी, जि. बालाघाट, म. प्र.) किरकोळ जखमींची नावे आहेत.मोठा अनर्थ टळला -हैदराबादहून लांजीला परत जात असलेल्या ट्रॅव्हल्सच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेवरील एका घरावर धडकली. यात घराचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा या घरात राहणारे सर्व मजूर क्वार्टरच्या बाहेर असल्याने मोठी जीवित हानी टळली.खासगी ट्रॅव्हल्सवर नियंत्रण कुणाचेगेल्या काही महिन्यांपासून लांजी ते हैदराबाद यादरम्यान तीन ते चार ट्रॅव्हल्स चालविण्यात येत आहेत. दररोज सायंकाळी लांजी येथून, तर हैदराबादवरून रात्री २ वाजता ट्रॅव्हल्स सोडण्यात येते. रात्रभर प्रवास केला जातो. अनेकदा चालकाला डुलकी येऊन वाहनावरील नियंत्रण सुटते व अपघात घडतात. मात्र, या प्रकाराकडे वाहतूक पोलिस व परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :Accidentअपघातpassengerप्रवासी