शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

मजुरांना घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला अपघात, एक ठार, ११ जण गंभीर; गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावरील घटना

By अंकुश गुंडावार | Updated: June 10, 2024 16:51 IST

मध्य प्रदेशातील लांजी येथून हैदराबाद जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स सुरू आहे. दररोज शेकडो प्रवासी या ट्रॅव्हल्सने प्रवास करतात. दरम्यान, हैदराबाद येथे कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करण्यासाठी मध्य प्रदेश राज्यातील अनेक मजुरांची ौहैदराबाद येथे ने-आण करण्यात येते.

गोरेगाव : हैदराबाद येथून मध्य प्रदेशातील लांजी येथे मजुरांना घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावरील मिलटोली गावाजवळ अपघात झाला. या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला, तर ११ जण गंभीर गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. १०) सकाळी ६ वाजता घडली. थानसिंग यादव (३०, रा. रेलवाडी, जि. बालाघाट) असे मृतक मजुराचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, मध्य प्रदेशातील लांजी येथून हैदराबाद जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स सुरू आहे. दररोज शेकडो प्रवासी या ट्रॅव्हल्सने प्रवास करतात. दरम्यान, हैदराबाद येथे कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करण्यासाठी मध्य प्रदेश राज्यातील अनेक मजुरांची ौहैदराबाद येथे ने-आण करण्यात येते. सोमवारी सकाळी हैदराबादवरून जवळपास ५० ते ६० प्रवाशांना घेऊन लांजी येथील पायल ट्रॅव्हल्स कंपनीची ट्रॅव्हल्स (क्रमांक एमपी १३-पी ७९९९) मध्य प्रदेशातील लांजीकडे जात असताना गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावर मिलटोलीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दरम्यान, रस्त्याच्या कडेला असलेल्या मजुरांच्या घरावर ट्रॅव्हल्स धडकली. यात चालकाच्या कॅबिनमध्ये बसलेले १२ मजूर गंभीर जखमी झाले. दरम्यान, सर्व जखमींना गोंदिया येथील केटीएस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना थानसिंग यादव या मजुराचा मृत्यू झाला. तर ११ गंभीर प्रवाशांवर उपचार सुरू आहे. ६ किरकोळ जखमींना औषधोपचार करून घरी पाठविण्यात आले.हे झाले अपघातात गंभीर जखमी -साहिल धनलाल काळसर्पे (२२), गजानन उईके (२४), अशोक काटीवाल (२१, सर्व रा. बालाघाट), गीता लटारे (३८ रा. लांजी), जयपाल गावड (३८ रा. दर्रेकसा), उर्मिला बेहेरे (४० रा. परसवाडा), राजेश पुसाम (२६ रा. भजेपार), शैलेश परते (३२ रा. तैरेपार), बाबूलाल नागपुरे, भेरूराम नागपुरे (५०, रा. वारासिवनी) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. तर बाबूलाल नागपुरे, लेखराम नागपुरे, यादव लिल्हारे, उमेश लिल्हारे, जयकिशोर रणभिरे, राकेश उपवंशी (सर्व रा. नरसाळा, वारासिवनी, जि. बालाघाट, म. प्र.) किरकोळ जखमींची नावे आहेत.मोठा अनर्थ टळला -हैदराबादहून लांजीला परत जात असलेल्या ट्रॅव्हल्सच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेवरील एका घरावर धडकली. यात घराचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा या घरात राहणारे सर्व मजूर क्वार्टरच्या बाहेर असल्याने मोठी जीवित हानी टळली.खासगी ट्रॅव्हल्सवर नियंत्रण कुणाचेगेल्या काही महिन्यांपासून लांजी ते हैदराबाद यादरम्यान तीन ते चार ट्रॅव्हल्स चालविण्यात येत आहेत. दररोज सायंकाळी लांजी येथून, तर हैदराबादवरून रात्री २ वाजता ट्रॅव्हल्स सोडण्यात येते. रात्रभर प्रवास केला जातो. अनेकदा चालकाला डुलकी येऊन वाहनावरील नियंत्रण सुटते व अपघात घडतात. मात्र, या प्रकाराकडे वाहतूक पोलिस व परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :Accidentअपघातpassengerप्रवासी