शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

अतिवेग अन् चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानेच अपघात; आरटीओच्या प्राथमिक चौकशीत पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 10:24 IST

परिवहन आयुक्त, पोलिसांना देणार अहवाल

गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी डव्वाजवळ झालेल्या शिवशाही बसच्या अपघातात ११ प्रवासी ठार, तर २९ प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२९) घडली. हा अपघात बसचा अधिक व बसवरील चालकाचे सुटलेले नियंत्रण यामुळेच झाल्याचे  नागपूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी शनिवारी (दि.३०) घटनास्थळी भेट देऊन केलेल्या प्राथमिक  चौकशीत पुढे आले आहे. या अपघातास बस चालकच कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भंडारा-गोंदिया शिवशाही बसचा शुक्रवारी सकाळी अपघात झाला.. ही बस सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वावरून खजरीकडे जाताना चालकाने बसचा वेग वाढविला. दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नाने चालकाने अचानक ब्रेक लावला. परिणामी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. सुरुवातीला बस उजवीकडून  डावीकडे अशी होत उलटली. बसचा वेग अधिक असल्याने ती जवळपास २० फूट घासत गेल्याने हा अपघात घडला. बस अनियंत्रित होऊन त्यावरील बस चालकाचे नियंत्रण सुटल्यानेच हा अपघात घडला आहे. या अपघातास बस चालकच जबाबदार असल्याचे  प्राथमिक चौकशीत पुढे आले असल्याचे नागपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शनिवारी खजरी येथील घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

आयुक्तांकडे सादर करणार अहवाल

खजरी येथे झालेल्या शिवशाहीच्या अपघाताची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली आहे. आता सविस्तर अहवाल तयार करून तो परिवहन आयुक्त व पोलिस विभागाकडे सादर केला जाणार आहे.

शिवशाही बसच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून शिवशाही बसेसच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची बाब पुढे आली आहे.  काही बसची स्थिती अत्यंत बिकट आहे; पण यानंतरही त्या रस्त्यावर धावत आहे. परिणामी अपघातात वाढ होत असल्याची ओरड या विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांकडून होत आहे.