शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

अतिवेग अन् चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानेच अपघात; आरटीओच्या प्राथमिक चौकशीत पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 10:24 IST

परिवहन आयुक्त, पोलिसांना देणार अहवाल

गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी डव्वाजवळ झालेल्या शिवशाही बसच्या अपघातात ११ प्रवासी ठार, तर २९ प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२९) घडली. हा अपघात बसचा अधिक व बसवरील चालकाचे सुटलेले नियंत्रण यामुळेच झाल्याचे  नागपूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी शनिवारी (दि.३०) घटनास्थळी भेट देऊन केलेल्या प्राथमिक  चौकशीत पुढे आले आहे. या अपघातास बस चालकच कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भंडारा-गोंदिया शिवशाही बसचा शुक्रवारी सकाळी अपघात झाला.. ही बस सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वावरून खजरीकडे जाताना चालकाने बसचा वेग वाढविला. दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नाने चालकाने अचानक ब्रेक लावला. परिणामी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. सुरुवातीला बस उजवीकडून  डावीकडे अशी होत उलटली. बसचा वेग अधिक असल्याने ती जवळपास २० फूट घासत गेल्याने हा अपघात घडला. बस अनियंत्रित होऊन त्यावरील बस चालकाचे नियंत्रण सुटल्यानेच हा अपघात घडला आहे. या अपघातास बस चालकच जबाबदार असल्याचे  प्राथमिक चौकशीत पुढे आले असल्याचे नागपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शनिवारी खजरी येथील घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

आयुक्तांकडे सादर करणार अहवाल

खजरी येथे झालेल्या शिवशाहीच्या अपघाताची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली आहे. आता सविस्तर अहवाल तयार करून तो परिवहन आयुक्त व पोलिस विभागाकडे सादर केला जाणार आहे.

शिवशाही बसच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून शिवशाही बसेसच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची बाब पुढे आली आहे.  काही बसची स्थिती अत्यंत बिकट आहे; पण यानंतरही त्या रस्त्यावर धावत आहे. परिणामी अपघातात वाढ होत असल्याची ओरड या विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांकडून होत आहे.