शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षात एसीबीने खाते उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:51 IST

गोंदिया : खर्चपाणीच्या नावावर लाच मागणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी कार्यरत लाच लुचपत प्रतिबंधक विभागासाठी (एसीबी) नववर्ष भरभराटीचे लागल्याचे दिसत आहे. ...

गोंदिया : खर्चपाणीच्या नावावर लाच मागणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी कार्यरत लाच लुचपत प्रतिबंधक विभागासाठी (एसीबी) नववर्ष भरभराटीचे लागल्याचे दिसत आहे. कारण, नववर्षातील २५ दिवसांतच एसीबीने दोन कारवाया केल्या असून, यामध्ये तीन आरोपींना अटक केली आहे. एकंदर नववर्षाच्या सुरुवातीलाच एसीबीने खाते उघडल्याचे दिसून येत आहे.

काम करून देण्यासाठी खर्चपाणी व मिठाईच्या नावावर पैशांची मागणी करणे हा प्रकार आजघडीला शासकीय काय खासगी कार्यालयांतही सुरू आहे. लहान-सहान असो की मोठे काम प्रत्येकालाचा पैशांचा चस्का लागला असून, गरजूकडून पैसे उकळ्याच्या या प्रकारालाच लाचखोरी म्हटले जाते, तर पैसे मागणाऱ्यांना लाचखोर म्हटले जाते. विशेष म्हणजे, पैशांची देवाण-घेवाण करून कामे करवून घेणे ही आजघडीला समाजातील परंपराच बनली आहे. मात्र यानंतरही काहींना जास्तीचे पैसे कमाविण्याची हाव असते. अशा या लाचखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. दरवर्षी एसीबीकडून अशा लाचखोरांवर कारवाया केल्या जात असूनही लाचखोरीचे हे प्रकार काही संपलेले नसल्याचे दिसत आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे, सन २०२१ मध्येही लाचखोरीचे हे प्रकार काही थांबले नसल्याने या नववर्षाच्या सुरुवातीलाच एसीबीने दोन कारवायांत तीन जणांना अटक केली आहे. यामध्ये एक कारवाई पोलीस विभागातील असून, दुसरी कारवाई महिला व बाल कल्याण विभागातील आहे. या दोन्ही प्रकरणांत एसीबीने तीन जणांना अटक केली असून, यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नववर्षातील या २५ दिवसांच्या कालावधीतच एसीबीने लाचखोरांचे दोन प्रकरण उघडकीस आणले असून, यावरून हे वर्ष एसीबीला चांगलेच भरभराटीचे लागले असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.

---------------------------

बाप रे... कोरोना काळात दहा कारवाया

कोरोना या महामारीने अवघा जागाला हेलावून सोडले आहे. कोरोना काळात कित्येकांच्या हातचे काम सुटले व त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचे वांदे झाल्याचेही दिसले. मात्र कोरोना काळातच खरी माणुसकीही दिसून आली व माणूसच माणसासाठी धाऊन आल्याचेही दिसले. मात्र अशा या कठीण वेळातही समाजभान हरपून बसलेल्या लाचखोरांना काहीच वाटले नाही व त्यांनी लाचेची मागणी करणे सोडले नसल्याचेही बघावयास मिळाले. अशा १३ जणांना एसीबीने जणका दिला आहे. २१ मार्च २०२० ते २२ नोव्हेंबर २०२० या कोरोना काळातही एसीबीने दहा कारवाया केल्या असून, त्यात १३ जणांना अटक केली आहे.