शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयी कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती

By admin | Updated: December 1, 2014 22:56 IST

राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे. मात्र या शासकीय आदेशाची अवहेलना तालुक्यात केली जात आहे. याचा थेट परिणाम विकासकामांवर होत

रावणवाडी : राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे. मात्र या शासकीय आदेशाची अवहेलना तालुक्यात केली जात आहे. याचा थेट परिणाम विकासकामांवर होत असून आता ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचा आधार घेवून पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.ग्रामीण भागातील नागरिकांची कामे वेळेवर व्हावी. त्यांचे श्रम वाचून आर्थिक व मानसिक त्रास होवून नये म्हणून कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे, असे शासनाचे आदेश आहेत. ग्रामीण भागाचा विकास व्हावा, हाच शासनाचा यामागील उद्देश्य आहे. परंतु सर्वच विभागाचे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न राहता शासन निर्णयाचा अनादर करीत असल्याचे बोलके चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागाची निगा राखावी, दिलेल्या जबाबदारीनुसार सर्व स्तराच्या नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून प्रत्येक विभागवार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यासाठी शासनाच्या तिजोरीतून कोट्यवधी रूपयांचे मुख्यालयांचे भाडे दर महिन्याला दिले जाते. परंतु पदावर कार्यरत असलेले लोकसेवक ग्रामीण भागात राहत नसल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे मोठेच नुकसान होत आहे. गोंदिया तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत मुख्यालयी अनुपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ठराव पारित करून सक्षम अधिकाऱ्यांच्या सहकार्याने शासन दरबारी पाठविणे आता गरजेचे झाले आहे. तरच दर महिन्यात देण्यात येणारा घरभाडा थांबू शकेल किंवा दिलेले घरभाडे शासनाने कारवाई करून वसूल करावे, तरच मुख्यालयी राहण्याच्या आदेशाचे पालन होवू शकेल. मात्र ग्रामपंचायती या प्रकाराबाबत ग्रामसभेत ठराव घेण्यास अनुत्सुक दिसून येत आहेत. पंचायत राज अंतर्गत ग्रामसभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कोणत्याची शासकीय किंवा निमशासकीय विभागाने कारवाई करण्यास कुचराई केली तर गावकऱ्यांनीच ग्रामसभेच्या माध्यमातून पुढाकार घेवून मुख्यालयी अनुपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्याचा मुसक्या आवरण्याची काळाची गरज झाली आहे. या प्रकाराचा अवलंब जोपर्यंत केला जात नाही, तोपर्यंत याबाबत उत्तम असे काहीही शक्य नसल्याचे गावकरी बोलत आहेत. काम नसतानाही मिटिंग दौरा असल्याचे कारण सांगून दिवस काढणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही काही कमी नाही. यावर वचक कोण ठेवणार? अधिकारी स्वत:च मुख्यालयी राहत नाही, मग कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचा आदेश कशाला द्यायचा. ‘मैं भी चूप, तू भी चूप’ असा प्रकार असल्याने नागरिकांची बरीचशी कामे खोळंबत आहेत. नागरिकांना आपल्या कामासाठी वारंवार चकरा मारून वेळ व पैसा खर्च करावा लागतो. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे गावांतील विकास कामांवरही परिणाम होतो. अनेकदा आठवड्याच्या शेवटी व सुरूवातील कार्यालयांमध्ये अधिकारीच दिसत नाही. या प्रकाराची वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. (वार्ताहर)