शहरं
Join us  
Trending Stories
1
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
2
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
3
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
4
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
5
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
6
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
7
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
8
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
9
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
10
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
11
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
12
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
13
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
14
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
15
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
16
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
17
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
18
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
19
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
20
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू

आमगाव शहर सुरक्षित, ठाणे असुरक्षित

By admin | Updated: October 21, 2015 01:52 IST

चोरी, दरोडा व असामाजिक तत्त्वांचा शिरकाव होऊ नये यासाठी आमगाव पोलिसांनी शहरातील नागरिकांकडून वर्गणी करून सुरक्षेच्या दृष्ट्रीने सीसीटीव्ही कॅमेरे आठ महिन्यापूर्वीच बसविले.

अजब कारभार : ३० हजार वेतनाच्या शिपायाला फक्त नाव लिहिण्याचे कामओ.बी.डोंगरवार आमगावचोरी, दरोडा व असामाजिक तत्त्वांचा शिरकाव होऊ नये यासाठी आमगाव पोलिसांनी शहरातील नागरिकांकडून वर्गणी करून सुरक्षेच्या दृष्ट्रीने सीसीटीव्ही कॅमेरे आठ महिन्यापूर्वीच बसविले. यामुळे आमगाव शहर सुरक्षित झाले आहे. परंतु येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांना आमगाव पोलीस ठाणेच असुरक्ष्ीित वाटत असल्यामुळे त्यांनी आमगाव पोलिस ठाण्याचे चक्क गेटच बंद केले. तक्रार करण्यास येणाऱ्या नागरिकांचीच चौकशी करण्यासाठी गेटवर ३० हजार रूपये वेतनाचा कर्मचारी बसवून ठेवला आहे.आमगाव पोलीस ठाणे नक्षलग्रस्त भागात नाही. अत्यंत शांतता प्रिय असलेले हे गाव आता येथील उपविभागीय अधिकारी दीपाली खन्ना यांना असुरक्षीत वाटू लागल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास येणाऱ्या नागरिकांची आता विचारपूस करण्यासाठी एक पोलीस कर्मचारी गेटवर बसवून ठेवला आहे. या ठाण्याचे गेट बंद करून फक्त रजीस्टर घेऊन एका महिला कर्मचारीला दिवसभर उन्हात बसवून ठेवले जाते. पोलीसांची भिती आधीच मनात असल्याने अनेक लोक अन्याय सहन करून पोलिस ठाण्यात जात नाही. एखाद्याने पोलीस ठाण्यापर्यंत जाण्याचा माणस बांधला तरी त्याला गेट बंद असल्याचे पाहून जाऊ की याची असे वाटते. हिंमत करून एखादा तक्रार करायला जातो म्हणून गेटमधून आत जाण्याचा प्रयत्न केला तर तेथे ड्युटीवर असलेल्या व्यक्कीकडून नाव व मोबाईल नंबर मागितला जातो. नंतर त्याला आत जाण्याची परवनागी दिली जाते. आमगाव शहरातील गुन्हेगारीवरू आळा घालण्यासाठी पोलिसांनी लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे शहराच्या अनेक भागात लावले. त्यामुळे येथील चोऱ्यांवर आळा बसला. शहर सुरक्षित झाले. मात्र आता सद्या नियुक्त झालेल्या उपविभागीय अधिकारी दीपाली खन्ना यांनी आल्या आल्या पोलीस ठाण्याचेच दार बंद केले. पोलीस ठाण्यात येणाऱ्यांना फक्त नाव व मोबाईल क्रमांक मागून त्यांना स्वाक्षरी करायला लावली जाते. जे शहर शांततेचे प्रतीक आहे. त्या शहरातील पोलिस ठाणे अचानक असुरक्षित का वाटू लागले अशी शंका अनेकांच्या मनात आली. परंतु याचे उत्तर पोलीस प्रशासनाकडे नाही. मनुष्यबळ नाही; मग व्यर्थ का घालवता?पोलीस विभागात मनुष्यबळ अपुरा आहे अश्या बोंबा ठोकल्या जातात. दुर्गा उत्सव सद्या जोमात सुरू आहे. मनुष्यबळ नसल्यामुळे गृहरक्षक दलाच्या महिला व पुरूषांना बोलविले जाते. बंदोबस्तासाठी त्यांची मदत घेतली जाते. परंतु या उत्सवाच्या दरम्यान ३० हजार रूपये वेतनाचा एक पोलिस शिपाई गेटवर बसून येणाऱ्या-जाणाऱ्यांचे फक्त नाव लिहून स्वाक्षरी मागतात. या गटेवर मनुष्यबळ घालवून काहीही अर्थ निघत नाही. येणाऱ्या जाणाऱ्यांना ओळखपत्रही मागतिले जात नसल्याने येणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर नाव लिहीले राहात नाही ते चुकीचे नाव व चुकीचा मोबाईल क्रमांक सांगू शकतात. कसलाही पुरावा न मागता फक्त नाव विचारण्यासाठी ३० हजार रूपयाचा कर्मचारी बसवून ठेवणे गरजेचे नाही. दारावर सीसीटीव्ही बसवा आमगाव पोलीस ठाण्यांत येणाऱ्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ३० हजार वेतनाचा कर्मचारी ठेवण्यापेक्षा ३ हजार रूपयाचा एक सीसीटीव्ही कॅमेरा ठेवल्यास प्रत्य हालचालींवर नजतही टाकली जाईल व मनुष्य बळ वाया जाणार नाही. बड्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे शक्कल लढविण्याची गरज आहे.