शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

हत्तींचा कळप देवरी तालुक्याच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2022 21:07 IST

चिमणटोला परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास जंगली हत्तींच्या कळपाने प्रवेश केला. तसेच या परिसरातील शेतामध्ये रचून ठेवलेल्या धानाच्या पुंजण्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याची बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. हत्तींचा कळप गावाच्या सीमेपासून २०० ते ३०० फूट अंतरावर येऊन काही वेळ थांबल्यानंतर परत जंगलाच्या दिशेने निघून गेले. पण ते कधी पुन्हा येणार याची काही शाश्वती नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कचिचगड : गडचिरोली जिल्ह्यात परत गेलेल्या हत्तींच्या कळपाने जिल्ह्यात पुन्हा एन्ट्री केली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उमरपायली परिसरात हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात धानपिकांचे नुकसान केले. त्यानंतर या कळपाने आता देवरी तालुक्याच्या दिशेने मोर्चा वळविला असून चिचगड पासून २० किमी अंतरावर असलेल्या चिमणटोला गावात गुरुवारी (दि. ९) रात्री प्रवेश करून कापणी करून ठेवलेल्या धानाच्या पुंजण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे शेतकरी आणि  गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राप्त माहितीनुसार चिचगड वन परिक्षेत्रापासून २० किमी अंतरावरील चिमणटोला परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास जंगली हत्तींच्या कळपाने प्रवेश केला. तसेच या परिसरातील शेतामध्ये रचून ठेवलेल्या धानाच्या पुंजण्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याची बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. हत्तींचा कळप गावाच्या सीमेपासून २०० ते ३०० फूट अंतरावर येऊन काही वेळ थांबल्यानंतर परत जंगलाच्या दिशेने निघून गेले. पण ते कधी पुन्हा येणार याची काही शाश्वती नाही. या घटनेची माहिती मिळताच चिचगड वनपरिक्षेत्राधिकारी संगीता ढोबळे यांनी चिमणटोला गावाला आपल्या चमूसह भेट दिली. तसेच नुकसानीचे पंचनामे करून गावकऱ्यांना रात्रीच्या वेळेस घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. बुधवारी हत्तीच्या कळपाने अर्जुनी  मोरगाव तालुक्यातील केशोरी, गोठणगाव, उमरपायली व नागणडोह परिसरात हजेरी लावली होती. उमरपायली येथील शेतातील धानपिकांचे नुकसान करून हा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात परत गेला होता. पण गुरुवारी रात्रीच्या सुमारास  पुन्हा याच परिसरात हजेरी लावत आता आपला मोर्चा देवरी तालुक्याच्या दिशेने वळविला आहे. शुक्रवारी (दि. ११) सकाळी  सुद्धा हत्तीच्या कळपाचे लोकेशन चिचगड परिसरात असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

वनविभागाची चमू चिचगड परिसरात दाखल जंगली हत्तीच्या कळपाने चिचगड,चिमणटोला परिसरात एन्ट्री केली. या परिसरातील धानपिकांचे नुकसान केले. त्यामुळे वनविभागाचे चमू या हत्तीच्या कळपावर नजर ठेवण्यासाठी या परिसरात दाखल झाले आहे. गावकऱ्यांनी मोहाफुले वाळू घालू नये तसेच हत्तींना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये अशा सूचना गावकऱ्यांना केल्या आहेत. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरणजिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील धान कापणी आणि मळणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे पहाटेपासूनच शेतकरी शेतात  असतात. मात्र जंगली हत्तीच्या कळपाने चिचगड, चिमणटोला परिसरात हजेरी लावून धानपिकांची नासधूस करण्यास  सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

 

टॅग्स :forest departmentवनविभागwildlifeवन्यजीव