शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

फुली मारुन मतदान करण्याचा आनंद आगळाच; १०७ वर्षीय आजोबांनी सांगितल्या निवडणुकीच्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2024 09:45 IST

१०७ वर्षांचे असलेले जयराम हांडेकर यांचा आवाज आजही कडक आहे. मात्र, त्यांना ऐकायला कमी येते.

अमरचंद ठवरे, लोकमत न्यूज नेटवर्क, बोंडगावदेवी : पूर्वी निवडणूक जाहीर होताच गावातील पानटपरीवर खास चर्चा रंगायच्या. गल्लोगल्लीत कर्ण कर्कश आवाजाने निवडणुकीची रणधुमाळी राहायची. पूर्वी उमेदवार, तसेच त्यांचे सक्रिय सहकारी प्रत्यक्षात भेट घ्यायचे. गावात विकासाची गंगा आणू, नवनवीन बांधकामे करून गाव सुजलाम् सुफलाम् करू, असे लाऊड स्पीकरच्या भोंग्यातून सांगायचे. फुली मारून मतदान करण्यात तेव्हा एक आगळावेगळा आनंद असायचा.

पूर्वी गाव पातळीवरील लोकांच्या बैठका, गप्पा चालायच्या, पण हल्लीच्या निवडणुकीत तसे काही दिसत नाही. यापूर्वी झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मी मतदान केले आहे. मतदान करताना आजपर्यंत कोणतीही अपेक्षा ठेवली नव्हती. यावेळी मी घरूनच मतदान करणार असल्याचे बोंडे नवेगावबांध येथील १०७ वर्षांचे आजोबा जयराम किसन हांडेकर यांनी सांगितले.  

ती निवडणूक कशी विसरणार

पूर्वीच्या निवडणुका अत्यंत चुरसपूर्ण व्हायच्या. विविध पक्षाचे उमेदवार गावागावांत पोहोचायचे. आता उमेदवारांचे दर्शन होणे दुर्मिळ झाले. १०७ वर्षीय आजोबांना ऐकायला कमी येत असले, तरी पूर्वीच्या राजकीय पक्षांचे चिन्ह आजही त्यांच्या तोंडपाठ आहेत. पूर्वी फुल्या मारून मतदान करायचे, उमेदवारांच्या चिन्हाचे बिल्ले खास आकर्षित असायचे.

आजोबा, तुम्हाला काय वाटते?

१०७ वर्षांचे असलेले जयराम हांडेकर यांचा आवाज आजही कडक आहे. मात्र, त्यांना ऐकायला कमी येते. निवडणुकीबाबत ते म्हणाले की, निवडून कुणीही येऊ. परंतु गावात नवीन सुधारणा कराव्या. आपण आपले कर्तव्य समजून गाव पातळीपासून ते पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा या प्रत्येक निवडणुकीत मतदान केल्याचे त्यांनी सांगितले, मतदारांनी मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे असे त्यांनी आवर्जून सांगितले.

मी घरूनच मतदान करणार

१०७ वर्षीय आजोबांना आता खाटेवरच राहावे लागत आहे. माझी मुलं मतदान करण्याची व्यवस्था करतील, यावेळी अनुपस्थित मतदार अंतर्गत नावनोंदणी मुलांनी केल्याने मी घरूनच मतदान करणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आत्ताची निवडणूक वेगळी

आताच्या निवडणुकांचे स्वरूप फार वेगळे आहे. पूर्वी वारेमाप पैसा खर्च होत नव्हता. गावातील कार्यकर्ते चिठ्ठ्या लिहून द्यायचे. त्यावेळी कोणतीही अपेक्षा केली जात नव्हती. आज मात्र पाण्यासारखा पैसा निवडणुकीत खर्च केला जातो, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. 

नवीन खासदाराकडून अपेक्षा काय?

निवडून येणाऱ्या नवीन खासदारांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी प्राधान्याने प्रयत्न करावे. शेतमालाला उत्पादन खर्चावर भाव मिळावा. विजेचा नियमितपणे पुरवठा करावा. जलसिंचनाच्या सोयीत वाढ करावी. शेतकरी जगला तर देश टिकेल. शेतकऱ्यांना विकासाचे मुख्य केंद्रबिंदू समजून निवडून येणाऱ्या नवीन खासदारांनी प्रामाणिकपणे काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४