शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

फुली मारुन मतदान करण्याचा आनंद आगळाच; १०७ वर्षीय आजोबांनी सांगितल्या निवडणुकीच्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2024 09:45 IST

१०७ वर्षांचे असलेले जयराम हांडेकर यांचा आवाज आजही कडक आहे. मात्र, त्यांना ऐकायला कमी येते.

अमरचंद ठवरे, लोकमत न्यूज नेटवर्क, बोंडगावदेवी : पूर्वी निवडणूक जाहीर होताच गावातील पानटपरीवर खास चर्चा रंगायच्या. गल्लोगल्लीत कर्ण कर्कश आवाजाने निवडणुकीची रणधुमाळी राहायची. पूर्वी उमेदवार, तसेच त्यांचे सक्रिय सहकारी प्रत्यक्षात भेट घ्यायचे. गावात विकासाची गंगा आणू, नवनवीन बांधकामे करून गाव सुजलाम् सुफलाम् करू, असे लाऊड स्पीकरच्या भोंग्यातून सांगायचे. फुली मारून मतदान करण्यात तेव्हा एक आगळावेगळा आनंद असायचा.

पूर्वी गाव पातळीवरील लोकांच्या बैठका, गप्पा चालायच्या, पण हल्लीच्या निवडणुकीत तसे काही दिसत नाही. यापूर्वी झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मी मतदान केले आहे. मतदान करताना आजपर्यंत कोणतीही अपेक्षा ठेवली नव्हती. यावेळी मी घरूनच मतदान करणार असल्याचे बोंडे नवेगावबांध येथील १०७ वर्षांचे आजोबा जयराम किसन हांडेकर यांनी सांगितले.  

ती निवडणूक कशी विसरणार

पूर्वीच्या निवडणुका अत्यंत चुरसपूर्ण व्हायच्या. विविध पक्षाचे उमेदवार गावागावांत पोहोचायचे. आता उमेदवारांचे दर्शन होणे दुर्मिळ झाले. १०७ वर्षीय आजोबांना ऐकायला कमी येत असले, तरी पूर्वीच्या राजकीय पक्षांचे चिन्ह आजही त्यांच्या तोंडपाठ आहेत. पूर्वी फुल्या मारून मतदान करायचे, उमेदवारांच्या चिन्हाचे बिल्ले खास आकर्षित असायचे.

आजोबा, तुम्हाला काय वाटते?

१०७ वर्षांचे असलेले जयराम हांडेकर यांचा आवाज आजही कडक आहे. मात्र, त्यांना ऐकायला कमी येते. निवडणुकीबाबत ते म्हणाले की, निवडून कुणीही येऊ. परंतु गावात नवीन सुधारणा कराव्या. आपण आपले कर्तव्य समजून गाव पातळीपासून ते पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा या प्रत्येक निवडणुकीत मतदान केल्याचे त्यांनी सांगितले, मतदारांनी मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे असे त्यांनी आवर्जून सांगितले.

मी घरूनच मतदान करणार

१०७ वर्षीय आजोबांना आता खाटेवरच राहावे लागत आहे. माझी मुलं मतदान करण्याची व्यवस्था करतील, यावेळी अनुपस्थित मतदार अंतर्गत नावनोंदणी मुलांनी केल्याने मी घरूनच मतदान करणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आत्ताची निवडणूक वेगळी

आताच्या निवडणुकांचे स्वरूप फार वेगळे आहे. पूर्वी वारेमाप पैसा खर्च होत नव्हता. गावातील कार्यकर्ते चिठ्ठ्या लिहून द्यायचे. त्यावेळी कोणतीही अपेक्षा केली जात नव्हती. आज मात्र पाण्यासारखा पैसा निवडणुकीत खर्च केला जातो, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. 

नवीन खासदाराकडून अपेक्षा काय?

निवडून येणाऱ्या नवीन खासदारांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी प्राधान्याने प्रयत्न करावे. शेतमालाला उत्पादन खर्चावर भाव मिळावा. विजेचा नियमितपणे पुरवठा करावा. जलसिंचनाच्या सोयीत वाढ करावी. शेतकरी जगला तर देश टिकेल. शेतकऱ्यांना विकासाचे मुख्य केंद्रबिंदू समजून निवडून येणाऱ्या नवीन खासदारांनी प्रामाणिकपणे काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४