शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

९० टक्के रोवणी आटोपली

By admin | Updated: August 12, 2016 01:23 IST

गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण काही प्रमाणात जास्त आहे. मात्र तरीही रोवणीची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत.

पुन्हा पावसाची प्रतीक्षा : १ लाख ६० हजार ४६३ हेक्टरवर धान लागवड गोंदिया : गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण काही प्रमाणात जास्त आहे. मात्र तरीही रोवणीची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ८ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ९० टक्के धानाची रोवणी आटोपली आहे. १ लाख ६० हजार ४६४.४ हेक्टरमध्ये रोवणीचे काम पूर्ण झाले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात एक लाख ७८ हजार २२९ हेक्टर क्षेत्रात धान लागवडीचे उद्दिष्ट होते. यापैकी एक लाख ४९ हजार २२९ हेक्टर क्षेत्रात रोवणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हे काम ८४ टक्के पूर्ण झालेले आहे. याशिवाय १० हजार ९७१.८ हेक्टरमध्ये आवत्या घालण्यात आल्या आहेत. ८ आॅगस्टपर्यंत गोंदिया तालुक्यातील ३९ हजार ६११ हेक्टरपैकी २८ हजार ४०२.६ हेक्टरमध्ये रोवणी आटोपली. गोरेगाव तालुक्यातील १९ हजार ९३१ हेक्टरपैकी १८ हजार ९५०, सालेकसा तालुक्यातील १६ हजार ८८९ हेक्टरपैकी १३ हजार ३२७, तिरोडा तालुक्यातील २४ हजार २४५ हेक्टरपैकी २२ हजार २७०, आमगाव तालुक्यातील १९ हजार २४८ हेक्टरपैकी १६ हजार ९३८, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २२ हजार ५८४ हेक्टरपैकी २० हजार ६७२, सडक-अर्जुनी तालुक्यातील १७ हजार २२५ हेक्टरपैकी १५ हजार ७८८ व देवरी तालुक्यातील १८ हजार ४९६ हेक्टरपैकी १३ हजार १४५ हेक्टरमध्ये रोवणीचे कार्य पूर्ण झालेले आहे. आता रोवणीचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. थोडेफार कार्य बाकी आहे. ते एका आठवड्याच्या आता पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गोंदिया तालुक्यात १८७७.६ हेक्टर, गोरेगाव तालुक्यात ५०३ हेक्टर, सालेकसा तालुक्यात ९२६ हेक्टर, तिरोडा तालुक्यात २४४ हेक्टर, आमगाव तालुक्यात २८९ हेक्टर, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ७३५.२ हेक्टर, सडक-अर्जुनी तालुक्यात ८०२ हेक्टर व देवरी तालुक्यात पाच हजार ५९५ हेक्टरमध्ये आवत्यांचे कार्य पूर्ण करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी) इतर पिकांचीही लागवड जिल्ह्यास धानाचे कोठार संबोधिले जाते. जास्तीत जास्त लोक तांदळाचा आहारात उपयोग करतात. परंतु तांदळासह वरण नसेल तर स्वाद मिळत नाही. जिल्ह्याच्या सहा हजार ०४९ हेक्टर क्षेत्रात तुरचे पीक लावण्याचे उद्दिष्ट होते. परंतु प्रत्यक्षात सहा हजार ८५०.३ हेक्टरमध्ये तुरीचे पीक लावण्यात आले. हे उद्दिष्टाच्या ११३ टक्के आहे. मुंगाच्या पिकासाठी २१३ हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठरविले होते. प्रत्यक्षात केवळ चार हेक्टरमध्येच मुंग लावण्यात आले आहे. मुंग लागवडीचे काम अद्यापही सुरूच आहे. उडीदच्या पिकासाठी १४४ हेक्टरचे उद्दिष्ट आहे. इतर पिके ३३८ हेक्टरमध्ये लावण्यात येत आहेत. यापैकी ६४.५ हेक्टरमध्ये लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. मकर संक्रांतीमध्ये तिळाला खूप महत्त्व असते. गोड पदार्थ व लाडू बनविण्यासाठी तिळाचा उपयोग केला जातो. जिल्ह्यात एक हजार २७६ हेक्टरमध्ये तिळाचे पीक लावण्याचे निर्णय कृषी विभागाने घेतले. प्रत्यक्ष ७७९.१ हेक्टर क्षेत्रात तिळ लावण्यात आले आहे. हे कार्य ६१ टक्के पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यात ५६८.२ हेक्टरमध्ये भाजीपाला पीक लावण्यात आले आहे. भविष्यात ऊसाच्या शेतीला अधिक महत्त्व असणार आहे. त्यासाठी ९५८ हेक्टर क्षेत्र निर्धारित केले आहे. परंतु सद्यस्थितीत २२७ हेक्टर क्षेत्रातच ऊसाचे पीक लावण्यात आले आहे.