शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

जिल्ह्यात ९२ मिमी पावसाची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 21:26 IST

मृग नक्षत्र लागून आता वर ७ सात दिवस होवूनही पाऊस बरसला नव्हता. जिल्ह्यातील पर्जन्यमानाची स्थिती बघता १४ जून पर्यंत सरासरी ९२ मिमी पाऊस पडायला हवा होता. यंदा मात्र फक्त ०.७८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१४ तारखेपर्यंतचा अंदाजित पाऊस : यंदा फक्त ०.७८ मिमी नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मृग नक्षत्र लागून आता वर ७ सात दिवस होवूनही पाऊस बरसला नव्हता. जिल्ह्यातील पर्जन्यमानाची स्थिती बघता १४ जून पर्यंत सरासरी ९२ मिमी पाऊस पडायला हवा होता. यंदा मात्र फक्त ०.७८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. म्हणजेच, यंदा जिल्ह्यात पावसाळ््याच्या सुरूवातीलाच ९२ मिमी पावसाची तूट दिसून येत आहे.मागील काही वर्षांपासून पाऊस हुलकावणी देत असून मृग नक्षत्र लागूनही बरसण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. यंदाही पावसाने हुलकावणी दिली असून मृग नक्षत्र लागूनबी शुक्रवारपर्यंत (दि.१४) हजेरी लावलेली नव्हती. परिणामी उकाड्यामुळे सर्वच हैरान असताना पाणी टंचाई अधिकाधिक गंभीर होत असून सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. कधी पाऊस बरसतो व उकाडा आणि पाणी टंचाईपासून सुटका होते याची आस लावून सर्वच बसले आहेत. अशात शनिवारी (दि.१५) दुपारी पावसाने हजेरी लावली.तरिही जिल्ह्यातील पर्जन्याची स्थिती बघता १४ जून पर्यंत जिल्ह्यात ९२ मीमी एवढा पाऊस होणे अपेक्षीत आहे. यंदा मात्र जिल्ह्यात फक्त ०.७८ मीमी एवढ्याच पावसाची नोंद घेण्यात आली आहे. यावरून जिल्ह्यात यंदा ९२ मीमी पावसाची तूट सुरूवातीलाच दिसून येत आहे. अशीच स्थिती असल्यास येणारा काळ कठीण दिसून येत आहे. एकीकडे उकाड्याने सर्वांनाच हैरान करून ठेवले आहे. त्यात पाऊस बरसत नसल्याने प्रकल्प व तलावांतील पाणीसाठा घटत चालला असून पाणी टंचाई अधिक गंभीर होत चालली आहे.त्यामुळे लवकरात लवकर पाणी बरसणे गरजेचे झाले आहे. असे न झाल्यास उकाड्यापासून सुटका होणे कठीणच दिसत आहे. शिवाय पाणी टंचाईचा फटका बसत असल्याने नागरिकांची फसगत होत आहे. यामुळे सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून धो-धो बरसावा अशी प्रार्थना जिल्हावासी करीत आहेत.

टॅग्स :Rainपाऊस