शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
3
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
4
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
5
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
7
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
8
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
9
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
10
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
11
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
12
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
13
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
14
उपराष्ट्रपतीपद सोडल्यावर जगदीप धनखड पहिल्यांदाच बोलले, म्हणाले मला बोलायला...
15
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
16
ऑपरेशन सिंदूरनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हालचालींना वेग; महत्त्वाची माहिती उघड...
17
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
18
हृदयस्पर्शी! मेकअपला जाताना वधूचा अपघात; नवरदेवाने रुग्णालयातच केलं लग्न, घातलं मंगळसूत्र
19
"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका
20
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
Daily Top 2Weekly Top 5

83 हजार शेतकऱ्यांचे वर्षाचे सहा हजार बुडाले ! काय सांगता ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 05:00 IST

या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर बऱ्याच शेतकऱ्यांना इंटरनेट आणि केवायसी करण्याचे संकेतस्थळ बराच वेळ बंद राहत असल्याने ३१ मेपर्यंत केवायसी करता आले नाही. याचा फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसला. जिल्ह्यातील ८३ हजार शेतकरी केवायसीपासून वंचित असल्याने शासन याला मुदतवाढ देते काय याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तीन हप्त्यांत सहा हजार रुपये जमा केले जातात. यासाठी पात्र शेतकऱ्यांना ३१ मेपर्यंत आधारकार्डसह इतर कागदपत्रे जोडून केवायसी करणे अनिर्वाय केले होते. केवायसी न करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार, असे केंद्र शासनाने स्पष्ट केले.  जिल्ह्यात या योजनेचे एकूण २ लाख ६१ हजार १२९ लाभार्थी असून ३१ मेपर्यंत यापैकी केवळ १ लाख ७७ हजार ८७७ शेतकऱ्यांनी केवायसी केले आहे. तर तब्बल ८३ हजार २५२ शेतकऱ्यांनी केवायसी केले नाही. परिणामी या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत मिळणाऱ्या ६ हजार रुपयांच्या पेन्शनला मुकावे लागणार आहे. या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर बऱ्याच शेतकऱ्यांना इंटरनेट आणि केवायसी करण्याचे संकेतस्थळ बराच वेळ बंद राहत असल्याने ३१ मेपर्यंत केवायसी करता आले नाही. याचा फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसला. जिल्ह्यातील ८३ हजार शेतकरी केवायसीपासून वंचित असल्याने शासन याला मुदतवाढ देते काय याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

३१ मेपर्यंतची होती डेडलाइन पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत केवायसी करण्यासाठी शासनाने ३१ मेपर्यंत डेडलाईन दिली होती. या कालावधीत बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायसी केले. मात्र काही शेतकऱ्यांना इंटरनेट व संकेतस्थळ बंद असल्याचा फटका बसला.

१ लाख ७७ हजार ८७७ मिळणार पेन्शनपंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन टप्प्यांत ६ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाते. जिल्ह्यातील २ लाख ६१ हजार १२९ शेतकऱ्यांपैकी १ लाख ७७ हजार ८७७ शेतकऱ्यांनी केवायसी केले असून या शेतकऱ्यांना नियमित पेन्शन मिळणार आहे. 

८३ हजार २५२ शेतकऱ्यांनी केवायसी नाही- जिल्ह्यातील ८३ हजार २५२ शेतकऱ्यांनी ३१ मेपर्यंत केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेंतर्गत मिळणाऱ्या ६ हजार रुपयांच्या पेन्शनला मुकावे लागणार आहे. 

पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत एकही शेतकरी केवायसीपासून वंचित राहू नये यासाठी जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन करण्यात आले. जास्तीत शेतकऱ्यांना केवायसी करता यावे, यासाठी प्रशासनातर्फे मदत करण्यात आली. - महसूल अधिकारी

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाgovernment schemeसरकारी योजना