शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

83 हजार शेतकऱ्यांचे वर्षाचे सहा हजार बुडाले ! काय सांगता ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 05:00 IST

या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर बऱ्याच शेतकऱ्यांना इंटरनेट आणि केवायसी करण्याचे संकेतस्थळ बराच वेळ बंद राहत असल्याने ३१ मेपर्यंत केवायसी करता आले नाही. याचा फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसला. जिल्ह्यातील ८३ हजार शेतकरी केवायसीपासून वंचित असल्याने शासन याला मुदतवाढ देते काय याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तीन हप्त्यांत सहा हजार रुपये जमा केले जातात. यासाठी पात्र शेतकऱ्यांना ३१ मेपर्यंत आधारकार्डसह इतर कागदपत्रे जोडून केवायसी करणे अनिर्वाय केले होते. केवायसी न करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार, असे केंद्र शासनाने स्पष्ट केले.  जिल्ह्यात या योजनेचे एकूण २ लाख ६१ हजार १२९ लाभार्थी असून ३१ मेपर्यंत यापैकी केवळ १ लाख ७७ हजार ८७७ शेतकऱ्यांनी केवायसी केले आहे. तर तब्बल ८३ हजार २५२ शेतकऱ्यांनी केवायसी केले नाही. परिणामी या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत मिळणाऱ्या ६ हजार रुपयांच्या पेन्शनला मुकावे लागणार आहे. या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर बऱ्याच शेतकऱ्यांना इंटरनेट आणि केवायसी करण्याचे संकेतस्थळ बराच वेळ बंद राहत असल्याने ३१ मेपर्यंत केवायसी करता आले नाही. याचा फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसला. जिल्ह्यातील ८३ हजार शेतकरी केवायसीपासून वंचित असल्याने शासन याला मुदतवाढ देते काय याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

३१ मेपर्यंतची होती डेडलाइन पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत केवायसी करण्यासाठी शासनाने ३१ मेपर्यंत डेडलाईन दिली होती. या कालावधीत बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायसी केले. मात्र काही शेतकऱ्यांना इंटरनेट व संकेतस्थळ बंद असल्याचा फटका बसला.

१ लाख ७७ हजार ८७७ मिळणार पेन्शनपंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन टप्प्यांत ६ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाते. जिल्ह्यातील २ लाख ६१ हजार १२९ शेतकऱ्यांपैकी १ लाख ७७ हजार ८७७ शेतकऱ्यांनी केवायसी केले असून या शेतकऱ्यांना नियमित पेन्शन मिळणार आहे. 

८३ हजार २५२ शेतकऱ्यांनी केवायसी नाही- जिल्ह्यातील ८३ हजार २५२ शेतकऱ्यांनी ३१ मेपर्यंत केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेंतर्गत मिळणाऱ्या ६ हजार रुपयांच्या पेन्शनला मुकावे लागणार आहे. 

पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत एकही शेतकरी केवायसीपासून वंचित राहू नये यासाठी जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन करण्यात आले. जास्तीत शेतकऱ्यांना केवायसी करता यावे, यासाठी प्रशासनातर्फे मदत करण्यात आली. - महसूल अधिकारी

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाgovernment schemeसरकारी योजना