शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
4
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेर नाही आली; दरवाजा तोडला तर...
5
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
6
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
7
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
8
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
9
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
10
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
11
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
12
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
13
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
14
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
15
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
16
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
17
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
18
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
19
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
20
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?

गारपिटीमुळे ८३ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 06:00 IST

सोमवारी (दि.२५) गारपीट आणि अवकाळी पावसामुळे सर्वाधिक कौलारुंच्या घराचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे घरावरील छत उडाल्याने व घरे आणि गोठ्यांवर झाडांची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याचा सर्वाधिक फटका सालेकसा, सडक अर्जुनी, गोंदिया, आमगाव तालुक्याला बसला आहे.

ठळक मुद्दे१६०९ घरांची पडझड : महसूल विभागाचे सर्वेक्षणातील माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात २५ फेब्रुवारीला झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांसह मालमत्तेचे सुध्दा नुकसान झाले. महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे एकूण १६०९ घरे आणि गोठ्यांची पडझड होऊन ८३ लाख ४२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात पुढे आले आहे.नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे पाठविला असून शासनाकडून आपदग्रस्तांना किती नुकसान भरपाई दिली जाते याकडे लक्ष लागले आहे.सोमवारी (दि.२५) गारपीट आणि अवकाळी पावसामुळे सर्वाधिक कौलारुंच्या घराचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे घरावरील छत उडाल्याने व घरे आणि गोठ्यांवर झाडांची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याचा सर्वाधिक फटका सालेकसा, सडक अर्जुनी, गोंदिया, आमगाव तालुक्याला बसला आहे. आमगाव तालुक्यात ४१ घरे आणि गोठ्यांची, सालेकसा तालुक्यात १४८० घरे आणि गोठे,सडक अर्जुनी तालुक्यात ६२ घर आणि गोठे व गोंदिया तालुक्यात १३ आणि तिरोडा तालुक्यात ४ घरे आणि गोठ्यांची पडझड झाली. यामुळे ८३ लाख ४२ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले.सदर नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाच्या यंत्रणेतंर्गत करण्यात आले.तसेच या नुकसानीचा अहवाल गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे पाठविला आहे. शासनाकडून नुकसान भरपाई जाहीर होईपर्यंत नुकसानग्रस्तांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.अवकाळी पावसामुळे ९७४ हेक्टरमधील पिके बाधितअवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील पिकांना व भाजीपाल्याला बसला. जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठविलेल्या अहवालात ९७४ हेक्टरमधील पिके बाधीत झाले आहे. यात २७२ हेक्टरचे ३३ टक्केच्या आत तर ७०२ हेक्टरचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाले आहे. या नुकसानीत अजुन वाढ होण्याची शक्यता महसूल विभागाने वर्तविली आहे. दरम्यान हा सर्व अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.पीक विम्या कंपन्याकडे नजराजिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. यात सर्वाधिक क्षेत्र धानाचे असून त्या पाठोपाठ गहू आणि हरभरा या पिकांचे आहे. बºयाच शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत रब्बी पिकांचा विमा उतरविला होता. त्यामुळे ३३ टक्केच्यावर ७०२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून पीक विमा कंपन्या आता शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यासाठी नेमका कोणता निकष लावतात. याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :agricultureशेतीCrop Insuranceपीक विमा