शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

गारपिटीमुळे ८३ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 06:00 IST

सोमवारी (दि.२५) गारपीट आणि अवकाळी पावसामुळे सर्वाधिक कौलारुंच्या घराचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे घरावरील छत उडाल्याने व घरे आणि गोठ्यांवर झाडांची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याचा सर्वाधिक फटका सालेकसा, सडक अर्जुनी, गोंदिया, आमगाव तालुक्याला बसला आहे.

ठळक मुद्दे१६०९ घरांची पडझड : महसूल विभागाचे सर्वेक्षणातील माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात २५ फेब्रुवारीला झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांसह मालमत्तेचे सुध्दा नुकसान झाले. महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे एकूण १६०९ घरे आणि गोठ्यांची पडझड होऊन ८३ लाख ४२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात पुढे आले आहे.नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे पाठविला असून शासनाकडून आपदग्रस्तांना किती नुकसान भरपाई दिली जाते याकडे लक्ष लागले आहे.सोमवारी (दि.२५) गारपीट आणि अवकाळी पावसामुळे सर्वाधिक कौलारुंच्या घराचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे घरावरील छत उडाल्याने व घरे आणि गोठ्यांवर झाडांची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याचा सर्वाधिक फटका सालेकसा, सडक अर्जुनी, गोंदिया, आमगाव तालुक्याला बसला आहे. आमगाव तालुक्यात ४१ घरे आणि गोठ्यांची, सालेकसा तालुक्यात १४८० घरे आणि गोठे,सडक अर्जुनी तालुक्यात ६२ घर आणि गोठे व गोंदिया तालुक्यात १३ आणि तिरोडा तालुक्यात ४ घरे आणि गोठ्यांची पडझड झाली. यामुळे ८३ लाख ४२ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले.सदर नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाच्या यंत्रणेतंर्गत करण्यात आले.तसेच या नुकसानीचा अहवाल गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे पाठविला आहे. शासनाकडून नुकसान भरपाई जाहीर होईपर्यंत नुकसानग्रस्तांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.अवकाळी पावसामुळे ९७४ हेक्टरमधील पिके बाधितअवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील पिकांना व भाजीपाल्याला बसला. जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठविलेल्या अहवालात ९७४ हेक्टरमधील पिके बाधीत झाले आहे. यात २७२ हेक्टरचे ३३ टक्केच्या आत तर ७०२ हेक्टरचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाले आहे. या नुकसानीत अजुन वाढ होण्याची शक्यता महसूल विभागाने वर्तविली आहे. दरम्यान हा सर्व अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.पीक विम्या कंपन्याकडे नजराजिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. यात सर्वाधिक क्षेत्र धानाचे असून त्या पाठोपाठ गहू आणि हरभरा या पिकांचे आहे. बºयाच शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत रब्बी पिकांचा विमा उतरविला होता. त्यामुळे ३३ टक्केच्यावर ७०२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून पीक विमा कंपन्या आता शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यासाठी नेमका कोणता निकष लावतात. याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :agricultureशेतीCrop Insuranceपीक विमा