शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

८२ हजार क्विंटलने वाढ : पणन व टीडीसीची खरीप हंगाम खरेदी

By admin | Updated: February 17, 2015 01:53 IST

गोंदिया : दरवर्षी शेतकऱ्यांच्या धानपिकांना विविध शासकीय धान खरेदी केंद्रांमार्फत महाराष्ट्र

गतवर्षीपेक्षा धानाचे उत्पन्न वाढलेगोंदिया : दरवर्षी शेतकऱ्यांच्या धानपिकांना विविध शासकीय धान खरेदी केंद्रांमार्फत महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाकडून खरेदी करण्यात येते. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे मानले जात होते. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरीप हंगामात तब्बल ८२ हजार ८२ क्विंटल जास्त धान खरेदी करण्यात आली. गेल्यावर्षी म्हणजे सन २०१३-१४ च्या खरीप हंगामात जिल्ह्याला अतिवृष्टीने ग्रासले होते. अशा परिस्थितीत मार्केटिंग फेडरेशनमार्फत जिल्ह्यातील ५४ धान खरेदी केंद्रांवर एकूण तीन लाख ४३ हजार ९७५ क्विंटल धानपिकाची खरेदी झाली होती. तसेच आदिवासी विकास महामंडळामार्फत एकूण ४० धान खरेदी केंद्रांद्वारे तीन लाख २३ हजार १४ क्विंटल धान खरेदी करण्यात आली होती. या दोन्ही एजन्सीकडून जिल्ह्यातील एकूण ९४ धान खरेदी केंद्रांद्वारे सहा लाख ६६ हजार ९८९ क्विंटल धान खरेदी झाली होती. यावर्षी कमी पावसामुळे धानपिकाला फटका बसला. मात्र तरीही गेल्यावर्षीच्या तुलनेत परिस्थिती चांगली असल्याचे धान खरेदीवरून दिसून येते. सन २०१४-१५ मध्ये मार्केटिंग फेडरेशनने ४६ धान खरेदी केंद्रांमार्फत खरिप हंगामात तीन लाख ७२ हजार ८१८.४७ धानाची खरेदी केली आहे. तर आदिवासी विकास महामंडळाने ४० धान खरेदी केंद्रांद्वारे १३ फेब्रुवारी २०१५ पर्यंत एकूण तीन लाख ७६ हजार २१६ क्विंटल धानाची खरेदी केली आहे. यंदा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाने जिल्ह्यातील एकूण ८६ धान खरेदी केंद्रांद्वारे सात लाख ४९ हजार ०३४ क्विंटल धान खरेदी केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही धान खरेदी ८२ हजार ०४५ क्विंटल जास्त झाली आहे. सन २०१३-१४ च्या खरीप हंगामात तीन महिन्यापर्यंत अनेक तालुक्यांना अतिवृष्टीने ग्रासले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटही कोसळले होते. शेतकऱ्यांची पिके पाण्यात बुडून खराब झाली होती. त्यामुळे धानाच्या उत्पादनात घट झाल्याचे व धान खराब झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत होते. त्यामुळेच धानाचे कमी उत्पादन होवून सन २०१३-१४ मध्ये शेतकऱ्यांकडून कमी प्रमाणात धान विक्री करण्यात आली होती. त्या तुलनेत यंदा सन २०१४-१५ मध्ये कमी प्रमाणात मात्र आवश्यक त्या वेळी पाऊस पडल्याने धान उत्पादनात भर झाली. त्यामुळेच शेतकरी अधिक प्रमाणात धान विक्री करू शकल्याने शासनाच्या धान खरेदीत वाढ झाली. (प्रतिनिधी)आदिवासी विकास महामंडळाची खरेदीसन खरेदी (क्विंटल)२००८-०९४,१५,५२०२००९-१०५,५५,९७०२०१०-११४,२५,२७६२०११-१२४,५५,१०३२०१२-१३४,२७,२६३२०१३-१४३,२३,०१४२०१४-१५३,७६,२१६मार्केटिंग फेडरेशनची धान खरेदीसनखरेदी केंद्रखरेदी (क्विंंटल२००८-०९ ३८ २,१२,९५१२००९-१० ४० ३,१३,६८७२०१०-११ ४१ २,३०,७३८२०११-१२ ४२ ४,०१,६२७२०१२-१३ ६९ ४,८८,४१०२०१३-१४ ५४ ३,४३,९७५२०१४-१५ ४६ ३,७२,८१८