शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

जिल्ह्यात ८१० गावांमध्ये दारुबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 23:27 IST

गोंदिया जिल्हा शंभर टक्के दारुबंदी होण्याच्या मार्गावर असून जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांच्या घेतलेल्या आढाव्यानुसार ११०१ गावांपैकी ८१० गावांमध्ये दारुबंदी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देतंटामुक्त मोहिमेला पाठबळ : २९१ गावांना दारुबंदीचा ध्यास

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्हा शंभर टक्के दारुबंदी होण्याच्या मार्गावर असून जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांच्या घेतलेल्या आढाव्यानुसार ११०१ गावांपैकी ८१० गावांमध्ये दारुबंदी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.त्यामुळे दारुबंदी संदर्भात जिल्ह्यातील तंटामुक्त समित्या व महिला मंडळी किती सजग आहेत याची प्रचिती येते. दुर्धर आजारामुळे एकाच व्यक्तिचा मृत्यू होतो. परंतु दारुमुळे दारु पिणाऱ्याचे अख्खे कुटूंब मरते. यासाठी दारु विरोधात एल्गार पुकारण्यात महिला मंडळी अग्रेसर असतात.गावागावांत दारुबंदी विरोधात महिलांनी मोहिम छेडली आहे. ग्रामपंचायत प्रशासनावर दबाव टाकून दारुबंदी न केल्यास तुम्हाला निवडणुकीत सहकार्य करणार नाही, अशा धमक्याही महिला मंडळी गावातील पुढाºयांना देतात. परिणामी आपली मते खराब होणार नाही याची काळजी घेत दोन-चार दारु विक्रेत्यांच्या विरोधात समिकरण तयार करुन गावात दारुबंदीसाठी ठराव घेण्याचा प्रयत्न करतात.जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या लहानसहान ११०१ गावांपैकी ८१० गावांमध्ये दारुबंदी तंटामुक्त समिती व महिला मंडळींनी केल्याची बाब पुढे आली आहे. महाराष्ट्रशासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या शासन निर्णयात गावातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धंदे बंद पाडून त्यांना सन्मानाच्या रोजगाराकडे वळविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचा आधार घेत तंटामुक्त समित्या व महिला मंडळींनी गावातील अवैध धंदे म्हणजे दारुला मुख्य समजून या दारुला आपल्या गावातून हद्दपार करण्याचा मानस बांधला.त्यामुळे जिल्ह्यातील ८१० गावांमध्ये दारुबंदी झाली आहे. दारु विकणाऱ्यांचे धंदे बंद करुन त्यांना गावात सुरु होणाऱ्या रोजगार हमी योजनेच्या कामावर प्राधान्य देण्यात आले आहे. बॉक्सआर्थिक बचत व कलह कमीदारूमुळे पैशांची नासाडी होत असून सोबतच गृह कलह वाढतात.यामुळे महिलांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतल्याने ८१० गावातील दारूबंदी करण्यात आली. या गावातील दारू पिणाऱ्या व्यक्तींची पैशांची बचत झाली व दारूबंदी झाल्याने वादही कमी झाले.दारूबंदीमुळे गावातील वातावरण आता सुधारत आहे. मद्यप्राशन करून गावातील चौकाचौकांत धिंगाणा घालणाºयांनी मंदिराची वाट धरली आहे.२९१ गावांकडे लक्षजिल्हा दारूबंदी करण्यासाठी फक्त २९१ गावे उरली आहे. महिलांनी या गावांमध्ये कंबर कसून दारूबंदी करण्यास सुरूवात केल्यास जिल्ह्यात दारूबंदी करण्यास वेळ लागणार नाही. या गावांत दारूबंदी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने पुढाकार घेऊन महिलांची मदत घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी