शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

७९ कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: February 23, 2015 02:03 IST

गेल्या १५ वर्षापासून हिवतापापासून जिल्हावासीयांचा बचाव करण्याचे काम फवारणी कामगार करीत आहेत. त्यांना स्थायी करण्याचे आदेश आॅक्टोबर २०१३ मध्ये धडकले.

गोंदिया : गेल्या १५ वर्षापासून हिवतापापासून जिल्हावासीयांचा बचाव करण्याचे काम फवारणी कामगार करीत आहेत. त्यांना स्थायी करण्याचे आदेश आॅक्टोबर २०१३ मध्ये धडकले. मात्र, अद्याप त्यासंदर्भात विभागाचे कार्यवाही केली नाही. परिणामी कर्मचारी अद्याप तोकड्या मानधनावरच काम करीत आहेत. तुटपुंज्या वेतनावर त्यांना जीवन जगावे लागत आहे. मागासलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदियात साथीच्या आजारांनी मृत्यूला कवटाळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दरवर्षी पावसाळ्यात चार ते पाच जणांचा हिवतापाने मृत्यू होतो. शासन यावर आळा घालण्याकरिता कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. मात्र, आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे रोगांवर आळा घालण्यात विभागाला सातत्याने अपयश येत आहे.साथीच्या आजारांत कीटकजन्य आजारांवर आळा घालण्याकरिता फवारणी कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाते. मग १५ वर्षापासून कार्यरत ७९ कर्मचारी घरोघरी जाऊन फवारणी करतात. त्यांना मानधन म्हणून १९१ आणि २३० रुपये मोबदला दिला जातो. गोंदिया तालुक्यात २३, आमगाव २७, अर्जुनी मोरगाव ४, देवरीत ८, गोरेगावात ६ कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून त्यांना स्थायी करण्याची मागणी जोर धरत आहे. मागणीवर सकारात्मक भूमिका घेत शासनाने २८ आॅक्टोबर २०१३ रोजी सर्व सफाई कामगारांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. मात्र जिल्ह्यात फवारणीच्या कामावर असलेले कामगार फक्त सातवी ते आठवीपर्यंत शिक्षण घेतले असल्याच्या कारणावरुन त्यांना अद्याप कायम करण्यात आले नाही. आपला जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचविणाऱ्यांची कीव येथील जिल्हा हिवताप विभागाला अद्याप तरी आली नाही. यासंदर्भात जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पाटील यांना विचारले असता फवारणी कामगार दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले नसल्याने कायम करण्यात अडचण येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिक्षणाच्या अटीमुळे कामगारांना रोजंदारीवरच जीवन काढावे लागणार काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. शिवाय सहावा वेतन आयोग, सेवानिवृत्ती आदी प्रश्न देखील प्रलंबित आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिष कळमकर याकडे ते हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे फवारणी कामगार अडचणीत आले आहेत. (तालुका प्रतिनिधी)