शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
4
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
5
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
6
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
7
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
8
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
9
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
11
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
12
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
13
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
14
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
15
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
16
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
17
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
18
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
19
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
20
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?

जिल्ह्यातील ७४ गावे जलसमृद्धीच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 22:11 IST

जलसंवर्धनाच्या कामातून कायमस्वरुपी दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियान : सडक-अर्जुनी तालुक्यातील तीन गावांचे काम प्रगतीपथावर

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :जलसंवर्धनाच्या कामातून कायमस्वरुपी दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. या अभियानाचे पहिल्याच वर्षी सकारात्मक परिणाम दिसून आले. जिल्ह्यात २०१६-१७ या कालावधीत झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे जिल्ह्यातील ७४ गावे जलसमृध्दी होण्याच्या मार्गावर आहेत.शासनाची महत्त्वपूर्ण व महत्वाकांक्षी योजना ‘जलयुक्त शिवार अभियान’ अंतर्गत जिल्ह्यात कोट्यवधींची कामे करण्यात आली. या अभियानांतर्गत सन २०१६-१७ मध्ये गावांना जलसमृद्ध करण्यासाठी जिल्ह्यातील एकूण ७७ गावांची निवड करण्यात आली होती. यापैकी ७४ गावे ९० ते १०० टक्के जलसमृद्ध झाली आहेत. तर उर्वरित तीन गावांमध्ये ५० ते ८० टक्क्यांपर्यंत कामे पूर्ण झाल्याची माहिती आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गोंदिया तालुक्यातील १० गावांची निवड करण्यात आली होती. यातील सर्व १० ही गावे जलसमृद्ध झाली आहेत. यात फुलचूर, चंगेरा, फतेपूर, घिवारी, सोनबिहरी, दासगाव खुर्द, तेढवा, धामनगाव व दतोरा या गावांचा समावेश आहे. तर गोरेगाव तालुक्यातील ११ गावांची निवड करण्यात आली होती. त्या गावांची भूजल पातळी वाढविण्यात यश आले आहे. यात पाथरी, सोनेगाव, सिलेगाव, बघोली, सोनी, कालीमाटी,आंबेतलाव, दवडीपार, नोनीटोला, चांदीटोला या गावांचा समावेश आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसमृद्धीसाठी तिरोडा तालुक्यातील ९ गावांची निवड झालेली होती. यात सोनेगाव, नहरटोला, मुंडीपार, नवेगाव, करटी बु., पालडोंगरी, मरारटोला, चिखली व लोणार या गावांचा समावेश आहे. सर्व जलसमृद्ध झाल्याचे सांगण्यात आले आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातही निवडलेली ९ गावे जलसमृद्ध झाली आहेत. यात सावरटोला, करडगाव-तिडका, बोळदे-करड, परसोडी, गुडरी, डोंगरगाव-कवठा, भिवखिडकी, पिंपळगाव, बोंडगावदेवी या गावांचा समावेश आहे.आमगाव तालुक्यातही ९ गावांची निवड करण्यात आली होती. यात बघेडा, गोसाईटोला, जांभुळटोला, सरकारटोला, सुपलीपार, भजियापार, डोंगरगाव, जांभखरी, बोरकन्हार या गावांचा समावेश असून ते जलसमृद्ध झाली आहेत. देवरी तालुक्यातील निवड झालेल्या ११ गावांमध्ये कोसबी खुर्द, परसोडी, आलेवाडा, कडीकसा, फुटाना, चिल्हाटी, धमदीटोला, घोनाडी, म्हैसुली, बाळापूर, धवलखेडी या गावांचा समावेश असून ते जलसमृद्ध झाले आहेत. तसेच सालेकसा तालुक्यातील निवड झालेले मुरकूडोह, दंडारी, पांढरवाणी, कलरभट्टी, मानागड, कोसमतरा, हलबीटोला व गांधीटोला या गावांचा समावेश आहे. या अभियानांतर्गत सडक-अर्जुनी तालुक्यात गोपालटोली, घटेगाव, पुरकाबोडी, कनेरी, सडक-अर्जुनी, मालीजुंगा, मोगर्रा, गोंगले, मुरपार व पळसगाव या गावांची निवड करण्यात आली होती.यापैकी गोंगले, मुरपार व पळगाव ही तीन गावे वॉटर न्युट्रल झालेली नाहीत. यापैकी एका गावात ८० ते ९० टक्के व दोन गावांत ५० ते ८० टक्के कामे झाली आहेत.२०.५१४ टीसीएम जलसाठाजलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात एकूण दोन हजार ६६६ कामे करायची होती. यापैकी दोन हजार ४८६ कामे पूर्ण झाली असून १८० कामे सद्यस्थितीत प्रगतीपथावर आहेत. यात कृषी विभागाच्या एक हजार ८०६ कामांपैकी एक हजार ६९४ कामे पूर्ण झाली असून ११२ कामे प्रगतीपथावर आहेत. आतापर्यंत झालेल्या कामांवर ३२.५१ कोटी रूपये खर्च झालेले असून पूर्ण झालेल्या कामांमुळे जिल्ह्यात २०.५१४ टीसीएम जलसाठा निर्माण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.