शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ७४ गावे जलसमृद्धीच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 22:11 IST

जलसंवर्धनाच्या कामातून कायमस्वरुपी दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियान : सडक-अर्जुनी तालुक्यातील तीन गावांचे काम प्रगतीपथावर

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :जलसंवर्धनाच्या कामातून कायमस्वरुपी दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. या अभियानाचे पहिल्याच वर्षी सकारात्मक परिणाम दिसून आले. जिल्ह्यात २०१६-१७ या कालावधीत झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे जिल्ह्यातील ७४ गावे जलसमृध्दी होण्याच्या मार्गावर आहेत.शासनाची महत्त्वपूर्ण व महत्वाकांक्षी योजना ‘जलयुक्त शिवार अभियान’ अंतर्गत जिल्ह्यात कोट्यवधींची कामे करण्यात आली. या अभियानांतर्गत सन २०१६-१७ मध्ये गावांना जलसमृद्ध करण्यासाठी जिल्ह्यातील एकूण ७७ गावांची निवड करण्यात आली होती. यापैकी ७४ गावे ९० ते १०० टक्के जलसमृद्ध झाली आहेत. तर उर्वरित तीन गावांमध्ये ५० ते ८० टक्क्यांपर्यंत कामे पूर्ण झाल्याची माहिती आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गोंदिया तालुक्यातील १० गावांची निवड करण्यात आली होती. यातील सर्व १० ही गावे जलसमृद्ध झाली आहेत. यात फुलचूर, चंगेरा, फतेपूर, घिवारी, सोनबिहरी, दासगाव खुर्द, तेढवा, धामनगाव व दतोरा या गावांचा समावेश आहे. तर गोरेगाव तालुक्यातील ११ गावांची निवड करण्यात आली होती. त्या गावांची भूजल पातळी वाढविण्यात यश आले आहे. यात पाथरी, सोनेगाव, सिलेगाव, बघोली, सोनी, कालीमाटी,आंबेतलाव, दवडीपार, नोनीटोला, चांदीटोला या गावांचा समावेश आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसमृद्धीसाठी तिरोडा तालुक्यातील ९ गावांची निवड झालेली होती. यात सोनेगाव, नहरटोला, मुंडीपार, नवेगाव, करटी बु., पालडोंगरी, मरारटोला, चिखली व लोणार या गावांचा समावेश आहे. सर्व जलसमृद्ध झाल्याचे सांगण्यात आले आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातही निवडलेली ९ गावे जलसमृद्ध झाली आहेत. यात सावरटोला, करडगाव-तिडका, बोळदे-करड, परसोडी, गुडरी, डोंगरगाव-कवठा, भिवखिडकी, पिंपळगाव, बोंडगावदेवी या गावांचा समावेश आहे.आमगाव तालुक्यातही ९ गावांची निवड करण्यात आली होती. यात बघेडा, गोसाईटोला, जांभुळटोला, सरकारटोला, सुपलीपार, भजियापार, डोंगरगाव, जांभखरी, बोरकन्हार या गावांचा समावेश असून ते जलसमृद्ध झाली आहेत. देवरी तालुक्यातील निवड झालेल्या ११ गावांमध्ये कोसबी खुर्द, परसोडी, आलेवाडा, कडीकसा, फुटाना, चिल्हाटी, धमदीटोला, घोनाडी, म्हैसुली, बाळापूर, धवलखेडी या गावांचा समावेश असून ते जलसमृद्ध झाले आहेत. तसेच सालेकसा तालुक्यातील निवड झालेले मुरकूडोह, दंडारी, पांढरवाणी, कलरभट्टी, मानागड, कोसमतरा, हलबीटोला व गांधीटोला या गावांचा समावेश आहे. या अभियानांतर्गत सडक-अर्जुनी तालुक्यात गोपालटोली, घटेगाव, पुरकाबोडी, कनेरी, सडक-अर्जुनी, मालीजुंगा, मोगर्रा, गोंगले, मुरपार व पळसगाव या गावांची निवड करण्यात आली होती.यापैकी गोंगले, मुरपार व पळगाव ही तीन गावे वॉटर न्युट्रल झालेली नाहीत. यापैकी एका गावात ८० ते ९० टक्के व दोन गावांत ५० ते ८० टक्के कामे झाली आहेत.२०.५१४ टीसीएम जलसाठाजलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात एकूण दोन हजार ६६६ कामे करायची होती. यापैकी दोन हजार ४८६ कामे पूर्ण झाली असून १८० कामे सद्यस्थितीत प्रगतीपथावर आहेत. यात कृषी विभागाच्या एक हजार ८०६ कामांपैकी एक हजार ६९४ कामे पूर्ण झाली असून ११२ कामे प्रगतीपथावर आहेत. आतापर्यंत झालेल्या कामांवर ३२.५१ कोटी रूपये खर्च झालेले असून पूर्ण झालेल्या कामांमुळे जिल्ह्यात २०.५१४ टीसीएम जलसाठा निर्माण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.