शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

जिल्ह्याला मिळाले ७३ सिमेंट नालाबांध

By admin | Updated: April 27, 2015 00:33 IST

प्रत्येक गावाच्या शिवारात पाणी या उद्देशातून राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे.

जलयुक्त शिवार अभियान : शासनाच्या विशेष निधीतून होणार बांधकामगोंदिया : प्रत्येक गावाच्या शिवारात पाणी या उद्देशातून राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्याला ७३ सिमेंट नालाबांध देण्यात आले आहेत. यासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी देण्यात आला असून त्यातून येत्या जून महिन्यापर्यंत नालाबांध तयार करण्यात येणार आहे. राज्यात दर २ वर्षानंतर काही भागात पाणी टंचाई परिस्थिती निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाई परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे. याकरिता राज्य शासनाने ‘सर्वांसाठी पाणी-टंचाई मुक्त महाराष्ट्र २०१९’ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात पहिल्या टप्यात ९४ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांना जलयुक्त शिवाराच्या मुख्य संकल्पनेत रूजविण्यासाठी १०० कोटींचा अपेक्षीत खर्च आहे. पावसाचे जास्तीत जास्त पाणी गाव शिवारातच अडविणे. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे. शेतीसाठी संरक्षीत पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे. ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनांचे पुनर्जिवीकरण करून पाणी पुरवठ्यात वाढ करणे. भूजल अधिनियमाची अंंमलबजावणी. विकेंद्रीत पाणी साठे तयार करणे. पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे, हे या अभियानाचे उद्देश आहे. यांतर्गत राज्य शासनाकडून राज्यात सहा हजार सिमेंट नालाबांध तयार करण्यात येणार आहे. यातील ७३ सिमेंट नालाबांध जिल्ह्याला देण्यात आले आहेत. हे सिमेंट नालाबांध तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून ९.४० कोटींचा विशेष निधी देण्यात आला आहे. याकरिता आवश्यक निविदा प्रक्रीया पूर्ण करण्यात आली असून येत्या जून महिन्यापर्यंत हे सिमेंट नालाबांध तयार करण्यात येतील. (शहर प्रतिनिधी)कृषी व जलसंधारण विभागाकडे जबाबदारी जिल्ह्यात ७३ सिमेंट नालाबांध तयार करण्याची जबाबदारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व लघुसिंचन (जलसंधारण) विभागाकडे देण्यात आली आहे. जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाने निवड करण्यात आलेल्या गावांतून कोठे या नालाबांधची गरज आहे व संबंधीत संपूर्ण आराखडा तयार करून दिला आहे. यात २३ नालाबांधची जबाबदारी जलसंधारण विभागाकडे देण्यात आली असून यासाठी ३७४.८२ लक्ष रूपये तर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे ५० नालाबांधचे काम देण्यात आले असून यासाठी ५३७.९० लक्ष रूपयांचा निधी अपेक्षीत आहे. अशाप्रकारे ९१२.७२ लक्ष रूपयांच्या या ७३ बांधकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी राज्य शासनाकडून ९.४० कोटी रूपयांच्या विशेष निधीची तरतूदही करण्यात आली आहे. सर्वाधिक नालाबांध गोंदिया तालुक्यात राज्य शासनाकडून जिल्ह्याला देण्यात आलेल्या ७३ सिमेंट नालाबांधसाठी संबंधित विभागाकडून गावांची निवड करण्यात आली आहे. विभागाने निवड केलेल्या गावांच्या यादीत सर्वाधिक गावे गोंदिया तालुक्यातील दिसून येत आहेत. यादीनुसार, गोंदिया तालुक्यातील सर्वाधिक १७ गावे असून त्यानंतर गोरेगाव तालुक्यातील २, तिरोडा तालुक्यातील १९, देवरी तालुक्यातील १०, सडक अर्जुनी तालुक्यातील ५, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २, सालेकसा तालुक्यातील १५ तर आमगाव तालुक्यातील ३ गावांचा समावेश आहे.