शहरं
Join us  
Trending Stories
1
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना; अपघात कॅमेऱ्यात कैद
2
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
3
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
4
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
5
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
6
टाटा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले; फक्त एकाच क्षेत्रात वाढ, गुंतवणूकदारांचे ₹४.३० लाख कोटी पाण्यात!
7
बर्फ, दलदल, वाळवंट अन् पाणी..; कुठेही चालण्यास सक्षम, भारतीय सैन्याला मिळणार BvS10 सिंधू आर्मर्ड व्हेईकल
8
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
9
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
10
सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट
11
VIDEO: क्रिकेटच्या पिचवर पडली विकेट! पलाशनं कायम 'स्मृती'त राहिल असं केलं हटके प्रपोज
12
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
13
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
14
करिश्मा कपूरनं मुंबईतील १ फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई? वाचा
15
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
16
लुटेरी दुल्हन! वय २४ वर्षे अन् केली १५ लग्न; ५२ लाखांचा गंडा, नवऱ्याला सोडून जाते पळून अन्...
17
अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल
18
३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्न करायला नकार! रागाच्या भरात प्रियकर झाला मारेकरी; दोन वेळा गोळ्या झाडल्या पण... 
19
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
20
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

७०० प्रवाशांनी दोन तास रोखली वैनगंगा एक्स्प्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 23:32 IST

आंध्र प्रदेशात जाणाऱ्या मजुरांची संख्या बरीच आहे. कोरबावरून बेंगळुरूकडे जाणाऱ्या वैनगंगा एक्स्प्रेसमध्ये गर्दी झाल्याने गोंदिया रेल्वेस्थानकावर तब्बल दोन तास ही गाडी प्रवाशांनी रोखून धरली. हा प्रकार रविवारी (दि.१६) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडला.

ठळक मुद्देगैरसोय होत असल्याची तक्रार : दुसऱ्या गाडीत जाण्याची केली सोय

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आंध्र प्रदेशात जाणाऱ्या मजुरांची संख्या बरीच आहे. कोरबावरून बेंगळुरूकडे जाणाऱ्या वैनगंगा एक्स्प्रेसमध्ये गर्दी झाल्याने गोंदिया रेल्वेस्थानकावर तब्बल दोन तास ही गाडी प्रवाशांनी रोखून धरली. हा प्रकार रविवारी (दि.१६) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडला.रेल्वे प्रशासनाने ७०० रेल्वे प्रवाश्यांना पुढे जाण्यासाठी गोंदिया बल्लारशा गाडीत व्यवस्था केली. गाडी क्र. १२२५२ वैनगंगा एक्स्प्रेस कोरबावरून बेंगळुरूला जात असताना रविवारी (दि.१६) दुपारी ३ वाजता गोंदियाच्या रेल्वे स्थानकावर आली. या रेल्वे गाडीतील आरक्षीत डब्ब्यामध्ये २ ते तीन हजार मजूर बसले होते. त्या मजुरांना दंड आकारून त्यांना डब्ब्यात बसू दिले. परंतु गर्दी अधिक असल्यामुळे त्या गाडीतील आरक्षीत डब्यांमधील आरक्षण केलेल्या प्रवाश्यांना अडचण झाली. यावरुन गोंधळ उडाला. गोंदिया रेल्वे स्थानक येण्यापूर्वीच प्रवाश्यांमध्ये हमरीतुमरी होऊ लागली. ज्यांचे तिकीट कन्फर्म झाले ते प्रवाशी दुसºया रेल्वे प्रवाश्यांना आपल्या सीटवर बसू देण्यास तयार नव्हते. त्यामुळे सीट जवळील खुल्या जागेत मजूर बसले. परंतु गर्दी एवढी झाली की आरक्षण केलेल्या लोकांना पाय ठेवायला जागा नव्हती. आरक्षीत डब्ब्यात बसलेल्या मजुरांकडून रेल्वे तिकीट निरीक्षकांनी दंड आकारला. त्यामुळे मजुरांना त्याच ठिकाणी राहता आले. परंतु ती गोष्ट आरक्षण केलेल्या लोकांना मान्य नव्हती.आरक्षण केलेले प्रवाशी व सामान्य प्रवाशी यात धावत्या गाडीत शाब्दीक चकमक झाली. अखेर गोंदिया स्थानकावर दुपारी ३ वाजता पोहचलेली वैनगंगा एक्सप्रेस तब्बल दोन तास रोखून धरली. गोंदिया रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने ७०० मजुरांना खाली उतरविण्यात आले. त्या मजुरांना गोंदिया-बल्लारशा रेल्वे गाडीने जाण्याची सोय रेल्वे विभागाने करुन दिली.वैनगंगा एक्सप्रेसला सामान्य बोगी एकच असल्यामुळे ही तारांबळ उडाल्याचे रेल्वे प्रवाश्यांचे म्हणणे आहे. परंतु मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात आल्यामुळे त्यांची तारांबळ उडाल्याचे रेल्वे विभागाचे म्हणणे आहे. छत्तीसगडच्या राजनांदगाव, रायपूर येथील हजारो मजूर त्या गाडीतून प्रवास करीत होते. सायंकाळी ५ वाजता दरम्यान वैनगंगा एक्सप्रेसने पुढच्या प्रवासासाठी रवाना झाल्याची माहिती रेल्वे पोलीस ठाण्याचे ठाणेदार चक्रे यांनी दिली.

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी