शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

६६ निराश्रीतांना ‘रमाई’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2016 00:43 IST

शहरातील ६६ निराश्रितांना त्यांच्या हक्काच्या घरासाठी ‘रमाई’ योजना आधार देणारी ठरली आहे. रमाई आवास योजनेच्या माध्यमातून

९४ लाखांचा निधी : घरकुलांचे तीन हप्ते अडलेगोंदिया : शहरातील ६६ निराश्रितांना त्यांच्या हक्काच्या घरासाठी ‘रमाई’ योजना आधार देणारी ठरली आहे. रमाई आवास योजनेच्या माध्यमातून शहरातील या निराश्रीतांना त्यांचे हक्काचे घर मिळणार आहे. यासाठी ९४ लाख ३५ हजार रूपयांचा निधी देण्यात आला असून या घरकुलांचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती आहे. आपले स्वत:चे हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. जीवनात काही असो-नसो मात्र डोक्यावर स्वत:चे छत ही अत्यंत महत्वाची बाब आहे. अशात ज्यांच्याकडे स्वत:चे घर आहे तो आज नशिबवान समजला जातो. कारण आजच्या महागाईला बघता स्वत:चे घर बांधणे सर्वाच्याच आवाक्यात राहिलेले नाही. त्यातही हातावर कमावून खाणाऱ्यांचे तर सोडूनच द्यावे. अशा निराश्रीत गरजूंसाठी शासनाने ‘रमाई आवास योजना’ सुरू केली आहे. ही योजना अशा निराश्रीतांसाठी त्यांना हक्काचे घरकूल मिळवून देणारी ठरत आहे. अनुसूचित जातीतील दरिद्रय रेषेखालील(बीपीएल) व दारिद्रय रेषेवरील (एपीएल) दोन्ही घटकांसाठी ही योजना शासन राबवित आहे. यात बीपीएलसाठी १.५० लाखांचे तर एपीएलसाठी १.३५ लाखांचे अनुदान दिले जाते. विशेष म्हणजे या योजनेंतर्गत शहरातील ६६ निराश्रीतांना सन २०१५-१६ या वर्षात घरकूल मंजूर करण्यात आले आहे. यात ३५ लाभार्थी बीपीएल असून ३१ लाभार्थी एपीएलचे आहेत. यासाठी शासनाकडून ५२.५० लाख रूपये बीपीएलसाठी तर ४१.८५ हजार रूपये एपीएलसाठी उपलब्ध करवून देण्यात आले आहेत. (शहर प्रतिनिधी)