शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
11
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
12
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
13
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
14
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
15
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
16
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
17
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
18
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
19
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
20
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार

लसीकरणासाठी वेळेत न पोहचल्याने ६ हजार डोस गेले वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 5:00 AM

केंद्र शासनाच्या आदेशान्वये जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.  दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षावरील सर्वांना लसीकरणास सुरुवात करण्यात आली. तर १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८३ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनोंदणी करुन नागरिक लसीकरणाकडे पाठ : ग्रामीण भागात सर्वाधिक प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. व्यापक जनजागृतीनंतर सुध्दा नागरिक लसीकरण केंद्रावर पोहचत नसल्याने मोठ्या प्रमाणात डोस वाया जात आहे. लसीकरणासाठी नागरिक वेळेत न पोहचल्याने आतापर्यंत तब्बल ६०५७ डोस वाया गेले आहे. केंद्र शासनाच्या आदेशान्वये जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.  दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षावरील सर्वांना लसीकरणास सुरुवात करण्यात आली. तर १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८३ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये अद्यापही लसीकरणाबाबत गैरसमज असल्याने ते लसीकरणासाठी केंद्रावर पोहचत नसल्याचे चित्र आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात लसींचे डोस वाया जात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६०५७ डोस वाया गेले असून यात ३.१८ टक्के आहे. यात काेविशिल्डचे २७४१ (४.३२) टक्के व कोव्हॅक्सिनचे ३३०० डोस वाया गेले. हे डोस वाया गेले नसते तर एका गावातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असते. सध्या सर्व लसींचा तुटवडा आहे. अशात मोठ्या प्रमाणात डोस वाया जात असल्याचे बिकट चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी नोंदणी केल्यानंतर लसीकरण केंद्रावर पोहचत लसीकरण करुन घ्यावे, त्यामुळे डोस वाया जाणे टाळण्यास मदत होईल आणि अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करणे शक्य होईल. ग्रामीण भागात अफवांचा बाजार - जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोविड लसीकरणाला घेऊन बऱ्याच अफवा आहेत. त्यामुळे भीतीमुळे नागरिक लसीकरणासाठी केंद्रावर पोहचत नसल्याचे चित्र आहे. कोरोना विरुध्द लढ्यात लसीकरण हे महत्वपूर्ण शस्त्र असून नागरिकांनी बिनधास्तपणे लसीकरणासाठी पुढे येऊन लस घ्यावी, अफवांवर विश्वास ठेवू नये असे आरोग्य विभागाने कळविले आहे. लसीकरणाला येणार गती - बुधवारी जिल्ह्याला १९ हजार २०० लसींचे डोस प्राप्त झाले. गुरुवारी या लसींचे सर्व केंद्राना वितरण करण्यात आले. शनिवारपासून जिल्ह्यातील १४० केंद्रावरुन लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. या सर्व केंद्रावर नागरिकांना लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस