शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

६०० शेतकऱ्यांचे धान संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 20:50 IST

धान पिकाला पाण्याची गरज असल्याने पाटबंधारे विभागाकडून महिनाभरापासून पाणी सोडले जात आहे. मात्र कालवा फुटल्यामुळे सालेकसा तालुक्यातील तीन गावांतील ६०० शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. परिणामी तीन गावातील या शेतकऱ्यांचे धान पीक संकटात आले आहे.

ठळक मुद्देकालवा फुटला : महिनाभरापासून दुरुस्तीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धान पिकाला पाण्याची गरज असल्याने पाटबंधारे विभागाकडून महिनाभरापासून पाणी सोडले जात आहे. मात्र कालवा फुटल्यामुळे सालेकसा तालुक्यातील तीन गावांतील ६०० शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. परिणामी तीन गावातील या शेतकऱ्यांचे धान पीक संकटात आले आहे. धानाला एका पाण्याची गरज असताना पाणी मिळत नसल्याने हे शेतकरी चिंतेत आहेत.सालेकसा तालुक्यात पुजारीटोला धरण आहे. या धरणातून दोन मोठे कालवे शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी तयार करण्यात आले. एक कालवा महाराष्ट्रात तर दुसरा कालवा मध्यप्रदेशात जातो. मध्यप्रदेशात जाणारा कालवा सालेकसा तालुक्यातील शेतांना पाणी देत पुढे जातो.सालेकसा तालुक्यातील बोदलबोडी, दरबडा व धानोली या तीन गावातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी तयार करण्यात आलेले छोटे कालवे व वितरीका जागोजागी फुटल्यामुळे या तीन गावातील ६०० शेतकऱ्यांना पाणी मिळू शकले नाही. यंदा पाऊस उशीरा आला. परंतु दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडावे लागले. पिकाला पाण्याची गरज असताना पावसाने १५ दिवस पूर्वीच दडी मारल्यामुळे पिकांसाठी पाणी सोडण्यात आले. महिनाभरापासून कालव्याला पाणी सोडण्यात आले. परंतु या कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळू शकले नाही.कालव्याला पाणी सोडले तेव्हा पहिल्यांदा कालव्यात पाणी आले. परंतु पाण्याचा जोर पाहून जिर्ण झालेले कालवे व वितरीकांच्या पाळी जागोजागी फुटल्या.विशेष करून सालेकसा तालुक्यातील दरबडा, धानोली व बोदलबोडी या तीन ठिकाणी कालवे मोठ्या प्रमाणात फुटल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळू शकले नाही.या संदर्भात शेतकऱ्यांनी कसेबसे फुटलेल्या ठिकाणी माती टाकून पाणी वाया जाऊ नये याची तजविज केली व पाटबंधारे विभागाला कळविले. परंतु सालेकसा येथील पाटबंधारे विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने याकडे लक्ष दिले नाही.वारंवार तक्रार करूनही कालवे दुरूस्त न केल्यामुळे भग्न कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले मात्र शेतात पोहचू शकले नाही.या तीन ठिकाणी फुटला कालवाकालवेदरबडा ते धानोली या दरम्यान तीन ठिकाणी अंगराज कटरे, गुणवंत बिसेन, मनराज पटले या तीन शेतकऱ्यांच्या शेताजवळ कालवे फुटले आहेत. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. या कालव्याची भग्नावस्था पाहून यंदा पाऊस समाधानकारक येऊनही पीक होणार किंवा नाही या चिंतेत शेतकरी आहेत.सालेकसा तालुक्यातील दरबडा, धानोली व बोदलबोडी येथील ६०० शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे. कालवे फुटल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. यासंदर्भात तक्रार करूनही अधिकारी लक्ष देत नाहीत.शारदा पटले,सरपंच, दरबडा (सालेकसा)

टॅग्स :Waterपाणी