शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

६०० शेतकऱ्यांचे धान संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 20:50 IST

धान पिकाला पाण्याची गरज असल्याने पाटबंधारे विभागाकडून महिनाभरापासून पाणी सोडले जात आहे. मात्र कालवा फुटल्यामुळे सालेकसा तालुक्यातील तीन गावांतील ६०० शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. परिणामी तीन गावातील या शेतकऱ्यांचे धान पीक संकटात आले आहे.

ठळक मुद्देकालवा फुटला : महिनाभरापासून दुरुस्तीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धान पिकाला पाण्याची गरज असल्याने पाटबंधारे विभागाकडून महिनाभरापासून पाणी सोडले जात आहे. मात्र कालवा फुटल्यामुळे सालेकसा तालुक्यातील तीन गावांतील ६०० शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. परिणामी तीन गावातील या शेतकऱ्यांचे धान पीक संकटात आले आहे. धानाला एका पाण्याची गरज असताना पाणी मिळत नसल्याने हे शेतकरी चिंतेत आहेत.सालेकसा तालुक्यात पुजारीटोला धरण आहे. या धरणातून दोन मोठे कालवे शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी तयार करण्यात आले. एक कालवा महाराष्ट्रात तर दुसरा कालवा मध्यप्रदेशात जातो. मध्यप्रदेशात जाणारा कालवा सालेकसा तालुक्यातील शेतांना पाणी देत पुढे जातो.सालेकसा तालुक्यातील बोदलबोडी, दरबडा व धानोली या तीन गावातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी तयार करण्यात आलेले छोटे कालवे व वितरीका जागोजागी फुटल्यामुळे या तीन गावातील ६०० शेतकऱ्यांना पाणी मिळू शकले नाही. यंदा पाऊस उशीरा आला. परंतु दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडावे लागले. पिकाला पाण्याची गरज असताना पावसाने १५ दिवस पूर्वीच दडी मारल्यामुळे पिकांसाठी पाणी सोडण्यात आले. महिनाभरापासून कालव्याला पाणी सोडण्यात आले. परंतु या कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळू शकले नाही.कालव्याला पाणी सोडले तेव्हा पहिल्यांदा कालव्यात पाणी आले. परंतु पाण्याचा जोर पाहून जिर्ण झालेले कालवे व वितरीकांच्या पाळी जागोजागी फुटल्या.विशेष करून सालेकसा तालुक्यातील दरबडा, धानोली व बोदलबोडी या तीन ठिकाणी कालवे मोठ्या प्रमाणात फुटल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळू शकले नाही.या संदर्भात शेतकऱ्यांनी कसेबसे फुटलेल्या ठिकाणी माती टाकून पाणी वाया जाऊ नये याची तजविज केली व पाटबंधारे विभागाला कळविले. परंतु सालेकसा येथील पाटबंधारे विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने याकडे लक्ष दिले नाही.वारंवार तक्रार करूनही कालवे दुरूस्त न केल्यामुळे भग्न कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले मात्र शेतात पोहचू शकले नाही.या तीन ठिकाणी फुटला कालवाकालवेदरबडा ते धानोली या दरम्यान तीन ठिकाणी अंगराज कटरे, गुणवंत बिसेन, मनराज पटले या तीन शेतकऱ्यांच्या शेताजवळ कालवे फुटले आहेत. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. या कालव्याची भग्नावस्था पाहून यंदा पाऊस समाधानकारक येऊनही पीक होणार किंवा नाही या चिंतेत शेतकरी आहेत.सालेकसा तालुक्यातील दरबडा, धानोली व बोदलबोडी येथील ६०० शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे. कालवे फुटल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. यासंदर्भात तक्रार करूनही अधिकारी लक्ष देत नाहीत.शारदा पटले,सरपंच, दरबडा (सालेकसा)

टॅग्स :Waterपाणी