शहरं
Join us  
Trending Stories
1
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
2
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
3
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
4
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
5
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
6
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
7
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
8
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
9
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
10
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
11
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
12
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
13
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
14
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
15
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
16
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
17
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
18
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
19
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
20
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...

गतवर्षीची ६० हजार रोपटी ‘खल्लास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 21:30 IST

महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी ४ कोटी वृक्ष लागवड योजना राबविली. या योजनेत जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतींनी २ लाख २१ हजार २०० रोपटी लावली होती. त्यातील ५९ हजार ३९१ रोपटी जिवंत नसल्याची कबुली स्वत: ग्रामपंचायतींनी दिली आहे.

ठळक मुद्दे५४५ ग्रामपंचायतींचे काम : ७३ टक्के रोपटी जगविण्यात पास

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी ४ कोटी वृक्ष लागवड योजना राबविली. या योजनेत जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतींनी २ लाख २१ हजार २०० रोपटी लावली होती. त्यातील ५९ हजार ३९१ रोपटी जिवंत नसल्याची कबुली स्वत: ग्रामपंचायतींनी दिली आहे. म्हणजेच लावलेल्या रोपट्यांपैकी २७ टक्के रोपटी ‘खल्लास’ झाली आहेत.वृक्षारोपणासह त्यांचे संगोपन करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. परंतु वृक्षारोपण करून निसर्गावर सोडून देण्यात आल्यामुळे सन २०१७ मध्ये लावलेल्या रोपट्यांपैकी ५९ हजार ३९१ रोपटी मेली आहेत.यात, आमगाव तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतने २५ हजार ६०० रोपटी लावली होती. त्यातील १६ हजार ६४० रोपटी जिवंत असून ८ हजार ९६० रोपटी मेली असून जीवित रोपट्यांची टक्केवारी ६५ एवढी आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींनी २८ हजार रोपटी लावली होती. यातील १९ हजार १८० रोपटी जिवंत असून ८ हजार ८२० रोपटी मेली असून जिवंत रोपट्यांची टक्केवारी ६८ एवढी आहे.देवरी तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींनी २२ हजार रोपटी लावली होती. त्यातील १८ हजार ५६९ रोपटी जिवंत असून ३ हजार ४३१ रोपटी मेली व जीवित रोपट्यांची टक्केवारी ८४ एवढी आहे.गोंदिया तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींनी ४३ हजार ६०० रोपटी लावली होती. त्यातील ३३ हजार १०३ रोपटी जिवंत असून १० हजार ४९७ रोपटी मेली व जीवंत रोपट्यांची टक्केवारी ८९ एवढी आहे. गोरेगाव तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींनी २२ हजार रोपटी लावली होती.त्यातील १५ हजार ८८५ रोपटी जिवंत असून ६ हजार ११५ रोपटी मेली व जिवंत रोपट्यांची टक्केवारी ७२ एवढी आहे. सालेकसा तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींनी १६ हजार ८०० रोपटी लावली होती. त्यातील ११ हजार ९२८ रोपटी जिवंत असून त्याचे प्रमाण ७१ टक्के एवढे आहे. ४ हजार ८७२ रोपटी मेली. सडक-अर्जुनी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींनी २५ हजार २०० रोपटी लावली होती. त्यातील १८ हजार १४४ रोपटी जिवंत असून ७ हजार ५६ रोपटी मेली व जीवित रोपट्यांची टक्केवारी ७२ एवढी आहे.तिरोडा तालुक्यातील ९५ ग्रामपंचातींनी ३८ हजार रोपटी लावली होती. त्यातील २८ हजार ३६० रोपटी जिवंत असून ९ हजार ६४० रोपटी मेली व जिवंत रोपट्यांची टक्केवारी ७५ एवढी आहे.म्हणजेच जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ५४५ ग्रामपंचातींनी २ लाख २१ हजार २०० रोपटी लावली होती. त्यातील १ लाख ६१ हजार १८० रोपटी जिवंत असून ८ हजार ८०९ रोपटी मेली असून जीवित रोपट्यांचे प्रमाण ७३ टक्के आहे.एकीकडे वृक्षारोपणासाठी शासनाकडून जोर दिला जात असून विविध योजना राबविल्या जात आहेत. तर दुसरीकडे मात्र संवर्धनाकडे दुर्लक्ष असल्यामुळे लावलेली झाडे लोप पावत आहेत.२७ टक्के रोपटी मेलीगोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ग्रामपंचायतींनी वृक्षारोपणाच्या कामात चांगले सहकार्य केले. या कामात सर्वात जास्त हलगर्जी आमगाव तालुक्यात झाला आहे. आमगाव तालुक्यात लावलेली ३५ टक्के रोपटी मेली आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ३२ टक्के, देवरी तालुक्यातील १६ टक्के, गोंदिया तालुक्यातील ११ टक्के, गोरेगाव तालुक्यातील २८ टक्के, सालेकसा तालुक्यातील २९ टक्के, सडक-अर्जुनी तालुक्यातील २८ टक्के, तिरोडा तालुक्यातील २५ टक्के रोपटी मेली. जिल्ह्याची टक्केवारी बघितली असता २७ टक्के रोपटी जगू शकली नाहीत.अनेक ठिकाणी एकाच खड्ड्यात वृक्षारोपणग्रामपंचायतच्या माध्यमातून दरवर्षी एकाच खड्ड्यात वृक्षारोपण होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. शासनाने असे घडू नये म्हणून प्रत्येक खड्ड्यावर सेटेलाईटच्या माध्यमातून नजर असेल व तसे नियंत्रण ठेवले जाईल म्हटले होते. परंतु तसे होताना दिसत नाही. वृक्षलागवड ज्या झपाट्याने होते, त्याच झपाट्याने त्या रोपट्यांच्या संवर्धनासाठी जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग