शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

जिल्ह्यातील ६ तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:49 IST

गोंदिया : जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक आता शमलेला असून, स्थिती नियंत्रणात आली आहे. घटलेल्या दररोजच्या बाधितांच्या आकडेवारीवरून हे दिसून येत ...

गोंदिया : जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक आता शमलेला असून, स्थिती नियंत्रणात आली आहे. घटलेल्या दररोजच्या बाधितांच्या आकडेवारीवरून हे दिसून येत आहे. अशात जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील क्रियाशील रुग्णांची संख्या १०च्या आत आली आहे. यामुळे आता हे ६ तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या शनिवारपर्यंत १४,१८७ पार झाली असून, दररोज थोड्याफार प्रमाणात का होईना, नवीन बाधितांची भर पडत आहे. यावरून आता जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात येत आहे, हेसुद्धा तितकेच खरे आहे. शिवाय जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने आतापर्यंत १३,८७८ रुग्णांनी कोरोनावर मात दिली आहे. यामुळे आता जिल्ह्यात १२७ क्रियाशील रुग्ण उरले आहेत. विशेष म्हणजे, दररोज येणाऱ्या आकडेवारीत १५ - २०च्या आतच नवीन बाधितांची नोंद घेतली जात आहे. त्या तुलनेत कोरोनावर मात करणारे जास्त येत असल्याने क्रियाशील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाव, सालेकसा, देवरी, सडक - अर्जुनी व अर्जुनी - मोरगाव तालुक्यात १०च्या आत क्रियाशील रुग्ण दिसून येत आहेत. यावरून नवीन बाधितांची संख्या अशीच कमी राहिल्यास लवकरच हे तालुके कोरोनामुक्त होणार यात शंका नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, गुरुवारी (दि. २८) जिल्ह्यात एकही बाधित रुग्ण निघाला नव्हता. यावरून जिल्ह्यात कोरोना नक्कीच नियंत्रणात येणार हे स्पष्ट आहे.

-------------------------------------

६४ रुग्ण घरीच अलगीकरणात

जिल्ह्यात सध्या १२७ रुग्ण क्रियाशील असून, जिल्हावासियांसाठी ही बाब नक्कीच आनंदाची ठरत आहे. त्यातही दिलासादायक बाब म्हणजे, क्रियाशील रुग्णांमध्ये ६४ रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. म्हणजेच त्यांची प्रकृती बरी असून, फक्त उपाययोजना म्हणून त्यांना निगराणीत ठेवण्यात आले आहे. ही संख्या अशीच झपाट्याने कमी होत गेल्यास येत्या काही काळात अवघा जिल्हा कोेरोनावर मात करून मुक्त होणार असे चित्र आहे.

---------------------------

उपाययोजनांकडे दुर्लक्ष नकोच

तोंडावर मास्क लावणे, शारीरिक अंतर व स्वच्छता या तीन शस्त्रांमुळे जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर आला आहे. मात्र, अशात आता अतिरेक न करता जिल्हावासीयांनी उपाययोजनांचा आपल्या दैनंदिन जीवनात पुढेही अंमल करणे गरजेचे आहे. यामुळेच आता यापुढेही तोंडावर मास्क व शारीरिक अंतराचे पालन तसेच स्वच्छता ही जीवनातील अविभाज्य बाब बनविण्याची गरज आहे.