शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

जिल्ह्यातील ६ तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:49 IST

गोंदिया : जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक आता शमलेला असून, स्थिती नियंत्रणात आली आहे. घटलेल्या दररोजच्या बाधितांच्या आकडेवारीवरून हे दिसून येत ...

गोंदिया : जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक आता शमलेला असून, स्थिती नियंत्रणात आली आहे. घटलेल्या दररोजच्या बाधितांच्या आकडेवारीवरून हे दिसून येत आहे. अशात जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील क्रियाशील रुग्णांची संख्या १०च्या आत आली आहे. यामुळे आता हे ६ तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या शनिवारपर्यंत १४,१८७ पार झाली असून, दररोज थोड्याफार प्रमाणात का होईना, नवीन बाधितांची भर पडत आहे. यावरून आता जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात येत आहे, हेसुद्धा तितकेच खरे आहे. शिवाय जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने आतापर्यंत १३,८७८ रुग्णांनी कोरोनावर मात दिली आहे. यामुळे आता जिल्ह्यात १२७ क्रियाशील रुग्ण उरले आहेत. विशेष म्हणजे, दररोज येणाऱ्या आकडेवारीत १५ - २०च्या आतच नवीन बाधितांची नोंद घेतली जात आहे. त्या तुलनेत कोरोनावर मात करणारे जास्त येत असल्याने क्रियाशील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाव, सालेकसा, देवरी, सडक - अर्जुनी व अर्जुनी - मोरगाव तालुक्यात १०च्या आत क्रियाशील रुग्ण दिसून येत आहेत. यावरून नवीन बाधितांची संख्या अशीच कमी राहिल्यास लवकरच हे तालुके कोरोनामुक्त होणार यात शंका नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, गुरुवारी (दि. २८) जिल्ह्यात एकही बाधित रुग्ण निघाला नव्हता. यावरून जिल्ह्यात कोरोना नक्कीच नियंत्रणात येणार हे स्पष्ट आहे.

-------------------------------------

६४ रुग्ण घरीच अलगीकरणात

जिल्ह्यात सध्या १२७ रुग्ण क्रियाशील असून, जिल्हावासियांसाठी ही बाब नक्कीच आनंदाची ठरत आहे. त्यातही दिलासादायक बाब म्हणजे, क्रियाशील रुग्णांमध्ये ६४ रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. म्हणजेच त्यांची प्रकृती बरी असून, फक्त उपाययोजना म्हणून त्यांना निगराणीत ठेवण्यात आले आहे. ही संख्या अशीच झपाट्याने कमी होत गेल्यास येत्या काही काळात अवघा जिल्हा कोेरोनावर मात करून मुक्त होणार असे चित्र आहे.

---------------------------

उपाययोजनांकडे दुर्लक्ष नकोच

तोंडावर मास्क लावणे, शारीरिक अंतर व स्वच्छता या तीन शस्त्रांमुळे जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर आला आहे. मात्र, अशात आता अतिरेक न करता जिल्हावासीयांनी उपाययोजनांचा आपल्या दैनंदिन जीवनात पुढेही अंमल करणे गरजेचे आहे. यामुळेच आता यापुढेही तोंडावर मास्क व शारीरिक अंतराचे पालन तसेच स्वच्छता ही जीवनातील अविभाज्य बाब बनविण्याची गरज आहे.