शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

५८१ शाळांना हवी सुरक्षाभिंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 22:04 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांना वर्गखोल्यांची गरज असतानाच सुरक्षा भिंतीचीही गरज असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील ५८१ शाळांना सुरक्षाभिंत हवी असून यातील काही शाळांतील सुरक्षाभिंत तुटलेली आहे. तर काहींना तारांचे कुंपन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी व शाळांची सुरक्षा धोक्यात : जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषदेच्या शाळांना वर्गखोल्यांची गरज असतानाच सुरक्षा भिंतीचीही गरज असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील ५८१ शाळांना सुरक्षाभिंत हवी असून यातील काही शाळांतील सुरक्षाभिंत तुटलेली आहे. तर काहींना तारांचे कुंपन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जिर्ण वर्गखोल्या व सुरक्षाभिंतीचा अभाव या दोन्ही बाबी विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे. मात्र तरिही जिल्हा परिषदेचे या गंभीर बाबींकडे सपशेल दुर्लक्ष आहे.जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा डिजीटल झाल्या असा उदोउदो करण्यात आला. शासनाची कवडीही न लागता लोकांच्या खिशातून पैसा काढून या शाळा डिजीटल करण्यात आल्या. प्रत्येक शाळेतील एकतरी खोली डिजीटल असावी यासाठी शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण विभागाशी संबधीत अधिकारी, पाधिकारी व कर्मचारी यांचा आग्रह होता. आपली मुले ज्या शाळेत शिकत आहेत त्या शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळेल यासाठी लोकांनी स्वत:च्या खिशातील पैसे डिजीटल शाळांसाठी दिले. यातुनच जिल्ह्यातील संपूर्ण शाळा डिजीटल झाल्यात.परंतु वास्तविक परिस्थीती पाहता ‘पुढे पाठ- मागे सपाट’ हीच स्थिती जिल्ह्यात आहे. गोंदिया जिल्ह्यातील १०६९ शाळांपैकी फक्त ४०० शाळांमध्ये पक्की सुरक्षाभिंत आहे. ३६ शाळांची सुरक्षाभिंत तुटलेली आहे. शाळेची सुरक्षाभिंत म्हणून ४२ शाळांमध्ये फक्त तारांचे कुंपन लावण्यात आले. तर १० शाळांच्या सुरक्षाभिंतीचे काम सुरू आहे. सुरक्षाभिंतीची मागणी करूनही जिल्हा परिषदेने सुरक्षाभिंतीची सोय मागील अनेक वर्षांपासून करून दिली नाही. परिणामी, त्याचा पर्याय म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने आपापल्या शाळेत मेहंदीच्या झाडाचे कुंपन तयार केले.जिल्ह्यातील १३२ शाळांमध्ये मेहंदीच्या झाडाचे कुंपन आहे. १६३ शाळांमध्ये सुरक्षाभिंतच नाही. ६ शाळांमध्ये सुरक्षाभिंत म्हणून इतर सोय करण्यात आली. २८० शाळांच्या आजूबाजूला अर्ध्या परिसरात घरे असल्यामुळे त्या शाळांची अर्धी सुरक्षा आपोआपच झाली. परंतु अर्धी सुरक्षा वाऱ्यावर आहे. सुरक्षाभिंती अभावी विद्यार्थ्यांना कधीही धोका होण्याची शक्यता असते. अनेक ठिकाणी शाळा तलावाच्या काठावर आहेत. काही ठिकाणी विद्युत डीपीच्या जवळ आहेत. काही शाळा पहाडावर आहेत. विद्यार्थ्यांना धोका होऊ नये यासाठी प्रत्येक शाळेला सुरक्षाभिंतीची गरज आहे.यासंदर्भात शाळेकडून जि.प.सदस्य, शिक्षण सभापती, जि.प. अध्यक्षांना वारंवार मागणी केली जाते. परंतु गोंदिया जिल्ह्यातील ५८१ शाळा सुरक्षाभिंत विना आहेत.सर्वाधिक शाळा गोंदिया तालुक्यातीलजिल्हा परिषदेच्या आमगाव तालुक्यात एकूण ११६ शाळा असून त्यापैकी ५० शाळांमध्ये सुरक्षाभिंत नाही. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात एकूण १३८ शाळा असून ७८ शाळांमध्ये तसेच देवरी तालुक्यातील एकूण १४४ शाळांपैकी ८५ शाळांमध्ये सुरक्षाभिंत नाही. गोंदिया तालुक्यात एकूण १८८ शाळा असून १०७ शाळांमध्ये, गोरेगाव तालुक्यात एकूण १०९ शाळा असून ५९ शाळांमध्ये सुरक्षाभिंत नाही. सडक-अर्जुनी तालुक्यात एकूण ११५ शाळा असून ५५ तसेच सालेकसा तालुक्यात एकूण १२० शाळा असून ६६ शाळांमध्ये सुरक्षाभिंत नाही. तिरोडा तालुक्यात एकूण १३९ शाळा असून ८१ शाळांमध्ये सुरक्षाभिंत नाही. अशाप्रकारे गोंदिया जिल्ह्यात एकूण १०६९ शाळा असून ५८१ शाळांमध्ये सुरक्षाभिंती नाहीत.१७२ शाळांचा वीज पुरवठा खंडितवीज बिल न भरल्यामुळे जिल्ह्यातील १७२ शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यात आमगाव तालुक्यातील २७, अर्जुनी-मोरगाव ३, देवरी ३५, गोंदिया २४, गोरेगाव १८, सडक-अर्जुनी १३, सालेकसा ५१ व तिरोडा तालुक्यातील १ शाळेचा समावेश आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीzp schoolजिल्हा परिषद शाळा