शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

५८१ शाळांना हवी सुरक्षाभिंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 22:04 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांना वर्गखोल्यांची गरज असतानाच सुरक्षा भिंतीचीही गरज असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील ५८१ शाळांना सुरक्षाभिंत हवी असून यातील काही शाळांतील सुरक्षाभिंत तुटलेली आहे. तर काहींना तारांचे कुंपन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी व शाळांची सुरक्षा धोक्यात : जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषदेच्या शाळांना वर्गखोल्यांची गरज असतानाच सुरक्षा भिंतीचीही गरज असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील ५८१ शाळांना सुरक्षाभिंत हवी असून यातील काही शाळांतील सुरक्षाभिंत तुटलेली आहे. तर काहींना तारांचे कुंपन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जिर्ण वर्गखोल्या व सुरक्षाभिंतीचा अभाव या दोन्ही बाबी विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे. मात्र तरिही जिल्हा परिषदेचे या गंभीर बाबींकडे सपशेल दुर्लक्ष आहे.जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा डिजीटल झाल्या असा उदोउदो करण्यात आला. शासनाची कवडीही न लागता लोकांच्या खिशातून पैसा काढून या शाळा डिजीटल करण्यात आल्या. प्रत्येक शाळेतील एकतरी खोली डिजीटल असावी यासाठी शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण विभागाशी संबधीत अधिकारी, पाधिकारी व कर्मचारी यांचा आग्रह होता. आपली मुले ज्या शाळेत शिकत आहेत त्या शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळेल यासाठी लोकांनी स्वत:च्या खिशातील पैसे डिजीटल शाळांसाठी दिले. यातुनच जिल्ह्यातील संपूर्ण शाळा डिजीटल झाल्यात.परंतु वास्तविक परिस्थीती पाहता ‘पुढे पाठ- मागे सपाट’ हीच स्थिती जिल्ह्यात आहे. गोंदिया जिल्ह्यातील १०६९ शाळांपैकी फक्त ४०० शाळांमध्ये पक्की सुरक्षाभिंत आहे. ३६ शाळांची सुरक्षाभिंत तुटलेली आहे. शाळेची सुरक्षाभिंत म्हणून ४२ शाळांमध्ये फक्त तारांचे कुंपन लावण्यात आले. तर १० शाळांच्या सुरक्षाभिंतीचे काम सुरू आहे. सुरक्षाभिंतीची मागणी करूनही जिल्हा परिषदेने सुरक्षाभिंतीची सोय मागील अनेक वर्षांपासून करून दिली नाही. परिणामी, त्याचा पर्याय म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने आपापल्या शाळेत मेहंदीच्या झाडाचे कुंपन तयार केले.जिल्ह्यातील १३२ शाळांमध्ये मेहंदीच्या झाडाचे कुंपन आहे. १६३ शाळांमध्ये सुरक्षाभिंतच नाही. ६ शाळांमध्ये सुरक्षाभिंत म्हणून इतर सोय करण्यात आली. २८० शाळांच्या आजूबाजूला अर्ध्या परिसरात घरे असल्यामुळे त्या शाळांची अर्धी सुरक्षा आपोआपच झाली. परंतु अर्धी सुरक्षा वाऱ्यावर आहे. सुरक्षाभिंती अभावी विद्यार्थ्यांना कधीही धोका होण्याची शक्यता असते. अनेक ठिकाणी शाळा तलावाच्या काठावर आहेत. काही ठिकाणी विद्युत डीपीच्या जवळ आहेत. काही शाळा पहाडावर आहेत. विद्यार्थ्यांना धोका होऊ नये यासाठी प्रत्येक शाळेला सुरक्षाभिंतीची गरज आहे.यासंदर्भात शाळेकडून जि.प.सदस्य, शिक्षण सभापती, जि.प. अध्यक्षांना वारंवार मागणी केली जाते. परंतु गोंदिया जिल्ह्यातील ५८१ शाळा सुरक्षाभिंत विना आहेत.सर्वाधिक शाळा गोंदिया तालुक्यातीलजिल्हा परिषदेच्या आमगाव तालुक्यात एकूण ११६ शाळा असून त्यापैकी ५० शाळांमध्ये सुरक्षाभिंत नाही. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात एकूण १३८ शाळा असून ७८ शाळांमध्ये तसेच देवरी तालुक्यातील एकूण १४४ शाळांपैकी ८५ शाळांमध्ये सुरक्षाभिंत नाही. गोंदिया तालुक्यात एकूण १८८ शाळा असून १०७ शाळांमध्ये, गोरेगाव तालुक्यात एकूण १०९ शाळा असून ५९ शाळांमध्ये सुरक्षाभिंत नाही. सडक-अर्जुनी तालुक्यात एकूण ११५ शाळा असून ५५ तसेच सालेकसा तालुक्यात एकूण १२० शाळा असून ६६ शाळांमध्ये सुरक्षाभिंत नाही. तिरोडा तालुक्यात एकूण १३९ शाळा असून ८१ शाळांमध्ये सुरक्षाभिंत नाही. अशाप्रकारे गोंदिया जिल्ह्यात एकूण १०६९ शाळा असून ५८१ शाळांमध्ये सुरक्षाभिंती नाहीत.१७२ शाळांचा वीज पुरवठा खंडितवीज बिल न भरल्यामुळे जिल्ह्यातील १७२ शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यात आमगाव तालुक्यातील २७, अर्जुनी-मोरगाव ३, देवरी ३५, गोंदिया २४, गोरेगाव १८, सडक-अर्जुनी १३, सालेकसा ५१ व तिरोडा तालुक्यातील १ शाळेचा समावेश आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीzp schoolजिल्हा परिषद शाळा