शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

५५ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:42 IST

येत्या १५ आॅगस्टला विद्यार्थी गणवेशात ध्वजारोहणाला उपस्थित राहतील, असा दावा जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केला होता.

ठळक मुद्देशिक्षण विभागाने झटकले हात : केवळ २५ हजार विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा

अंकुश गुंडावार ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येत्या १५ आॅगस्टला विद्यार्थी गणवेशात ध्वजारोहणाला उपस्थित राहतील, असा दावा जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केला होता. पण, एकूण ७७ हजार विद्यार्थ्यांपैकी आत्तापर्यंत केवळ २५ हजार विद्यार्थ्यांच्या बँका खात्यात पैसे जमा करण्यात आले. परिणामी ५५ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित असून शिक्षण विभागाने केलेला दावा देखील फोल ठरला आहे.शासनातर्फे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क गणवेश दिले जाते. पूर्वी गणवेशाची रक्कम शिक्षण विभाग व सर्वशिक्षा अभियानाकडे जमा केली जात होती. त्यांच्यामार्फत गणवेशाचे वितरण केले जात होते. पण, यावर्षीपासून शासनाने यात बदल करित गणवेशाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँका खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या ७७ हजार ३८२ आहे. यापैकी आत्तापर्यंत २५ हजार विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडून त्यांच्या खात्यामध्ये गणवेशाची रक्कम जमा करण्यात आली. शिक्षण विभागाने जिल्ह्यातील १०९६ शालेय व्यवस्थापन समित्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण ३ कोटी ९ लाख ५२ हजार रुपयांची रक्कम पंधरा दिवसांपूर्वीच जमा केल्याचा दावा केला आहे. मात्र, अद्यापही ५५ हजार विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडलेच नसल्याची माहिती आहे. परिणामी हे सर्व विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. १५ आॅगस्टला चार दिवसांचा कालावधी शिल्लक असला तरी सलग चार दिवस सुट्टयांमुळे या कालावधीत विद्यार्थ्यांना बँकेत खाते उघडता येणार नाही. परिणामी १५ आॅगस्टला गणवेशात ध्वजारोहणाला उपस्थित राहण्याचे हजारो विद्यार्थ्यांचे स्वप्न अपूर्णच राहणार असल्याचे चित्र आहे.चारशे रुपयांत दोन गणवेश शिवायचे कसेशासनाने विद्यार्थ्यांना दोन गणवेश खरेदीसाठी प्रती विद्यार्थी ४०० रुपये या प्रमाणे निधी उपलब्ध करुन दिला. मात्र गणवेशाचे कापड आणि शिलाईचा खर्च हा सातशे रुपयांच्यावर आहे. त्यामुळे आधीच गरिबीत जीवन जगत असलेल्या पालकांसमोर चारशे रुपयांत दोन गणवेश खरेदी करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.शालेय व्यवस्थापन समितीकडे बोटजि. प. शिक्षण विभाग व सर्व शिक्षा अभियानाने शासनाच्या निर्देशानुसार गणवेशासाठी आलेला निधी शालेय व्यवस्थापन समित्यांच्या खात्यात जमा केला. मात्र यानंतर तो निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये वेळीच जमा होईल. यासाठी कसलेच नियोजन केले नाही.बँकेच्या सलग सुट्यांनी अडचणजिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्वाधिक शेतकºयांची मुले शिक्षण घेत आहेत. मात्र सध्या शेतीची कामे सुरू असल्याने ते त्यामध्ये व्यस्त आहे. थोडी ऊसंत मिळाली की बँकेत जाऊन खाते उघडू अशी त्यांची मानसिकता होती. मात्र शनिवार ते मंगळवारपर्यंत बँका सलग चार दिवस बंद असल्याने विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.