शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

तलावांत ५० टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2016 01:54 IST

पूर्वीपासून जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून सर्वत्र ओळखले जाते. जिल्ह्यात शेकडो लहान-मोठे तलाव आहेत

पाणीसाठ्यात घट : मासेमारी व्यवसाय ठप्प रावणवाडी : पूर्वीपासून जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून सर्वत्र ओळखले जाते. जिल्ह्यात शेकडो लहान-मोठे तलाव आहेत व या तलावांच्या भरवशावरच ढिवर समाजाचा मासेमारी व्यवसाय चालत असतो. परंतु आतापर्यंत तलाव पावसाच्या पाण्याने भरलेच नसल्यामुळे पिढीजात मासेमारी व्यवसाय करणाऱ्या ढिवर समाजावर संकट उभे ठाकले आहे. पिढ्यानपिढ्या मासेमारी करणारा भोई ढिवर समाज शासनाच्या उदारमतवादी धोरणामुळे आजही उपेक्षित जीवन जगत आहे. त्यामुळे हा समाज आणि त्याच्या व्यवसायाच्या अस्तीत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय मासेमारी व्यवसाय करणाऱ्या ढिवर समाजाकडे चरितार्थासाठी पर्यायी व्यवसाय करण्याची व्यवस्था नसल्यामुळे ढिवर समाजावर उपासमारीची पाळी आहे. शासनाने जिल्ह्यातील सिंचनाच्या सुविधेकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिले नाही. पण मस्त्य व्यवसायासाठीही आवश्यक ती उपाययोजना केलीच नाही. त्यामुळे सर्वत्र मासेमारी व्यवसाय अडचणीत आला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात लहान-मोठे तलाव अस्तीत्वात आहेत. परंतु आतापर्यंत या तलावांमध्ये पावसाचे पाणी भरलेच नाही. त्यातही शेतीला पाण्याची आवश्यकता वाटली तर काही दिवसांतच ते ही कोरडे पडण्याच्या स्थितीत आहेत. शासनाने तालुक्यातील प्रत्येक तलावात जास्तीतजास्त पाण्याची साठवण व्हावी यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना करणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. तलावांची खोली व पाणी टिकून राहण्याची घनता यावर मासोळ्याचे उत्पादन अवलंबून असते, मात्र जिल्ह्यातील अनेक तलाव व बोड्या अर्धवटच भरल्या असल्यामुळे याचा परिणाम मासेमारी व्यवसायावर झालेला दिसून येत आहे.(वार्ताहर)