शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

तलावांत ५० टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2016 01:54 IST

पूर्वीपासून जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून सर्वत्र ओळखले जाते. जिल्ह्यात शेकडो लहान-मोठे तलाव आहेत

पाणीसाठ्यात घट : मासेमारी व्यवसाय ठप्प रावणवाडी : पूर्वीपासून जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून सर्वत्र ओळखले जाते. जिल्ह्यात शेकडो लहान-मोठे तलाव आहेत व या तलावांच्या भरवशावरच ढिवर समाजाचा मासेमारी व्यवसाय चालत असतो. परंतु आतापर्यंत तलाव पावसाच्या पाण्याने भरलेच नसल्यामुळे पिढीजात मासेमारी व्यवसाय करणाऱ्या ढिवर समाजावर संकट उभे ठाकले आहे. पिढ्यानपिढ्या मासेमारी करणारा भोई ढिवर समाज शासनाच्या उदारमतवादी धोरणामुळे आजही उपेक्षित जीवन जगत आहे. त्यामुळे हा समाज आणि त्याच्या व्यवसायाच्या अस्तीत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय मासेमारी व्यवसाय करणाऱ्या ढिवर समाजाकडे चरितार्थासाठी पर्यायी व्यवसाय करण्याची व्यवस्था नसल्यामुळे ढिवर समाजावर उपासमारीची पाळी आहे. शासनाने जिल्ह्यातील सिंचनाच्या सुविधेकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिले नाही. पण मस्त्य व्यवसायासाठीही आवश्यक ती उपाययोजना केलीच नाही. त्यामुळे सर्वत्र मासेमारी व्यवसाय अडचणीत आला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात लहान-मोठे तलाव अस्तीत्वात आहेत. परंतु आतापर्यंत या तलावांमध्ये पावसाचे पाणी भरलेच नाही. त्यातही शेतीला पाण्याची आवश्यकता वाटली तर काही दिवसांतच ते ही कोरडे पडण्याच्या स्थितीत आहेत. शासनाने तालुक्यातील प्रत्येक तलावात जास्तीतजास्त पाण्याची साठवण व्हावी यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना करणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. तलावांची खोली व पाणी टिकून राहण्याची घनता यावर मासोळ्याचे उत्पादन अवलंबून असते, मात्र जिल्ह्यातील अनेक तलाव व बोड्या अर्धवटच भरल्या असल्यामुळे याचा परिणाम मासेमारी व्यवसायावर झालेला दिसून येत आहे.(वार्ताहर)