शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणी करण्यास उरले ५ दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:28 IST

देवरी : महाराष्ट्र सरकारने यावर्षी ई-पीक पाहणी ॲप सुरू केले आहे. महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी ...

देवरी : महाराष्ट्र सरकारने यावर्षी ई-पीक पाहणी ॲप सुरू केले आहे. महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प अख्ख्या महाराष्ट्रासह तालुक्यातही राबविण्यात येत आहे. ‘माझी शेती, माझा सातबारा, माझा पीकपेरा’ या घोषवाक्याच्या आधारे शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी करण्याचा १५ ऑगस्टला श्रीगणेशा झाला आहे. आता या ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणी करण्यास ५ दिवस उरले असूनही शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद दिसून येत आहे.

ई-पीक पाहणी ॲपचे लाँचिंग महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ई-पीक पाहणी ॲप देशाला मार्गदर्शक ठरेल, असे म्हटले होते. आज दररोज हवामानात बदल होत असून कधी अतिवृष्टीमुळे तर कधी पाऊस न पडल्याने पिकांचे नुकसान होत आहे. अशा काळात शासनाला शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देताना अनेक अडचणी येतात. कारण त्यावेळी पंचनामे करणे कठीण असते; पण या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अधिक मदत होणार आहे. ई-पीक पाहणी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य अधिक सोपे आणि सहज करण्याला प्राधान्य देण्यात येईल, असेही बोलले जा आहे; परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद अल्प असल्याने ई-पीक योजना तालुक्याला अपवादच ठरणार आहे.

तालुक्यातील काही गावांंमध्ये पीक पाहणी ॲपला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. तर काही ठिकाणी महसूल प्रशासनाला पीक पाहणी ॲपचा वापर करावा यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी लागत आहे. तालुक्यात तहसीलदार नसल्याने मंडळ अधिकारी, कामगार, तलाठी पीक पाहणी ॲपचा वापर करण्याचे आवाहन करीत आहेत. ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंदवण्यास शेतकऱ्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. पीक पाहणी ॲपमधून नोंदणीची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत आहे. सातबारा उताऱ्यावर ऑनलाइन पद्धतीने खरीप हंगामातील पिकाच्या नोंदणीला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत.

-------------------------

बांधावर शेतकऱ्यांचे प्रबोधन ते विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

तालुक्यात महसूल विभागाचे अधिकारी थेट बांधावर शेतकऱ्यांचे प्रबोधन करीत आहेत की नाही, हाही संभ्रमच आहे. गावातील सुशिक्षित मंडळी, शिक्षक, डाटा ऑपरेटर यांना ई-पीक नोंदणीचे प्रशिक्षण देत आहेत की नाही, हाही संभ्रमच आहे. येत्या ५ दिवसांच्या आत या ॲपद्वारे नोंदी न झाल्यास शासनाकडून नैसर्गिक आपत्ती योजनेतून आर्थिक मदतीला शेतकऱ्यांना मुकावे लागणार आहे.

------------------------------

शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद

तालुक्यातील शेतकऱ्यांचा अद्यापही अल्प प्रमाणात प्रतिसाद आहे. त्यामुळे आता तहसीलदारांच्या अभावामुळे

मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर कुणाचे वचक नसल्याने गावोगावी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या ई-पीक पाहणी ॲपची माहिती देत खरिपाची पीक नोंदणी करण्याचे आवाहन करीत आहेत की नाही, हाही संभ्रमच आहे.