शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

जिल्हा विकासाचे ५ कोटी ‘लॅप्स’

By admin | Updated: May 27, 2017 00:40 IST

जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असून या जिल्ह्याच्या विकासासाठी शासन देत असलेला निधीसुद्धा जिल्ह्यात वापरता येत नसल्याने

नियोजनाच्या अभावाचे फलित नरेश रहिले । लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असून या जिल्ह्याच्या विकासासाठी शासन देत असलेला निधीसुद्धा जिल्ह्यात वापरता येत नसल्याने तो निधी लॅप्स होतो. परिणामी जिल्ह्याचा विकास खुंटत आहे. गोंदिया जिल्ह्याला महाराष्ट्र शासनाने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी दिलेल्या निधीपैकी ५ कोटी रुपये लॅप्स (व्यपगत) झाला आहे. जिल्ह्याचा विकास खुंटविण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकारी तेवढेच जबाबदार असल्याचे दिसून येते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे गोंदिया जिल्ह्यातील ५ कोटी रुपये लॅप्स झाले आहेत. ३१ मार्चअखेर हा निधी वापरुन काम सुरु करण्याचे आदेश द्यायला हवे होते. परंतु या कार्यालयातील नियोजन अधिकारी, त्यांचे सहकारी व तेथील लिपिक वर्गाच्या अनागोंदी कारभारामुळे गोंदिया जिल्ह्याचे ५ कोटी रुपये लॅप्स झाल्याने आदिवासी जिल्ह्याचा विकास खुंटलेला आहे. एकीकडे गोंदिया जिल्ह्याला नेहमीच कमी निधी दिला जातो. त्यातही आलेला निधी लॅप्स होणे किंवा परत जाणे ही बाब अत्यंत लाजीरवाणी आहे. विकासासाठी आमदारांना त्यांच्या विकास निधीसाठी शासन पैसा देते. परंतु गोंदिया जिल्ह्यातील आमदारांनीही यंदा उदासिनता दाखवून निधी खर्च केला नाही. नियोजन विभागाचे असहकार्य आमदारांना राहिले. मात्र एकही आमदार या नियोजन विभागाला धारेवर घेत नाही. यामुळे पाणी कुठे मुरते, याचा शोध जनतेलाच करावा लागणार आहे. जिल्हा नियोजनाचे ३ कोटी ८७ लाख २४ हजार रुपये लॅप्स झाले आहेत. त्यात सूक्ष्म सिंचन योजनेचे ४ लाख ११ हजार, मृद संधारणद्वारे जमिनीचा विकास करण्यासाठी असलेले २ लाख ९४ हजार ३७९ रुपये, जिल्हा माहितीचे २० हजार २३० रुपये, दोन स्तरावरील शिक्षण ४ हजार रुपये, उर्जा विकासाचे ३ हजार ९८० रुपये, नाविण्यपूर्ण योजनेचे ६६ लाख ५१ हजार ७४० रुपये, शासकीय निवासी इमारतीचे २६ लाख २० हजार ७८२ रुपये, बागायती रोपमळे ५ लाख १० हजार, औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील यंत्र सामुग्री पुरविण्याचे ८१६ रुपये, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. (५ योजना) चे ३१ हजार रुपये, दलितेतर तसेच नगरोत्थानचे १७ लाख ६४ हजार ३८७ रुपये, पर्यटन विकास व मुलभूत सुविधा ४९ लाख रुपये, वन्यजीवन व्यवस्थापन व निसर्ग संरक्षण योजनेचे ६८ लाख रुपये, व्यायाम शाळेच्या विकासाचे १५ लाख २६ हजार तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे १ कोटी ३१ लाख ८७ हजार ७०९ रुपये असे ३ कोटी ८७ लाख २४ हजार रुपये जिल्हा नियोजनाचे व्यपगत (लॅप्स) झाले आहेत. त्यामुळे ही रक्कम दुसऱ्या वर्षी पुन्हा मिळणे शक्य नाही. मागच्याच वर्षात विकासाचे ५ कोटी रुपये लॅप्स झाले. त्यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. परंतु या संदर्भात लोकप्रतिनिधी काहीही बोलताना दिसत नसल्याचे चित्र जिल्ह्यात उभे आहे. जिल्ह्याचा विकास खुंटविण्यासाठी कारणीभूत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्न गोंदिया जिल्हावासीयांचा जिल्हाधिकाऱ्यांना आहे. - पुढच्या वर्षासाठी १३५ कोटींची मागणी सन २०१६-१७ या वर्षासाठी जिल्हा प्रशासनाला ११७ कोटी ७९ लाख ५३ हजार रुपये मिळाले होते. त्यापैकी जिल्हा नियोजनाचे ३ लाख ८७ लाख २४ हजार तर आमदारांचे १ कोटी १० लाख ४९ हजार ५२६ रुपये लॅप्स झाले. सन २०१७-१८ या वर्षासाठी जिल्हा प्रशासनाने १३५ कोटी ६८ लाखांची मागणी शासनाकडे केली आहे. शासनाने मागणीच्या तुलनेत पैसाही पुरविला तरी ढिसाळ नियोजनामुळे आदिवासी व नक्षलग्रस्त असलेल्या गोंदिया जिल्ह्याचा विकास खुंटविण्यात अधिकारी कसलीही कसर सोडत नसल्याचे चित्र या ५ कोटीच्ंया रकमेवरुन दिसून येते. सहा आमदारांचे १ कोटी १० लाख लॅप्स सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात गोंदिया जिल्ह्यात ६ आमदारांचा निधी होता. त्यापैकी सर्वांचा निधी शंभर टक्के जनकल्याणासाठी खर्च झाला नाही. गोंदियाच्या विकासासाठी बाहेरचा निधी आणण्यासाठी झटणारे गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या स्थानिक विकास निधीचे १४ लाख ८८ हजार रुपये लॅप्स झाले. तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांचेही ४७ लाख १ हजार ६८३ रुपये लॅप्स झाले. आदिवासी व नक्षलग्रस्त भागाचे प्रतिनिधित्व करणारे आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांचाही १ लाख ९५ हजार ४७० रुपयांचा निधी लॅप्स झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचेही ४ लाख ५० हजार रुपये लॅप्स झाले आहेत. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात माजी विधान परिषद सदस्य राजेंद्र जैन यांचे १५ लाख १४ हजार ३७३ रुपये तर वर्तमान विधान परिषदेचे सदस्य आमदार परिणय फुके यांचे २७ लाख असे एकूण १ कोटी १० लाख ४९ हजार ५२६ रुपये परत गेले आहेत.