शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
2
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
3
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
4
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
5
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
6
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
7
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
8
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
9
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
10
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
11
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
12
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
13
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
14
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
15
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
16
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
19
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
20
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

जिल्ह्यातील ४९ तलाव झाले गाळमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 22:22 IST

महाराष्टÑ शासनाने शेतकºयांची जमीन सुपीक व्हावी. यासाठी धरण व तलावातील गाळ त्यांच्या शेतात नेण्याची योजना आणली. त्यामुळे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेला सन २०१७ मध्ये राबविण्यात आले.

ठळक मुद्दे२९० तलाव व धरणांची केली होती निवड : २४ हजार घनमीटर गाळ काढला

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्टÑ शासनाने शेतकºयांची जमीन सुपीक व्हावी. यासाठी धरण व तलावातील गाळ त्यांच्या शेतात नेण्याची योजना आणली. त्यामुळे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेला सन २०१७ मध्ये राबविण्यात आले. यातंर्गत लोकसहभागातून ४९ तलाव/धरण गाळमुक्त करण्यात आले.शासनाने लोकसहभागातून धरण व तलावांची सिंचन क्षमता वाढविण्यासाठी त्या धरण किंवा तलावातील गाळ मोफत काढला जावा, तो गाळ शेतकºयांच्या शेतात टाकल्यास शेत जमीन सुपीक होईल. या हेतूने शासनाने ही योजना राबविण्याचे निर्देश लघू सिंचन विभागाला दिले. गोंदिया जिल्ह्यातील २९० तलाव व धरणांमधील गाळ काढण्यासाठी निवडण्यात आले होते. यापैकी केवळ ४९ धरणातील गाळ काढण्यात आल्याची माहिती लघू सिंचन विभाग जि.प.गोंदियाने दिली आहे.तिरोडा तालुक्यातील ५० तलावांची निवड केली होती. त्यातील ८ तलाव गाळमुक्त करण्यात आले. गोरेगाव तालुक्यातील २३ तलावांची निवड केली होती. त्यातील ३ तलाव गाळमुक्त झाले. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १० तलावांची निवड केली होती. त्यातील ७ तलाव गाळमुक्त झाले.गोंदिया तालुक्यातील १८ तलावांची निवड केली होती. त्यातील ३ तलाव गाळमुक्त करण्यात आले. आमगाव तालुक्यातील ५० तलावांची निवड केली होती. त्यातील ९ तलाव गाळमुक्त करण्यात आले. सडक-अर्जुनी तालुक्यातील ३९ तलावांची निवड केली होती. त्यातील ७ तलाव गाळमुक्त करण्यात आले. सालेकसा तालुक्यातील ५० तलावांची निवड केली होती. त्यातील ८ तलाव गाळमुक्त करण्यात आले. देवरी तालुक्यातील ५० तलावांची निवड केली होती. त्यातील ४ तलाव गाळमुक्त करण्यात आले. अशा एकूण जिल्ह्यातील २९० तलावांची निवड केली होती. त्यातील ४९ तलाव गाळमुक्त करण्यात आले.३७२ शेतकºयांनी घेतला लाभगाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या अभियानाचा लाभ गोंदिया जिल्ह्यातील ३७२ शेतकºयांनी घेतला आहे. या ४९ तलावातील २४ हजार ९३ घनमीटर गाळ काढण्यात आला. मात्र यातील ४४.०३ हेक्टर शेतीत गाळ टाकण्यात आला. गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार याचा लाभ फक्त मोजक्याच शेतकºयांनी घेतला.१३ लाख २५ हजार रुपयांचा खर्चगाळमुक्त तलाव हा उपक्रम लोक सहभागातून राबवायचा होता. परंतु प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे लोकसहभागातून एकही तलाव गाळमुक्त होऊ शकला नाही. यासाठी ४९ तलाव गाळमुक्त करण्यासाठी तलावातील गाळ काढणे व त्या गाळाची वाहतूक करणे यासाठी १३ लाख २५ हजार रुपये लोकसहभागातून खर्च झाल्याचे लघु सिंचन विभागाचे म्हणने आहे.