शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

४७ गावांचा पाणी पुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 22:22 IST

आमगाव तालुक्यातील ४७ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. तर मागील दोन दिवसांपासून ४७ गावातील पाणी पुरवठा ठप्प झाल्याने गावकऱ्यांना दूरवर भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देपाईपलाईन फुटली : हजारो लिटर पाण्याचा अपव्यय, दुरुस्तीचे काम सुरू, बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमगाव तालुक्यातील ४७ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. तर मागील दोन दिवसांपासून ४७ गावातील पाणी पुरवठा ठप्प झाल्याने गावकऱ्यांना दूरवर भटकंती करावी लागत आहे.आमगाव तालुक्यातील ४७ गावांना बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. या योजनेची पाईप लाईन किडंगीपार नाल्याजवळ शुक्रवारी दोन ठिकाणी फुटली. परिणामी हजारो लिटर पाणी शेतांमध्ये वाहून गेली. त्यामुळे पाईप लाईन परिसरातील शेतांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. रविवारी सकाळी सुध्दा या योजनेच्या फुटलेल्या पाईप लाईनमधून पाण्याचा अपव्यय सुरूच होता. संबंधित विभागाने पाईप लाईन दुरूस्तीचे काम सुरू आहे. मात्र किडंगीपार नाल्याजवळ पाईप लाईनला मोठे भगदाड पडले असल्याने दुरूस्तीच्या कामाला विलंब लागत आहे. या योजनेतंर्गत आमगाव तालुक्यातील ४७ गावांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र पाईप लाईन फुटली असल्याने मागील दोन दिवसांपासून या गावांचा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे भर पाणीटंचाईच्या कालावधीत नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. ही पाणी पुरवठा योजना बरीच जुनी असल्याने पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन सुध्दा काही ठिकाणी जीर्ण झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे दोन ठिकाणी पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. आमगाव तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई असून या योजनेमुळे ४७ गावातील गावकºयांना पाणीटंचाईवर मात करण्यास काही प्रमाणात मदत झाली होती. मात्र दोन दिवसांपासून या योजनेचा पाणी पुरवठा ठप्प झाल्याने गावातील सार्वजनिक विहिरी, बोअरवेलवरील गर्दी वाढली आहे. पाईप लाईन दुरूस्तीचे काम लवकर पूर्ण न झाल्यास या परिसरातील पाणी टंचाईच्या समस्येत अजून वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पाणीटंचाईच्या समस्येत भरआमगावात तालुक्यातील काही भागात मागील दोन तीन महिन्यापासून पाणी टंचाईची समस्या आहे. गावातील महिला दोन तीन कि.मी.अंतरावरुन पाणी आणून आपली तहान भागवित आहेत. मात्र बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन फुटल्याने या परिसरातील पाणी टंचाईच्या समस्येत पुन्हा वाढ झाली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई