शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

४७ गावांचा पाणी पुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 22:22 IST

आमगाव तालुक्यातील ४७ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. तर मागील दोन दिवसांपासून ४७ गावातील पाणी पुरवठा ठप्प झाल्याने गावकऱ्यांना दूरवर भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देपाईपलाईन फुटली : हजारो लिटर पाण्याचा अपव्यय, दुरुस्तीचे काम सुरू, बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमगाव तालुक्यातील ४७ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. तर मागील दोन दिवसांपासून ४७ गावातील पाणी पुरवठा ठप्प झाल्याने गावकऱ्यांना दूरवर भटकंती करावी लागत आहे.आमगाव तालुक्यातील ४७ गावांना बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. या योजनेची पाईप लाईन किडंगीपार नाल्याजवळ शुक्रवारी दोन ठिकाणी फुटली. परिणामी हजारो लिटर पाणी शेतांमध्ये वाहून गेली. त्यामुळे पाईप लाईन परिसरातील शेतांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. रविवारी सकाळी सुध्दा या योजनेच्या फुटलेल्या पाईप लाईनमधून पाण्याचा अपव्यय सुरूच होता. संबंधित विभागाने पाईप लाईन दुरूस्तीचे काम सुरू आहे. मात्र किडंगीपार नाल्याजवळ पाईप लाईनला मोठे भगदाड पडले असल्याने दुरूस्तीच्या कामाला विलंब लागत आहे. या योजनेतंर्गत आमगाव तालुक्यातील ४७ गावांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र पाईप लाईन फुटली असल्याने मागील दोन दिवसांपासून या गावांचा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे भर पाणीटंचाईच्या कालावधीत नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. ही पाणी पुरवठा योजना बरीच जुनी असल्याने पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन सुध्दा काही ठिकाणी जीर्ण झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे दोन ठिकाणी पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. आमगाव तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई असून या योजनेमुळे ४७ गावातील गावकºयांना पाणीटंचाईवर मात करण्यास काही प्रमाणात मदत झाली होती. मात्र दोन दिवसांपासून या योजनेचा पाणी पुरवठा ठप्प झाल्याने गावातील सार्वजनिक विहिरी, बोअरवेलवरील गर्दी वाढली आहे. पाईप लाईन दुरूस्तीचे काम लवकर पूर्ण न झाल्यास या परिसरातील पाणी टंचाईच्या समस्येत अजून वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पाणीटंचाईच्या समस्येत भरआमगावात तालुक्यातील काही भागात मागील दोन तीन महिन्यापासून पाणी टंचाईची समस्या आहे. गावातील महिला दोन तीन कि.मी.अंतरावरुन पाणी आणून आपली तहान भागवित आहेत. मात्र बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन फुटल्याने या परिसरातील पाणी टंचाईच्या समस्येत पुन्हा वाढ झाली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई