शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

४७९ घरे-गोठ्यांची पडझड

By admin | Updated: September 15, 2016 00:19 IST

शनिवार ते मंगळवार या चार दिवसात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.

सहा जनावरांचा मृत्यू : चार दिवसांतील पावसाच्या थैमानाने आठ घरे जमीनदोस्तगोंदिया : शनिवार ते मंगळवार या चार दिवसात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यातल्या त्यात सालेकसा, देवरी, आमगाव या तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीने ३७८ घरे आणि १०१ गोठ्यांची पडझड झाली. यात आठ घरे पूर्णत: जमीनदोस्त झाली तर सहा जनावरांना प्राणास मुकावे लागले. प्रशासनाने १५ सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला असून या आठवड्यात चार दिवस आलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात लाखोंच्या वित्तहानीसह जनावरांची प्राणहानीसुद्धा झाली. जिल्ह्यात आठ घरे भुईसपाट झाली असून ३७८ घरे अंशत: बाधित झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळाली आहे.विशेष म्हणजे नुकसान झालेल्या भागातील सर्वेक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नुकसानीचा अंदाज आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे उपलब्ध होऊ शकला आहे. तलाठ्याद्वारे सर्वेक्षण व पंचनामा करून तसा अहवाल तहसीलदारांना पाठविला जातो. यानंतर तहसील कार्यालयातून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविला जातो. मात्र अनेक तहसीलदारांकडून नुकसानीचा संपूर्ण अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास अद्याप उपलब्ध झालेला नाही. मात्र सर्वच तालुक्यांमध्ये या पावसामुळे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.या पावसामुळे सहा जनावरांचा मृत्यू झाला. यात दोन शेळ्या, तीन बैल व एका लहान म्हशीचा समावेश आहे. तीन बैलांपैकी आमगाव तालुक्यात पुरामुळे वाहून गेलेल्या बैलबंडीला जुंपलेल्या दोन बैलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण ३७८ घरांचे अंशत: नुकसान झालेले आहे. आठ घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. त्यातच नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या १०१ वर पोहोचली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव तालुक्यात अंशत: घरे बाधित होवून तब्बल एक लाख १५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. आमगाव तालुक्यात घरे अंशत: बाधित होवून अंदाजे ६९ हजार रूपयांचे नुकसान व एक बैलजोडी वाहून गेल्याने अंदाजे ४० हजार रूपये असे जवळपास एक लाख नऊ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. सडक-अर्जुनी तालुक्यात घरांचे अंशत: नुकसान होवून सहा हजार ५०० रूपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. सालेकसा, देवरी, अर्जुनी-मोरगाव, तिरोडा इतर तालुक्यात कितीची वित्तहानी झाली याचा अहवाल उपलब्ध होणे बाकीच आहे. (प्रतिनिधी)सरासरीच्या ७९ टक्के पाऊसजिल्ह्यात १ जून ते १४ सप्टेबर २०१६ या कालावधीत ३१५७२.५ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ९५६.७ मि.मी. इतकी आहे. बुधवार दि.१४ सप्टेबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ५४६.४ मि.मी. इतका पाऊस पडला असून त्याची सरासरी १६.५ मि.मी. इतकी आहे. आजपावेतो जिल्ह्यात ७९ टक्के पाऊस झाला आहे. १४ सप्टेबर रोजी सकाळी ८ वाजतापर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे आहे. त्याची सरासरी कंसात दर्शविण्यात आली आहे. गोंदिया तालुका- २५४ मि.मी. (३६.३), गोरेगाव तालुका- १६.२ मि.मी. (५.४), तिरोडा तालुका- ११३.४ मि.मी. (२२.७), अर्जुनी मोरगाव तालुका- ५५ मि.मी. (११.०), देवरी तालुका- ३७.४ मि.मी. (१२.५), आमगाव तालुका- ४३.४ मि.मी. (१०.८), सालेकसा तालुका- २७ मि.मी. (९.०) आाणि सडक अर्जुनी तालुका- निरंक, असा एकूण ५४५.६ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी १६.५ मि.मी. इतकी आहे.