शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

४६७ रेल्वे फाटक देतात मृत्यूला आमंत्रण

By admin | Updated: July 15, 2014 00:04 IST

दरवर्षी रेल्वेला हजारो कोटींचा नफा होत असल्याचे सांगण्यात येत असले, तरी रेल्वे विभाग नफ्यात की तोट्यात याची माहिती प्रवाशांना झाली नाही. दारिद्रयरेषेखालील असलेली नागपूर विभागाची

गोंदिया : दरवर्षी रेल्वेला हजारो कोटींचा नफा होत असल्याचे सांगण्यात येत असले, तरी रेल्वे विभाग नफ्यात की तोट्यात याची माहिती प्रवाशांना झाली नाही. दारिद्रयरेषेखालील असलेली नागपूर विभागाची रेल्वे नागरिकांना मृत्यूच्या दाढेत ओढवणारी आहे. नागपूर विभागातील ७१५ रेल्वे फाटकांपैकी ४६७ रेल्वे फाटक मानवविरहित आहेत. यामुळे निर्मनुष्य रेल्वे फाटकांवर मोठे अपघात घडत आहेत. रेल्वेला दरवर्षी हजारो कोटींचा फायदा होत असल्याचे आर्थिक संकल्पात सांगितले जाते. रेल्वे प्रवासी भाडे वाढवून आता रेल्वने मोठा नफा कमविण्याचा प्रयत्न केला. रेल्वेला मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या महसूलच्या रकमेतून रेल्वेस्थानकांना मॉडल स्टेशन बनविण्यासाठी रेल्वे विभागाचे प्रयत्न सुरू आहे. परंतु मानवविरहित रेल्वे फाटकांवर मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात रेल्वे विभाग अपयशी ठरला आहे.त्या मानवविरहित रेल्वे फाटकांवर मनुष्यबळाची व्यवस्था न करता नागरिकांनीच या रेल्वे फाटकावरून ये-जा करताना गाडी येत आहे का याची खात्री करूनच रुळ ओलांडावे लागते. गोंदिया ते चंद्रपूर या रेल्वे रूळावर ८९ रेल्वे फाटक मानवविरहित आहेत. चंद्रपूर ते नागपूर या रूळावर १६६ रेल्वे फाटक मानवविरहित आहेत तर रामटेक, बिरसोला, रुमनापूर, लामठा, बालाघाट, वारासिवनी, गोवारीघाट, नैनपूर, चिरालडोंगरी, इतवारी व खापरखेडा या रेल्वे रुळावर २१२ रेल्वे फाटक मानवविरहित आहेत. रेल्वे विभागातर्फे अनावश्यक बाबीवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येते. परंतु अत्यावश्यक ठिकाणी रेल्वे विभाग खर्च करण्यात मागे-पुढे पाहत आहे. गोंदिया ते चंद्रपूरदरम्यान असलेल्या मानवविरहित फाटकांवर मागील ७ वर्षात १५ अपघात घडले. यात मोठ्या प्रमाणात प्राणहानी व वित्तहानी झाली. रेल्वे रुळालगत झाडे-झुडपे असल्याने मानवविरहित फाटक ओलांडणाऱ्या वाहनांना गाडी येते किंवा नाही याची माहितीही होत नाही. परिणामी मानवविरहित फाटकांवर अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे. ७१५ पैकी ४६७ रेल्वे फाटक मानवविरहित आहेत. तर काही फाटकांव रेल्वे विभागाने मोबाईल मॅन ठेवले आहेत. या मानवविरहीत फाटकावर फाटक बसविण्यात आले नाही. किंवा मनुष्यबळाची निर्मीती केली नाही त्यामुळे दरवर्षी या फाटकांवर अपघात घडतात. (तालुका प्रतिनिधी)