शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कारापोटी मिळणार ४६ कोटी ६० लाख

By admin | Updated: September 10, 2014 23:48 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने गावात शांतता व समृद्धीची लाट आणली. ही मोहीम राबविणाऱ्या गावांना शासनाने लोकसंख्येच्या आधारावर पुरस्कार वाटले. सन २०१२-१३ या वर्षात राज्यातील ३ हजार ८६५ गावे

नरेश रहिले - गोंदियामहात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने गावात शांतता व समृद्धीची लाट आणली. ही मोहीम राबविणाऱ्या गावांना शासनाने लोकसंख्येच्या आधारावर पुरस्कार वाटले. सन २०१२-१३ या वर्षात राज्यातील ३ हजार ८६५ गावे स्पर्धेत होती. यातील १ हजार ७४१ गावांना तंटामुक्तीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या गावांना बक्षीसापोटी महाराष्ट्र शासन ४६ कोटी ५९ लाख ७५ हजार रुपये देणार आहे.महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम महाराष्ट्र शासनाने १५ आॅगस्ट २००७ मध्ये सुरु केली. गावातील तंटे गावातच समोपचाराने सोडविल्या जावे. न्यायालय व पोलिसांच्या कामाचा ताण कमी व्हावा, यासाठी शासनाने सुरु केलेल्या मोहीमेला लोकचळवळीचा आधार मिळाला. लोकचळवळ उभी झाल्याने या योजनेला राज्यभर उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. परिणामी १० लाखाहून अधिक तंटे सामोपचाराने सोडविल्या गेले. ज्या गावात अंतर्गत कलह होता तो संपुष्टात आला. जातीय दंगलीवर नियंत्रण आनण्याचे काम तंटामुक्त समित्यांनी केले. सोबतच गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविल्या बरोबर प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचे कार्य तंटामुक्त समित्यांनी केले. ज्या गावाची शांतता व सुव्यवस्था धोक्यात येत होती. त्या गावात आता शांततेची गंगा वाहू लागली. या मोहिमेतून मिळविलेल्या पुरस्कार रकमेचा वापर गावाच्या विकासावर करण्यात आला. त्यामुळे गावातील अनेक समस्यांचा निपटारा झाला. शासनाने ही मोहीम राबविणाऱ्या गावांसाठी निकष ठेवले. या निकषाच्या आधारे खरे उतरण्यासाठी तंटामुक्म समित्यांनी आंतरजातिय विवाहासारखे उपक्रम यशस्विरीत्या राबविले. नव्याने निर्माण होणारे तंटे लोकसहभागातून मिटविण्याची व्यवस्था निर्माण व्हावी आणि सामाजिक शांती प्रस्थापित व्हावी तसेच राज्याची शांततेतून समृद्धिकडे वाटचाल व्हावी यासाठी तंटामुक्ती मोहीम सुरु करण्यात आली. या मोहिमेसाठी २०० गुण ठेवण्यात आले. त्यात १९० किंवा त्यापेक्षा अधिक गुण घेणाऱ्या गावांना विशेष शांतता पुरस्कार देण्यात येते. १५ आॅगस्ट ते ३० आॅगस्ट दरम्यान ग्रामपंचायतीने ग्रामसभा आयोजित करुन तंटामुक्त समितीमध्ये आपला सहभाग निश्चित करायचा असतो. या मोहिमेतील तंटामुक्त गाव समितीने भविष्यात तंटे निर्माण होवू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना करायच्या असतात. गावातील दाखल असलेले दिवाणी महसुली व इतर तंट्याची माहिती ३० सप्टेंबर पर्यंत संकलित करुन, दाखल करुन व नव्याने निर्माण झालेले तंटे लोकसहभागातून मिटविण्याची व्यवस्था करायची असते. या मोहिमेसाठी ३ वह्यांसाठी ८०, १०० व २० असे एकूण २०० गुण ठेवण्यात आले आहे. तंटामुक्त गाव होण्यासाठी प्रतिबंधात्मक योजना, दाखल तंटे मिटविणे व नव्याने निर्माण होणारे तंटे यासाठी अनुक्रमे ५६, ७० व १४ असे किमान गुण घेणे आवश्यक आहे. सदर गुणांची बेरीज १४० येत असली तरी १५० गुण घेतल्याशिवाय गाव तंटामुक्त होत नाही. १९० किंवा त्यापेक्षा गुण घेणाऱ्या गावांना शांतता पुरस्कार देण्यात येतो. त्या गावांना बक्षीस रकमेच्या २५ टक्के अधिकची रक्कम देण्यात येते. सन २०१२-१३ या मोहिमेच्या पाचव्या वर्षात राज्यातील ३ हजार ८६५ गावांनी १ मे २०१३ रोजी ग्रामसभेत आपले गाव तंटामुक्त झाल्याचा स्वयंमुल्यमापन अहवाल सादर केला. जिल्हा स्तरीय मुल्यमापनात २ हजार १३६ गावे पुरस्कारासाठी पात्र ठरली. परंतु बाह्य मुल्य मापनात १ हजार १४७ गावे तंटामुक्त घोषीत करण्यात आली. यापैकी ४७ गावांना शांतता पुरस्कार देण्यात आला. या गावांना ४६ कोटी ५९ लाख ७५ हजार रुपये देण्यात येणार आहे.