शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

तुमसर येथील ४२ विहिरी कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 22:17 IST

पाणी हे जीवन आहे. त्याला विनाशापासून वाचवा या म्हणीचे तंतोतंत पालन करण्याची वेळ आता तुमसरवासीयांवर आली आहे.

ठळक मुद्देबोअरवेलदेखील कोरड्या : खोसेटोला व आडकुटोला गावे तहानलेली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पाणी हे जीवन आहे. त्याला विनाशापासून वाचवा या म्हणीचे तंतोतंत पालन करण्याची वेळ आता तुमसरवासीयांवर आली आहे. गोरेगाव तालुक्याच्या तुमसर येथील ४२ विहिरी भर पावसाळ्यात कोड्या पडल्या आहेत. याच परिसरातील खोसेटोला व आडकुटोला या गावांची स्थिती देखील तुमसर सारखीच आहे. परिणामी गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.गोरेगाव तालुक्याच्या तुमसर येथे खाजगी ३७ तर ५ शासकीय अशा ४२ विहिरी आहेत. यापैकी ४० विहिरी सप्टेंबर महिन्यातच पूर्णत: कोरड्या आहेत. एका विहिरीमध्ये १ फुट तर दुसºया विहिरीमध्ये दीड फुट पाणी आहे. २६ खासगी बोरअवेल असून त्या सर्व कोरड्या आहेत. ही स्थिती खोसेटोला व आडकुटोला येथील आहे. तेथील २६ खासगी व दोन शासकीय विहिरी कोरड्या पडल्याचे चित्र आहे. परिणामी गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या गावातील नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. सुरूवातीला याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. पाणी टंचाईची गावकºयांची ओरड वाढल्यानंतर गोरेगाव येथील तहसीलदार व खंडविकास अधिकारी यांनी या गावांचा दौरा करुन अहवाल तयार केला आहे. सदर अहवाल दोन दिवसात जिल्हाधिकाºयांना सादर केला जाणार आहे.या गावांमध्ये असलेल्या एक दोन पाण्याच्या स्त्रोतातील पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही, यासाठी प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे. पिण्यायोग्य पाणी नसल्याने नागरिकांना विविध आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी माजी सरपंच मुकेश अग्रवाल यांनी केली आहे.उन्हाळ्यात काय?गोरेगाव तालुक्यातील तुमसर परिसरातील विहिरी भर पावसाळ्यात कोरड्या पडल्या आहेत. अजून संपूर्ण उन्हाळा शिल्लक आहे. आताच पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात काय स्थिती असणार अशी चिंता येथील गावकºयांना सतावू लागली आहे.कमी पावसाचा परिणामजिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत फारच कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील जलाशये, तलावांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे. जलाशयातील पाणीसाठ्यावर बºयाच प्रमाणात भूजल पातळी अवलंबून असते. मात्र यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीत देखील घट झाली आहे. त्यामुळेच विहिरी कोरड्या पडल्याचे बोलल्या जाते.