शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर येथील ४२ विहिरी कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 22:17 IST

पाणी हे जीवन आहे. त्याला विनाशापासून वाचवा या म्हणीचे तंतोतंत पालन करण्याची वेळ आता तुमसरवासीयांवर आली आहे.

ठळक मुद्देबोअरवेलदेखील कोरड्या : खोसेटोला व आडकुटोला गावे तहानलेली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पाणी हे जीवन आहे. त्याला विनाशापासून वाचवा या म्हणीचे तंतोतंत पालन करण्याची वेळ आता तुमसरवासीयांवर आली आहे. गोरेगाव तालुक्याच्या तुमसर येथील ४२ विहिरी भर पावसाळ्यात कोड्या पडल्या आहेत. याच परिसरातील खोसेटोला व आडकुटोला या गावांची स्थिती देखील तुमसर सारखीच आहे. परिणामी गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.गोरेगाव तालुक्याच्या तुमसर येथे खाजगी ३७ तर ५ शासकीय अशा ४२ विहिरी आहेत. यापैकी ४० विहिरी सप्टेंबर महिन्यातच पूर्णत: कोरड्या आहेत. एका विहिरीमध्ये १ फुट तर दुसºया विहिरीमध्ये दीड फुट पाणी आहे. २६ खासगी बोरअवेल असून त्या सर्व कोरड्या आहेत. ही स्थिती खोसेटोला व आडकुटोला येथील आहे. तेथील २६ खासगी व दोन शासकीय विहिरी कोरड्या पडल्याचे चित्र आहे. परिणामी गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या गावातील नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. सुरूवातीला याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. पाणी टंचाईची गावकºयांची ओरड वाढल्यानंतर गोरेगाव येथील तहसीलदार व खंडविकास अधिकारी यांनी या गावांचा दौरा करुन अहवाल तयार केला आहे. सदर अहवाल दोन दिवसात जिल्हाधिकाºयांना सादर केला जाणार आहे.या गावांमध्ये असलेल्या एक दोन पाण्याच्या स्त्रोतातील पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही, यासाठी प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे. पिण्यायोग्य पाणी नसल्याने नागरिकांना विविध आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी माजी सरपंच मुकेश अग्रवाल यांनी केली आहे.उन्हाळ्यात काय?गोरेगाव तालुक्यातील तुमसर परिसरातील विहिरी भर पावसाळ्यात कोरड्या पडल्या आहेत. अजून संपूर्ण उन्हाळा शिल्लक आहे. आताच पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात काय स्थिती असणार अशी चिंता येथील गावकºयांना सतावू लागली आहे.कमी पावसाचा परिणामजिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत फारच कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील जलाशये, तलावांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे. जलाशयातील पाणीसाठ्यावर बºयाच प्रमाणात भूजल पातळी अवलंबून असते. मात्र यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीत देखील घट झाली आहे. त्यामुळेच विहिरी कोरड्या पडल्याचे बोलल्या जाते.