शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
5
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
6
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
7
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
8
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
9
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
10
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
11
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
12
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
13
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
14
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
15
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
16
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
17
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
18
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
19
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
20
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट

तुमसर येथील ४२ विहिरी कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 22:17 IST

पाणी हे जीवन आहे. त्याला विनाशापासून वाचवा या म्हणीचे तंतोतंत पालन करण्याची वेळ आता तुमसरवासीयांवर आली आहे.

ठळक मुद्देबोअरवेलदेखील कोरड्या : खोसेटोला व आडकुटोला गावे तहानलेली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पाणी हे जीवन आहे. त्याला विनाशापासून वाचवा या म्हणीचे तंतोतंत पालन करण्याची वेळ आता तुमसरवासीयांवर आली आहे. गोरेगाव तालुक्याच्या तुमसर येथील ४२ विहिरी भर पावसाळ्यात कोड्या पडल्या आहेत. याच परिसरातील खोसेटोला व आडकुटोला या गावांची स्थिती देखील तुमसर सारखीच आहे. परिणामी गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.गोरेगाव तालुक्याच्या तुमसर येथे खाजगी ३७ तर ५ शासकीय अशा ४२ विहिरी आहेत. यापैकी ४० विहिरी सप्टेंबर महिन्यातच पूर्णत: कोरड्या आहेत. एका विहिरीमध्ये १ फुट तर दुसºया विहिरीमध्ये दीड फुट पाणी आहे. २६ खासगी बोरअवेल असून त्या सर्व कोरड्या आहेत. ही स्थिती खोसेटोला व आडकुटोला येथील आहे. तेथील २६ खासगी व दोन शासकीय विहिरी कोरड्या पडल्याचे चित्र आहे. परिणामी गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या गावातील नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. सुरूवातीला याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. पाणी टंचाईची गावकºयांची ओरड वाढल्यानंतर गोरेगाव येथील तहसीलदार व खंडविकास अधिकारी यांनी या गावांचा दौरा करुन अहवाल तयार केला आहे. सदर अहवाल दोन दिवसात जिल्हाधिकाºयांना सादर केला जाणार आहे.या गावांमध्ये असलेल्या एक दोन पाण्याच्या स्त्रोतातील पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही, यासाठी प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे. पिण्यायोग्य पाणी नसल्याने नागरिकांना विविध आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी माजी सरपंच मुकेश अग्रवाल यांनी केली आहे.उन्हाळ्यात काय?गोरेगाव तालुक्यातील तुमसर परिसरातील विहिरी भर पावसाळ्यात कोरड्या पडल्या आहेत. अजून संपूर्ण उन्हाळा शिल्लक आहे. आताच पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात काय स्थिती असणार अशी चिंता येथील गावकºयांना सतावू लागली आहे.कमी पावसाचा परिणामजिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत फारच कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील जलाशये, तलावांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे. जलाशयातील पाणीसाठ्यावर बºयाच प्रमाणात भूजल पातळी अवलंबून असते. मात्र यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीत देखील घट झाली आहे. त्यामुळेच विहिरी कोरड्या पडल्याचे बोलल्या जाते.