शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या जेवणातून ४० लोकांना विषबाधा; गोंदियातील गोरेगाव तालुक्यात घडला प्रकार

By अंकुश गुंडावार | Updated: April 6, 2025 11:54 IST

यामध्ये ८ बालकांचा समावेश असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे.

लग्नाच्या जेवणातून ४० लोकांना विषबाधा झाल्याची घटना गोरेगाव तालुक्यातील बबई येथे घडली आहे. गोरेगाव तालुक्यातील बबई येथील केशोवराव बिसेन यांच्याकडे ३ एप्रिल रोजी मुलाचा लग्न समारंभ होता. ४ एप्रिल रोजी परतीची वरात बबई येथे आल्यानंतर उपस्थित वराडी आणि गावकऱ्यांना दुपारी दोनच्या सुमारास जेवण दिले. या जेवणातून जवळपास ४० लोकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये ८ बालकांचा समावेश असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे.

विषबाधा झालेल्यांना गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर उर्वरित २६ लोकांवर गोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये, ५ रुग्णांवर गोरेगाव येथील एका खाजगी रुग्णालयात, ५ रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा येथे तर गोंदिया येथील खाजगी रुग्णालयातही काही रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी दिली आहे.

गोरेगाव पंचायत समितीचे माजी सभापती मनोज बोपचे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा व ग्रामीण रुग्णालय गोरेगाव येथे भेट देत रुग्णांची विचारपूस केली यावेळी माजी समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे बबई चे माजी सरपंच सोमेश रहांगडले, अभियंता रवी बघेले आदी उपस्थित होते.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधा