शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

शेतकऱ्यांवर ४ कोटी १४ लाखांची पाणीपट्टी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:25 IST

विजय मानकर सालेकसा : वाघ पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग आमगाव अंतर्गत वाघ जलाशयातून शेतीसाठी पाण्याचा वापर करणाऱ्या आमगाव, सालेकसा आणि ...

विजय मानकर

सालेकसा : वाघ पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग आमगाव अंतर्गत वाघ जलाशयातून शेतीसाठी पाण्याचा वापर करणाऱ्या आमगाव, सालेकसा आणि देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांवर एकूण ४ कोटी १४ लाख २१ हजार रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. पाटबंधारे विभाग डबघाईस आला असून, कालव्यांच्या देखभाल दुरुस्तीअभावी त्यांची दुर्दशा झाली आहे.

शासन कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक योजना राबवित असून, त्यावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करीत आहे. मात्र, दुसरीकडे शेतकऱ्यांना सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कालव्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुुर्लक्ष करीत आहे. पाटबंधारे विभागाला निधी मिळत नसल्याने हा विभागच पूर्ण डबघाईस आला आहे. शेतकऱ्यांवरील पाणीपट्टीच्या थकीत रकमेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे या विभागाला कालव्याच्या देखभाल दुरुस्तीची कामे करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कार्यालयाचे वीज बिल भरण्यासाठीसुद्धा या विभागाकडे निधी नसल्याची बाब पुढे आली आहे. वाघ पाटबंधारे उपविभागांतर्गत सिरपूर, कालीसरार आणि पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याद्वारे आमगाव, देवरी, सालेकसासह गोंदिया तालुका आणि लगतच्या मध्यप्रदेशातील शेतीलासुद्धा सिंचन म्हणून वापरले जाते. पुजारीटोला धरणातून शून्य ते २९ किलोमीटर डावा कालवा आणि शून्य ते ३३ किमी उजवा कालव्याची व्यवस्था आहे. दोन्ही कालव्यांद्वारे एकूण ९५०० हेक्टर शेतीला खरीप आणि रब्बी हंगामात पाणी दिले जाते. पाटबंधारे विभागाकडून १९८१-८२ पासून पाणीपट्टी आकारली जात असून, सुरुवातीला अतिशय अल्प स्वरूपाची रक्कम आकारली जात होती. परंतु, आता त्यात वाढ करण्यात आली आहे. सद्यस्थितीत खरीप हंगामात प्रतिहेक्टर ४१५ रुपये आणि रब्बी हंगामासाठी १२३० रु. प्रतिहेक्टरप्रमाणे पाणीपट्टी आकारली जात आहे. मोटार पंपाद्वारे शेतात सिंचन करण्यासाठी खरीप हंगामात ८३ रुपये आणि रब्बी हंगामात ३२४ रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे आकारले जाते.

..........

पाणीपट्टीच्या थकीत रकमेत वाढ

मागील काही वर्षांपासून पाणीपट्टी वसुली सक्तीने केली जात नसून, लाभार्थी शेतकरीसुद्धा पाणीपट्टी भरण्यास गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर अनेक वर्षांची पाणीपट्टी थकीत असून, त्यात वाढ होत आहे. आमगाव शाखेंतर्गत १ कोटी ८० लाख ३८ हजार रुपये, सालेकसा शाखेंअंतर्गत १ कोटी ८० लाख ९६ हजार रुपये आणि पुजारीटोला शाखेंतर्गत ५२ लाख ८७ हजार रुपये शेतकऱ्यांवर थकीत आहेत.

..........

पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम

पाणीपट्टी वसुली होत नसल्याने या विभागाकडे निधीची समस्या आहे. जलाशयांची देखरेख दुरुस्ती तसेच कालव्याची दुरुस्ती योग्य प्रमाणात करणे कठिण झाले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कालवे फुटले आहेत. त्यातून पाणी वाया जाते. शेवटपर्यंत शेतात सिंचन होत नाही. कालवा दुरुस्तीसाठी शासनाकडे निधीची मागणी केली असता पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण किती आहे हे विचारले जाते. यंदा विभागाने घरोघरी जाऊन पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू केली होती. तेव्हा साडेतीन लाख रुपये जमा झाले.

.........

कोट

पाणीपट्टी गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. यंदा विभागाने शेतकऱ्यांना त्यांच्या गावी जाऊन समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, मनुष्यबळ कमी असल्याने मोहीम पूर्णपणे यशस्वी करता आली नाही. तरीसुद्धा समजदार शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

प्रियम शुभम, उपविभागीय अभियंता वाघ पाटबंधारे विभाग

.....

धरणाच्या पाण्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी दरवर्षी पाणीपट्टी देऊन विभागाला सहकार्य करण्याची गरज असून, यामुळे येणाऱ्या काळात प्रत्येकाला शेतीला पुरेशा प्रमाणात पाणी मिळू शकेल.

-रामदास दमाहे, शेतकरी कावरा बांध