शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

शेतकऱ्यांवर ४ कोटी १४ लाखांची पाणीपट्टी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:25 IST

विजय मानकर सालेकसा : वाघ पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग आमगाव अंतर्गत वाघ जलाशयातून शेतीसाठी पाण्याचा वापर करणाऱ्या आमगाव, सालेकसा आणि ...

विजय मानकर

सालेकसा : वाघ पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग आमगाव अंतर्गत वाघ जलाशयातून शेतीसाठी पाण्याचा वापर करणाऱ्या आमगाव, सालेकसा आणि देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांवर एकूण ४ कोटी १४ लाख २१ हजार रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. पाटबंधारे विभाग डबघाईस आला असून, कालव्यांच्या देखभाल दुरुस्तीअभावी त्यांची दुर्दशा झाली आहे.

शासन कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक योजना राबवित असून, त्यावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करीत आहे. मात्र, दुसरीकडे शेतकऱ्यांना सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कालव्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुुर्लक्ष करीत आहे. पाटबंधारे विभागाला निधी मिळत नसल्याने हा विभागच पूर्ण डबघाईस आला आहे. शेतकऱ्यांवरील पाणीपट्टीच्या थकीत रकमेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे या विभागाला कालव्याच्या देखभाल दुरुस्तीची कामे करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कार्यालयाचे वीज बिल भरण्यासाठीसुद्धा या विभागाकडे निधी नसल्याची बाब पुढे आली आहे. वाघ पाटबंधारे उपविभागांतर्गत सिरपूर, कालीसरार आणि पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याद्वारे आमगाव, देवरी, सालेकसासह गोंदिया तालुका आणि लगतच्या मध्यप्रदेशातील शेतीलासुद्धा सिंचन म्हणून वापरले जाते. पुजारीटोला धरणातून शून्य ते २९ किलोमीटर डावा कालवा आणि शून्य ते ३३ किमी उजवा कालव्याची व्यवस्था आहे. दोन्ही कालव्यांद्वारे एकूण ९५०० हेक्टर शेतीला खरीप आणि रब्बी हंगामात पाणी दिले जाते. पाटबंधारे विभागाकडून १९८१-८२ पासून पाणीपट्टी आकारली जात असून, सुरुवातीला अतिशय अल्प स्वरूपाची रक्कम आकारली जात होती. परंतु, आता त्यात वाढ करण्यात आली आहे. सद्यस्थितीत खरीप हंगामात प्रतिहेक्टर ४१५ रुपये आणि रब्बी हंगामासाठी १२३० रु. प्रतिहेक्टरप्रमाणे पाणीपट्टी आकारली जात आहे. मोटार पंपाद्वारे शेतात सिंचन करण्यासाठी खरीप हंगामात ८३ रुपये आणि रब्बी हंगामात ३२४ रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे आकारले जाते.

..........

पाणीपट्टीच्या थकीत रकमेत वाढ

मागील काही वर्षांपासून पाणीपट्टी वसुली सक्तीने केली जात नसून, लाभार्थी शेतकरीसुद्धा पाणीपट्टी भरण्यास गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर अनेक वर्षांची पाणीपट्टी थकीत असून, त्यात वाढ होत आहे. आमगाव शाखेंतर्गत १ कोटी ८० लाख ३८ हजार रुपये, सालेकसा शाखेंअंतर्गत १ कोटी ८० लाख ९६ हजार रुपये आणि पुजारीटोला शाखेंतर्गत ५२ लाख ८७ हजार रुपये शेतकऱ्यांवर थकीत आहेत.

..........

पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम

पाणीपट्टी वसुली होत नसल्याने या विभागाकडे निधीची समस्या आहे. जलाशयांची देखरेख दुरुस्ती तसेच कालव्याची दुरुस्ती योग्य प्रमाणात करणे कठिण झाले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कालवे फुटले आहेत. त्यातून पाणी वाया जाते. शेवटपर्यंत शेतात सिंचन होत नाही. कालवा दुरुस्तीसाठी शासनाकडे निधीची मागणी केली असता पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण किती आहे हे विचारले जाते. यंदा विभागाने घरोघरी जाऊन पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू केली होती. तेव्हा साडेतीन लाख रुपये जमा झाले.

.........

कोट

पाणीपट्टी गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. यंदा विभागाने शेतकऱ्यांना त्यांच्या गावी जाऊन समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, मनुष्यबळ कमी असल्याने मोहीम पूर्णपणे यशस्वी करता आली नाही. तरीसुद्धा समजदार शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

प्रियम शुभम, उपविभागीय अभियंता वाघ पाटबंधारे विभाग

.....

धरणाच्या पाण्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी दरवर्षी पाणीपट्टी देऊन विभागाला सहकार्य करण्याची गरज असून, यामुळे येणाऱ्या काळात प्रत्येकाला शेतीला पुरेशा प्रमाणात पाणी मिळू शकेल.

-रामदास दमाहे, शेतकरी कावरा बांध