शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
2
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
3
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
4
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
5
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
6
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
7
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
8
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
9
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
10
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
11
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
12
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
13
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
14
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
15
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
16
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
17
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
18
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
19
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
20
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळेतील ३९५ विद्यार्थी जि.प.शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 23:44 IST

बालकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा यशस्वी झाल्याने आता जिल्हा परिषदेची विद्यार्थी संख्या रोडावण्याचे बरेच प्रमाण कमी झाले आहे.

ठळक मुद्देशाळा झाल्या बोलक्या : विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविण्यावर भर

नरेश रहिले ।ऑनलाईन लोकमतगोंदिया : बालकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा यशस्वी झाल्याने आता जिल्हा परिषदेची विद्यार्थी संख्या रोडावण्याचे बरेच प्रमाण कमी झाले आहे. काही जि.प. शाळांतील गुणवत्तापूर्ण शिक्षणाला पाहून खासगी शाळांतील विद्यार्थ्यांचा कल जि.प. शाळांकडे वाढला आहे. सन २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात खासगी शाळांतील ३९५ विद्यार्थी जि.प. शाळांत परतले आहेत.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत या शर्यतीने पुढे राहण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जिल्ह्यातील १०६९ शाळा शंभर टक्के प्रगत करण्याचा माणस बांधला आहे.२५ मुद्यांच्या निकषांवर खरे उतरण्याचा चंग बांधण्यात आला आहे. बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला दर्जेदार व गुणवत्तायुक्त शिक्षण देणे ही राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांची जबाबदारी आहे. अध्ययन संपादणूक सर्व्हेक्षणाच्या अहवालानुसार अपेक्षित अध्ययन निष्पत्ती प्राप्त न झाल्याचे शासनाच्या लक्षात आल्याने राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २२ जून २०१५ रोजी एक शासन निर्णय काढून अप्रगत शाळांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला.या उपक्रमाला कृतीत उतरवून प्रगत शिक्षणात गोंदिया जिल्हा प्रथम असावा यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग काम करीत आहे. शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना प्रगत करण्याचा माणस बांधला.जिल्हा परिषदेच्या शाळांतील १०० टक्के विद्यार्थी प्रगत करणे, प्रत्येक शाळेला स्वच्छ व सुंदर परिसर उपलब्ध करून देणे, शाळेत लोकसहभाग वाढविण्यावर भर, शिक्षकांची गुणवत्ता व कल्पकतेला वाव, शैक्षणिक साहित्यावर भर, अप्रगत मूलविहीन शाळा करणे, विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्यनावर भर, विद्यार्थ्यांना कृतीद्वारा शिक्षण घेणे, कठिण विषयाविषयी आवड निर्माण करणे, शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांच्या मनातील भिती नाहीसी करणे, शाळा सुंदर करून विद्यार्थ्यांची शाळेविषयी आवड निर्माण करणे, सोप्या व सुलभ पध्दतीने ज्ञानार्जन करून विद्यार्थ्यांच्या संपादणूक क्षमतेत वाढ करणे, सर्वांगिण विकास करणे व विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे काम केले जात आहेत.एकंदरित सर्व शाळा बोलक्या करण्यावर भर देण्यात आला. याचाच परिणाम खासगी शाळेतून जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३९५ झाली आहे. यात गोरेगाव तालुक्यात ५४, सालेकसा ४४, अर्जुनी-मोरगाव १४, सडक-अर्जुनी १५, गोंदिया १२६, तिरोडा ६२, देवरी ३३ व आमगाव ४७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष लक्ष दिल्यास आणखी संख्या वाढेल.शिक्षण विभागात अनेक चळवळीराज्यात डिजिटल शाळा, तंत्रस्नेही शिक्षक, प्रगत शाळा, स्पोकन इंग्लिश, शाळा सिद्धी, समाज सहभाग, वाचन प्रेरणा दिवस यासारख्या चळवळी सुरु आहेत. यातून साध्य होणाºया परिणामांचा लाभ या मुलांनाही व्हायला हवे यादृष्टीने योग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्टÑ विद्या प्राधिकरण, पुणे यांचेकडून भाषा व गणित या विषयातील संकल्पना समृद्धीकरण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये शैक्षणिक साहित्याच्या प्रभावी वापरातून प्रत्येक मूल निर्धारित संपादणूक पातळी गाठू शकेल याचे नियोजन करण्यात आले आहे.अवांतर वाचनासाठी प्रयोगविद्यार्थ्यांना अवांतर वाचनात आवड निर्माण यासाठी वाचन कुटीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वाचनकुटी तयार करणाऱ्या शाळांची संख्या पाहता गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. लोकसहभागातून ह्या वाचन कुटी तयार करण्यात आया आहेत. जिल्ह्यातील १०४८ पैकी ५८७ शाळांमध्ये वाचन कुटी तयार करण्यात आल्या आहेत. ‘वाचन कुटी’त विद्यार्थ्यांना वर्तमानपत्र, विविध मासिक, पाक्षीक, साप्ताहिक, जिल्ह्यातील भौगोलिक माहिती व्यतिरिक्त विविध पुस्तकें त्यात ठेवल्या जात आहेत.पटसंख्या वाढविण्यासाठी असाही प्रयोगप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक शाळा डिजिटल झाली. या शाळांतील उपस्थिती वाढविण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेने योग्य पाऊल उचलत नामवंत कॉन्व्हेंट मध्ये आपल्या मुलांना शिकविण्यास पाठविणाऱ्या शिक्षकांना कारवाईस सामोरे जावे लागणार असा इशारा दिल्याने काही शिक्षकांनी आपल्या पाल्यांना जि.प. शाळेत टाकल्याची माहिती आहे. जि.प. शाळांतील शिक्षक आपल्या मुलांना खासगी नामवंत शाळेत शिकविण्यासाठी पाठवित असल्यामुळे ते जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नव्हते. त्यामुळे जि.प. शाळांतील शिक्षकांनी आपापल्या मुलांना जि.प. शाळेतच शिकवावे अशी सक्ती करण्यात आली आहे.