शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळेतील ३९५ विद्यार्थी जि.प.शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 23:44 IST

बालकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा यशस्वी झाल्याने आता जिल्हा परिषदेची विद्यार्थी संख्या रोडावण्याचे बरेच प्रमाण कमी झाले आहे.

ठळक मुद्देशाळा झाल्या बोलक्या : विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविण्यावर भर

नरेश रहिले ।ऑनलाईन लोकमतगोंदिया : बालकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा यशस्वी झाल्याने आता जिल्हा परिषदेची विद्यार्थी संख्या रोडावण्याचे बरेच प्रमाण कमी झाले आहे. काही जि.प. शाळांतील गुणवत्तापूर्ण शिक्षणाला पाहून खासगी शाळांतील विद्यार्थ्यांचा कल जि.प. शाळांकडे वाढला आहे. सन २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात खासगी शाळांतील ३९५ विद्यार्थी जि.प. शाळांत परतले आहेत.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत या शर्यतीने पुढे राहण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जिल्ह्यातील १०६९ शाळा शंभर टक्के प्रगत करण्याचा माणस बांधला आहे.२५ मुद्यांच्या निकषांवर खरे उतरण्याचा चंग बांधण्यात आला आहे. बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला दर्जेदार व गुणवत्तायुक्त शिक्षण देणे ही राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांची जबाबदारी आहे. अध्ययन संपादणूक सर्व्हेक्षणाच्या अहवालानुसार अपेक्षित अध्ययन निष्पत्ती प्राप्त न झाल्याचे शासनाच्या लक्षात आल्याने राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २२ जून २०१५ रोजी एक शासन निर्णय काढून अप्रगत शाळांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला.या उपक्रमाला कृतीत उतरवून प्रगत शिक्षणात गोंदिया जिल्हा प्रथम असावा यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग काम करीत आहे. शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना प्रगत करण्याचा माणस बांधला.जिल्हा परिषदेच्या शाळांतील १०० टक्के विद्यार्थी प्रगत करणे, प्रत्येक शाळेला स्वच्छ व सुंदर परिसर उपलब्ध करून देणे, शाळेत लोकसहभाग वाढविण्यावर भर, शिक्षकांची गुणवत्ता व कल्पकतेला वाव, शैक्षणिक साहित्यावर भर, अप्रगत मूलविहीन शाळा करणे, विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्यनावर भर, विद्यार्थ्यांना कृतीद्वारा शिक्षण घेणे, कठिण विषयाविषयी आवड निर्माण करणे, शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांच्या मनातील भिती नाहीसी करणे, शाळा सुंदर करून विद्यार्थ्यांची शाळेविषयी आवड निर्माण करणे, सोप्या व सुलभ पध्दतीने ज्ञानार्जन करून विद्यार्थ्यांच्या संपादणूक क्षमतेत वाढ करणे, सर्वांगिण विकास करणे व विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे काम केले जात आहेत.एकंदरित सर्व शाळा बोलक्या करण्यावर भर देण्यात आला. याचाच परिणाम खासगी शाळेतून जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३९५ झाली आहे. यात गोरेगाव तालुक्यात ५४, सालेकसा ४४, अर्जुनी-मोरगाव १४, सडक-अर्जुनी १५, गोंदिया १२६, तिरोडा ६२, देवरी ३३ व आमगाव ४७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष लक्ष दिल्यास आणखी संख्या वाढेल.शिक्षण विभागात अनेक चळवळीराज्यात डिजिटल शाळा, तंत्रस्नेही शिक्षक, प्रगत शाळा, स्पोकन इंग्लिश, शाळा सिद्धी, समाज सहभाग, वाचन प्रेरणा दिवस यासारख्या चळवळी सुरु आहेत. यातून साध्य होणाºया परिणामांचा लाभ या मुलांनाही व्हायला हवे यादृष्टीने योग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्टÑ विद्या प्राधिकरण, पुणे यांचेकडून भाषा व गणित या विषयातील संकल्पना समृद्धीकरण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये शैक्षणिक साहित्याच्या प्रभावी वापरातून प्रत्येक मूल निर्धारित संपादणूक पातळी गाठू शकेल याचे नियोजन करण्यात आले आहे.अवांतर वाचनासाठी प्रयोगविद्यार्थ्यांना अवांतर वाचनात आवड निर्माण यासाठी वाचन कुटीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वाचनकुटी तयार करणाऱ्या शाळांची संख्या पाहता गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. लोकसहभागातून ह्या वाचन कुटी तयार करण्यात आया आहेत. जिल्ह्यातील १०४८ पैकी ५८७ शाळांमध्ये वाचन कुटी तयार करण्यात आल्या आहेत. ‘वाचन कुटी’त विद्यार्थ्यांना वर्तमानपत्र, विविध मासिक, पाक्षीक, साप्ताहिक, जिल्ह्यातील भौगोलिक माहिती व्यतिरिक्त विविध पुस्तकें त्यात ठेवल्या जात आहेत.पटसंख्या वाढविण्यासाठी असाही प्रयोगप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक शाळा डिजिटल झाली. या शाळांतील उपस्थिती वाढविण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेने योग्य पाऊल उचलत नामवंत कॉन्व्हेंट मध्ये आपल्या मुलांना शिकविण्यास पाठविणाऱ्या शिक्षकांना कारवाईस सामोरे जावे लागणार असा इशारा दिल्याने काही शिक्षकांनी आपल्या पाल्यांना जि.प. शाळेत टाकल्याची माहिती आहे. जि.प. शाळांतील शिक्षक आपल्या मुलांना खासगी नामवंत शाळेत शिकविण्यासाठी पाठवित असल्यामुळे ते जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नव्हते. त्यामुळे जि.प. शाळांतील शिक्षकांनी आपापल्या मुलांना जि.प. शाळेतच शिकवावे अशी सक्ती करण्यात आली आहे.