शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

३७६ जण ‘रेफर टू गंगाबाई’

By admin | Updated: November 3, 2015 02:20 IST

बलात्कारपिडीत तरूणींची वैद्यकीय तपासणी लवकरात लवकर व्हावी अन्यथा प्रकरणातील आरोपींना त्या आरोपातून

गोंदिया : बलात्कारपिडीत तरूणींची वैद्यकीय तपासणी लवकरात लवकर व्हावी अन्यथा प्रकरणातील आरोपींना त्या आरोपातून सुटण्याची संधी मिळते. परंतु जिल्ह्यात अनेक ठिकाणी महिला डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगत बलात्कारपीडित तरूणी, महिलांची तपासणी न करता त्यांना ‘रेफर टू गंगाबाई’ केले जात आहे.पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी स्त्री रोग तज्ज्ञाकडून व्हावी असा नियम नाही. महिला डॉक्टर उपलब्ध असल्यास त्या डॉक्टरला आधी प्राधान्य दिले जाते. परंतु महिला डॉक्टर नसले तरी कोणतेही एमबीबीएस डॉक्टर त्या पिडीतेची वैद्यकीय चाचणी करू शकतात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. परंतु याबाबतची माहिती डॉक्टरांना आहे की नाही, अशी शंका येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालयातील एमबीबीएस डॉक्टर त्या पीडितांची वैद्यकीय तपासणी न करता महिला डॉक्टर किंवा स्त्री रोग तज्ज्ञ नसल्याचे कारण दाखवून त्यांना सरळ गोंदियाच्या गंगाबाई स्त्री रूग्णालयात रेफर करतात. डॉ.रंजना पारधी यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात ४६/२०१० मध्ये जनहित याचीका दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर राज्य शासनाने १० मे २०१३ रोजी एक पत्र काढून कोणताही एमबीबीएस डॉक्टर कलम ३७६ च्या प्रकरणात पिडीतांची वैद्यकीय चाचणी करू शकतो असे नमूद करण्यात आले आहे. हा नियम महाराष्ट्रात सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने हा नियम देशभरात लागू केला. ७ आॅगस्ट २०१५ रोजी केंद्र शासनाने सर्व समावेशक परिपत्रक काढून सर्व आरोग्य यंत्रणांना दिले, तरी देखील जिल्ह्यातील बहुतांश एमबीबीएस डॉक्टर त्याची अंमलबजावणी करीत नाहीत. एखादा पुरूष एमबीबीएस डॉक्टर त्या पिडीत महिलेची तपासणी करीत असेल त्यावेळी त्या ठिकाणी त्या पिडीतेची एखादी नातेवाईक महिला उपस्थित राहणे गरजेचे आहे. जर एखाद्या रूग्णालयात महिला डॉक्टर असतील तर त्यांची तपासणी त्यांनीच करावी. परंतु तसे होताना दिसत नाही. (तालुका प्रतिनिधी)पोलीसही अनभिज्ञबलात्कार पीडितेची वैद्यकीय चाचणी कोणत्याही एमबीबीएस डॉक्टरला करता येणार हे पत्रक आरोग्य यंत्रणांना मिळाले. परंतु त्या पत्रकाची माहिती पोलीस यंत्रणेला नसल्यामुळे रूग्णालयातील डॉक्टर त्यांना स्त्री रोगतज्ज्ञ नसल्याचे कारण सांगून त्यांची दिशाभूल करतात. पोलिसांना या पत्रकाची माहिती नसल्यामुळे हे सर्व चालत आहे.४ पीडित महिलांची वेळेत तपासणी गरजेची असते. वैद्यकीय चाचणीत जेवढा उशीर होईल तेवढीच आरोपींना सुटण्याची संधी मिळते. एमबीबीएस डॉक्टर त्यांची वेळेत तपासणी करीत नसल्यामुळे त्यांची चाचणी करण्यास उशीर होते. प्रत्येक एमबीबीएस डॉक्टरने बलात्कार पीडितेची वैद्यकीय चाचणी करणे आवश्यक आहे. त्या प्रकरणात उशीर झाल्यास आरोपींना सुटण्याची संधी मिळते. या प्रकरणात वेळेला महत्व आहे.-डॉ. संजीव दोडके अधीक्षक बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय गोंदिया