शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

३७६ जण ‘रेफर टू गंगाबाई’

By admin | Updated: November 3, 2015 02:20 IST

बलात्कारपिडीत तरूणींची वैद्यकीय तपासणी लवकरात लवकर व्हावी अन्यथा प्रकरणातील आरोपींना त्या आरोपातून

गोंदिया : बलात्कारपिडीत तरूणींची वैद्यकीय तपासणी लवकरात लवकर व्हावी अन्यथा प्रकरणातील आरोपींना त्या आरोपातून सुटण्याची संधी मिळते. परंतु जिल्ह्यात अनेक ठिकाणी महिला डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगत बलात्कारपीडित तरूणी, महिलांची तपासणी न करता त्यांना ‘रेफर टू गंगाबाई’ केले जात आहे.पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी स्त्री रोग तज्ज्ञाकडून व्हावी असा नियम नाही. महिला डॉक्टर उपलब्ध असल्यास त्या डॉक्टरला आधी प्राधान्य दिले जाते. परंतु महिला डॉक्टर नसले तरी कोणतेही एमबीबीएस डॉक्टर त्या पिडीतेची वैद्यकीय चाचणी करू शकतात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. परंतु याबाबतची माहिती डॉक्टरांना आहे की नाही, अशी शंका येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालयातील एमबीबीएस डॉक्टर त्या पीडितांची वैद्यकीय तपासणी न करता महिला डॉक्टर किंवा स्त्री रोग तज्ज्ञ नसल्याचे कारण दाखवून त्यांना सरळ गोंदियाच्या गंगाबाई स्त्री रूग्णालयात रेफर करतात. डॉ.रंजना पारधी यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात ४६/२०१० मध्ये जनहित याचीका दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर राज्य शासनाने १० मे २०१३ रोजी एक पत्र काढून कोणताही एमबीबीएस डॉक्टर कलम ३७६ च्या प्रकरणात पिडीतांची वैद्यकीय चाचणी करू शकतो असे नमूद करण्यात आले आहे. हा नियम महाराष्ट्रात सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने हा नियम देशभरात लागू केला. ७ आॅगस्ट २०१५ रोजी केंद्र शासनाने सर्व समावेशक परिपत्रक काढून सर्व आरोग्य यंत्रणांना दिले, तरी देखील जिल्ह्यातील बहुतांश एमबीबीएस डॉक्टर त्याची अंमलबजावणी करीत नाहीत. एखादा पुरूष एमबीबीएस डॉक्टर त्या पिडीत महिलेची तपासणी करीत असेल त्यावेळी त्या ठिकाणी त्या पिडीतेची एखादी नातेवाईक महिला उपस्थित राहणे गरजेचे आहे. जर एखाद्या रूग्णालयात महिला डॉक्टर असतील तर त्यांची तपासणी त्यांनीच करावी. परंतु तसे होताना दिसत नाही. (तालुका प्रतिनिधी)पोलीसही अनभिज्ञबलात्कार पीडितेची वैद्यकीय चाचणी कोणत्याही एमबीबीएस डॉक्टरला करता येणार हे पत्रक आरोग्य यंत्रणांना मिळाले. परंतु त्या पत्रकाची माहिती पोलीस यंत्रणेला नसल्यामुळे रूग्णालयातील डॉक्टर त्यांना स्त्री रोगतज्ज्ञ नसल्याचे कारण सांगून त्यांची दिशाभूल करतात. पोलिसांना या पत्रकाची माहिती नसल्यामुळे हे सर्व चालत आहे.४ पीडित महिलांची वेळेत तपासणी गरजेची असते. वैद्यकीय चाचणीत जेवढा उशीर होईल तेवढीच आरोपींना सुटण्याची संधी मिळते. एमबीबीएस डॉक्टर त्यांची वेळेत तपासणी करीत नसल्यामुळे त्यांची चाचणी करण्यास उशीर होते. प्रत्येक एमबीबीएस डॉक्टरने बलात्कार पीडितेची वैद्यकीय चाचणी करणे आवश्यक आहे. त्या प्रकरणात उशीर झाल्यास आरोपींना सुटण्याची संधी मिळते. या प्रकरणात वेळेला महत्व आहे.-डॉ. संजीव दोडके अधीक्षक बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय गोंदिया