शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

३३२ गावात पाण्याचे दुर्भीक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 21:47 IST

यंदा अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवणार आहे. मागील वर्षी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात पाणी टंचाई नव्हती परंतु यंदा पहिल्या टप्प्यापासूनच पाण्याची टंचाई भासत आहे.

ठळक मुद्दे५६ वाड्यांत पाणी टंचाई : जिल्हा परिषदेचा ६१६ उपाय योजनांचा आराखडा

नरेश रहिले ।आॅनलाईन लोकमतगोंदिया : यंदा अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवणार आहे. मागील वर्षी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात पाणी टंचाई नव्हती परंतु यंदा पहिल्या टप्प्यापासूनच पाण्याची टंचाई भासत आहे. टँकरमुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पाण्याचे टॅँकर लावण्याची वेळ येऊ शकते. कारण यंदा ३३२ गावे तर ५६ वाड्यांमध्ये तिव्र पाणी टंचाई भासणार असल्याचे चित्र आहे. यासाठी जिल्हा परिषदेने ६१६ उपाय योजनांचा आराखडा तयार केला आहे.जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पहिला, दुसरा व तिसºया टप्प्याचा पाणी टंचाई आराखडा घेतला. या तिन्ही आराखड्यात पाणी टंचाई आढळली आहे. पहिला टप्पा आॅक्टोबर ते डिसेंबरचा होता. या पहिल्या आराखड्यात ३४ गावे व एक वाडी पाणी टंचाई ग्रस्त आढळली. हा टप्पा निघून गेला तरी यासाठी पाणी पुरवठा सुरू झाला नाही. पहिल्या टप्प्यासाठी ३६ हातपंप दुरूस्ती व १६ सार्वजनिक विहीरींना इनवेल बोअर करण्याचा आराखडा तयार करण्यात आला. या योजनांवर ९ लाख ५८ हजार रूपये खर्च करण्याचे ठरविले. याचे अंदाजपत्रक तयार करणे सुरू आहेत.परंतु उपाययोजना करण्यासाठी कामे सुरूच झाली नाही. दुसरा टप्पा जानेवारी ते मार्चचा आहे. या टप्प्यात १४० गावे ३० वाड्या पाणी टंचाईग्रस्त असल्याचे जाणवले. येथे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी २७७ उपाययोजना केल्या आहेत. या योजनांवर ५६ लाख ८२ हजार रूपये खर्च करण्याची तयारी दर्शविण्यात आली.त्याचेही अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहेत. तर तिसºया टप्प्यात १५८ गावे २५ वाड्या पाणी टंचाईग्रस्त असल्याचे जाणवले. या टंचाईवर मात करण्यासाठी २८६ उपाययोजना केल्या आहेत. त्यावर ५९ लाख ९४ हजार रूपये खर्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस पडल्यामुळे जमीनीतील पाण्याची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भीक्ष्य आतापासून भासत आहे.जिल्ह्यात ३३२ गावे व ५६ वाड्यांमध्ये संभाव्य पाणी टंचाई असल्यामुळे ६१६ उपाययोजना करण्यात आल्या असून त्यासाठी १ कोटी २६ लाख ३४ हजार रूपये खर्च करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.१५३ विहिरींमध्ये इनवेल बोअरजिल्ह्यात ३३२ गावे ५६ वाड्या पाणी टंचाईग्रस्त आहेत. या गावांसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ६१६ उपाययोजना तयार केल्या असून १५३ ठिकाणी विहिरींमध्ये इनवेलबोअर, ३४ ठिकाणी विंधन विहीर, एका नळ योजनेची विशेष दुरूस्ती व ४२८ हातपंप दुरूस्ती करण्यात येणार आहे.पाणी तोंडात की डोळ्यात?मागील वर्षी पाऊस बऱ्यापैकी पडला होता. तरीही २० गावांमध्ये पाण्याची टंचाई होती. त्यासाठी कोट्यवधीचे नियोजन करण्यात आले होते. परंतु अख्खा उन्हाळा निघूनही ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न केले नव्हते. कोट्यवधीची गरज असताना पाणी टंचाईवर मात करण्यासाठी फक्त सात ठिकाणी बोअर करण्यात आले होते. यंदा पाण्याचे दुर्भीक्ष्य असताना एका तालुक्यासाठी कोट्यवधी रूपयांची मागणी करायला पाहिजे होती. परंतु अख्या जिल्ह्यासाठी फक्त १ कोटी २६ लाख रूपये मागण्यात आल्याने त्यातून मिळणार किती व उपाय योजना करणार कशा हा प्रश्नच आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यासाठी तत्परता दाखवावी. पाण्यासाठी नागरिकांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ येऊ देऊ नका असा आर्त टाहो नागरिकांचा आहे.