शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
4
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
7
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
8
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
9
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
10
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
11
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
12
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
13
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
14
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
15
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
16
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
17
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
18
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
19
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
20
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Daily Top 2Weekly Top 5

३३२ गावात पाण्याचे दुर्भीक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 21:47 IST

यंदा अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवणार आहे. मागील वर्षी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात पाणी टंचाई नव्हती परंतु यंदा पहिल्या टप्प्यापासूनच पाण्याची टंचाई भासत आहे.

ठळक मुद्दे५६ वाड्यांत पाणी टंचाई : जिल्हा परिषदेचा ६१६ उपाय योजनांचा आराखडा

नरेश रहिले ।आॅनलाईन लोकमतगोंदिया : यंदा अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवणार आहे. मागील वर्षी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात पाणी टंचाई नव्हती परंतु यंदा पहिल्या टप्प्यापासूनच पाण्याची टंचाई भासत आहे. टँकरमुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पाण्याचे टॅँकर लावण्याची वेळ येऊ शकते. कारण यंदा ३३२ गावे तर ५६ वाड्यांमध्ये तिव्र पाणी टंचाई भासणार असल्याचे चित्र आहे. यासाठी जिल्हा परिषदेने ६१६ उपाय योजनांचा आराखडा तयार केला आहे.जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पहिला, दुसरा व तिसºया टप्प्याचा पाणी टंचाई आराखडा घेतला. या तिन्ही आराखड्यात पाणी टंचाई आढळली आहे. पहिला टप्पा आॅक्टोबर ते डिसेंबरचा होता. या पहिल्या आराखड्यात ३४ गावे व एक वाडी पाणी टंचाई ग्रस्त आढळली. हा टप्पा निघून गेला तरी यासाठी पाणी पुरवठा सुरू झाला नाही. पहिल्या टप्प्यासाठी ३६ हातपंप दुरूस्ती व १६ सार्वजनिक विहीरींना इनवेल बोअर करण्याचा आराखडा तयार करण्यात आला. या योजनांवर ९ लाख ५८ हजार रूपये खर्च करण्याचे ठरविले. याचे अंदाजपत्रक तयार करणे सुरू आहेत.परंतु उपाययोजना करण्यासाठी कामे सुरूच झाली नाही. दुसरा टप्पा जानेवारी ते मार्चचा आहे. या टप्प्यात १४० गावे ३० वाड्या पाणी टंचाईग्रस्त असल्याचे जाणवले. येथे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी २७७ उपाययोजना केल्या आहेत. या योजनांवर ५६ लाख ८२ हजार रूपये खर्च करण्याची तयारी दर्शविण्यात आली.त्याचेही अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहेत. तर तिसºया टप्प्यात १५८ गावे २५ वाड्या पाणी टंचाईग्रस्त असल्याचे जाणवले. या टंचाईवर मात करण्यासाठी २८६ उपाययोजना केल्या आहेत. त्यावर ५९ लाख ९४ हजार रूपये खर्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस पडल्यामुळे जमीनीतील पाण्याची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भीक्ष्य आतापासून भासत आहे.जिल्ह्यात ३३२ गावे व ५६ वाड्यांमध्ये संभाव्य पाणी टंचाई असल्यामुळे ६१६ उपाययोजना करण्यात आल्या असून त्यासाठी १ कोटी २६ लाख ३४ हजार रूपये खर्च करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.१५३ विहिरींमध्ये इनवेल बोअरजिल्ह्यात ३३२ गावे ५६ वाड्या पाणी टंचाईग्रस्त आहेत. या गावांसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ६१६ उपाययोजना तयार केल्या असून १५३ ठिकाणी विहिरींमध्ये इनवेलबोअर, ३४ ठिकाणी विंधन विहीर, एका नळ योजनेची विशेष दुरूस्ती व ४२८ हातपंप दुरूस्ती करण्यात येणार आहे.पाणी तोंडात की डोळ्यात?मागील वर्षी पाऊस बऱ्यापैकी पडला होता. तरीही २० गावांमध्ये पाण्याची टंचाई होती. त्यासाठी कोट्यवधीचे नियोजन करण्यात आले होते. परंतु अख्खा उन्हाळा निघूनही ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न केले नव्हते. कोट्यवधीची गरज असताना पाणी टंचाईवर मात करण्यासाठी फक्त सात ठिकाणी बोअर करण्यात आले होते. यंदा पाण्याचे दुर्भीक्ष्य असताना एका तालुक्यासाठी कोट्यवधी रूपयांची मागणी करायला पाहिजे होती. परंतु अख्या जिल्ह्यासाठी फक्त १ कोटी २६ लाख रूपये मागण्यात आल्याने त्यातून मिळणार किती व उपाय योजना करणार कशा हा प्रश्नच आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यासाठी तत्परता दाखवावी. पाण्यासाठी नागरिकांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ येऊ देऊ नका असा आर्त टाहो नागरिकांचा आहे.