शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

३२१ तरूण वळतील रोजगाराकडे

By admin | Updated: March 7, 2017 00:59 IST

नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया व बी.एन.एच.एस.नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बफर क्षेत्रातील ....

निसर्ग संवेदनांवर मार्गदर्शन : बफर क्षेत्रात ४६ गावातील तरुणांचा सहभागगोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया व बी.एन.एच.एस.नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बफर क्षेत्रातील युवकांसाठी निसर्ग संवेदना व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील ४६ गावातील ३२१ तरुण सहभागी झाले होते. याव्यतिरिक्त काही दिवस नवेगाव येथे गावातील ५० तरूणांना वेगळे प्रशिक्षण देण्यात आले. सहभागी तरूणांना सहायक संचालक संजय करकरे व वनाधिकारी यांनी मार्गदर्शन केले. सर्व सहभागी तरु णांना प्रमाणपत्र आणि व्याघ्र प्रकल्पाची आठवण म्हणून कॅप व टी शर्ट देण्यात आले. हे शिबिर अरण्यवाचन नवेगावबांध, गडेगाव डेपो, व कृषि विज्ञान केंद्र साकोली येथे आयोजित केले होते. नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र हे मध्य भारतातील त्यांचा उत्तर व दक्षिणेकडील ९ व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा दुवा आहे. त्यामुळे एकूणच व्याघ्र संवर्धनात संवेदनशील व्याघ्र अधिवास असणारे क्षेत्र आहे. या व्याघ्र प्रकल्पाचा बफर क्षेत्रात १८५ गावे असून स्थानिक गरजा भागविण्यासाठी या जंगलावर प्रचंड जैविक दबाव आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या व्यवस्थापनात हा जैविक दबाव कमी करणे, व्याघ्र प्रकल्प क्षेत्राचे महत्व सांगून स्थानिकांना व्याघ्र संवर्धनात सहभागी करु न घेणे हे एक मोठे आव्हाण आहे. म्हणूनच बफर क्षेत्रातील गावातील प्रातिनिधीक तरूणांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून लोकांजवळ जावून त्यांना नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे व्यवस्थापन व विकास प्रक्रियेत सहभागी करून त्यांचा वैयक्तीक विकास साधणे हा उद्देश आहे.या शिबिरात तरूणांना जंगल व वाघाचे महत्व, व्याघ्र प्रकल्प हा आपल्या गावाच्या विकासास अडथळा नसून संधी आहे, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजना ही गावांच्या सर्वांगीण विकासास कशी लाभदायी आहे याबाबतच्या शासन निर्णयाची माहिती, मानव-वन्यजीव संघर्ष कशामुळे उदभवतो त्यावेळी विरोधापेक्षा स्थानिकांचे सहकार्य कसे महत्वाचे आहे, गावांचा शेती आधारित विकास करता येईल, बफर क्षेत्राबाबतचे गैरसमज, पीक नुकसानीबाबतच्या उपायोजना, हेला फॉरेस्ट १९२६ व ग्रीन आर्मीबाबत माहिती, गावांच्या विकासात व निर्णय प्रक्रि येत तरु णांच्या सहभाग किती महत्वाचा आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रथम संस्था मुंबईच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या कौशल्याधारित स्वयंरोजगार विषयांचे आणि विविध स्पर्धा परीक्षांचे तरु णांना मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात केलेल्या मार्गदर्शनाची माहिती गावातील इतर तरु णांना देवून एकित्रत करण्याबाबत उपस्थित तरूणांना सांगण्यात आले. जेणेकरून स्वयंरोजगार व स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन व आर्थिक मदत करणे सोईचे होईल. शिबिराच्या शेवटी प्रत्येक तरूणांकडून शिबिरांविषयी हव्या असलेल्या स्वयंरोजगार मदतीसाठी व गावांच्या समस्यासंबंधी अभिप्राय घेण्यात आले.शिबिराला वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक रविकिरण गोवेकर, नवेगाव-नागझरिा व्याघ्र राखीव क्षेत्राचे उपसंचालक अमलेंदू पाठक, विभागीय वन अधिकारी उत्तम सावंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मिच्छद्र मोहुर्ले व कु.सिमा नेवारे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शिबिराचे आयोजन सहायक वनसंरक्षक गीता पवार, नवेगाव राष्ट्रीय उद्यान पार्कचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एन.शिंदे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)