शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

३२१ तरूण वळतील रोजगाराकडे

By admin | Updated: March 7, 2017 00:59 IST

नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया व बी.एन.एच.एस.नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बफर क्षेत्रातील ....

निसर्ग संवेदनांवर मार्गदर्शन : बफर क्षेत्रात ४६ गावातील तरुणांचा सहभागगोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया व बी.एन.एच.एस.नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बफर क्षेत्रातील युवकांसाठी निसर्ग संवेदना व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील ४६ गावातील ३२१ तरुण सहभागी झाले होते. याव्यतिरिक्त काही दिवस नवेगाव येथे गावातील ५० तरूणांना वेगळे प्रशिक्षण देण्यात आले. सहभागी तरूणांना सहायक संचालक संजय करकरे व वनाधिकारी यांनी मार्गदर्शन केले. सर्व सहभागी तरु णांना प्रमाणपत्र आणि व्याघ्र प्रकल्पाची आठवण म्हणून कॅप व टी शर्ट देण्यात आले. हे शिबिर अरण्यवाचन नवेगावबांध, गडेगाव डेपो, व कृषि विज्ञान केंद्र साकोली येथे आयोजित केले होते. नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र हे मध्य भारतातील त्यांचा उत्तर व दक्षिणेकडील ९ व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा दुवा आहे. त्यामुळे एकूणच व्याघ्र संवर्धनात संवेदनशील व्याघ्र अधिवास असणारे क्षेत्र आहे. या व्याघ्र प्रकल्पाचा बफर क्षेत्रात १८५ गावे असून स्थानिक गरजा भागविण्यासाठी या जंगलावर प्रचंड जैविक दबाव आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या व्यवस्थापनात हा जैविक दबाव कमी करणे, व्याघ्र प्रकल्प क्षेत्राचे महत्व सांगून स्थानिकांना व्याघ्र संवर्धनात सहभागी करु न घेणे हे एक मोठे आव्हाण आहे. म्हणूनच बफर क्षेत्रातील गावातील प्रातिनिधीक तरूणांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून लोकांजवळ जावून त्यांना नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे व्यवस्थापन व विकास प्रक्रियेत सहभागी करून त्यांचा वैयक्तीक विकास साधणे हा उद्देश आहे.या शिबिरात तरूणांना जंगल व वाघाचे महत्व, व्याघ्र प्रकल्प हा आपल्या गावाच्या विकासास अडथळा नसून संधी आहे, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजना ही गावांच्या सर्वांगीण विकासास कशी लाभदायी आहे याबाबतच्या शासन निर्णयाची माहिती, मानव-वन्यजीव संघर्ष कशामुळे उदभवतो त्यावेळी विरोधापेक्षा स्थानिकांचे सहकार्य कसे महत्वाचे आहे, गावांचा शेती आधारित विकास करता येईल, बफर क्षेत्राबाबतचे गैरसमज, पीक नुकसानीबाबतच्या उपायोजना, हेला फॉरेस्ट १९२६ व ग्रीन आर्मीबाबत माहिती, गावांच्या विकासात व निर्णय प्रक्रि येत तरु णांच्या सहभाग किती महत्वाचा आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रथम संस्था मुंबईच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या कौशल्याधारित स्वयंरोजगार विषयांचे आणि विविध स्पर्धा परीक्षांचे तरु णांना मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात केलेल्या मार्गदर्शनाची माहिती गावातील इतर तरु णांना देवून एकित्रत करण्याबाबत उपस्थित तरूणांना सांगण्यात आले. जेणेकरून स्वयंरोजगार व स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन व आर्थिक मदत करणे सोईचे होईल. शिबिराच्या शेवटी प्रत्येक तरूणांकडून शिबिरांविषयी हव्या असलेल्या स्वयंरोजगार मदतीसाठी व गावांच्या समस्यासंबंधी अभिप्राय घेण्यात आले.शिबिराला वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक रविकिरण गोवेकर, नवेगाव-नागझरिा व्याघ्र राखीव क्षेत्राचे उपसंचालक अमलेंदू पाठक, विभागीय वन अधिकारी उत्तम सावंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मिच्छद्र मोहुर्ले व कु.सिमा नेवारे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शिबिराचे आयोजन सहायक वनसंरक्षक गीता पवार, नवेगाव राष्ट्रीय उद्यान पार्कचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एन.शिंदे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)