शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

कर्मचाºयांच्या संपामुळे ३२ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 23:42 IST

राज्यभरातील महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाºयांनी त्यांच्या मागण्यांना घेवून मागील चार दिवसांपासून संप पुकारला होता. या चार दिवसांच्या संपामुळे गोंदिया एसटी आगाराचे ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देचार दिवसांनंतर एसटी संप मागे : काळीपिवळी चालकांची चांदी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यभरातील महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाºयांनी त्यांच्या मागण्यांना घेवून मागील चार दिवसांपासून संप पुकारला होता. या चार दिवसांच्या संपामुळे गोंदिया एसटी आगाराचे ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले. ऐन दिवाळीत एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे काळी पिवळी वाहन चालकांची आणि खासगी वाहतुकदारांची मात्र चांगलीच चांदी झाली.एसटी महामंडळाच्या गोंदिया आगारातंर्गत एकूण ९० बसेस तर तिरोडा आगारात ४४ बसेस आहेत. यापैकी काही बसेस लांब पल्याच्या तर काही बसेस जिल्हा मार्गावर धावतात. या सर्व बसेसच्या दररोज ३०० ते ४०० फेºया होतात. यातून एकट्या गोंदिया आगाराला दररोज ८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. तर तिरोडा आगाराला ४४ बसेसच्या माध्यमातून दररोज ३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. दिवाळीत या उत्पन्नात वाढ होत असते. शिवाय वर्षभराचा तोटा दिवाळीतील उत्पन्नातून भरुन काढण्यास आगाराला मदत होत असल्याची माहिती आहे. मात्र एसटी कर्मचाºयांनी ऐन दिवाळीच्या कालावधीतच चार दिवसांचा संप केला. त्यामुळे महामंडळाची बससेवा पूर्णपणे ठप्प होती. दिवाळीच्या कालावधीत बाहेरगावी ये-जा करणाºया प्रवाशांची संख्या अधिक असते. ग्रामीण भागातील नागरिक एसटीचा प्रवास अधिक सुरक्षित समजतात.त्यामुळे या कालावधीत महामंडळाला देखील चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत अतिरिक्त बसेस सुरू केल्या जातात. मात्र यंदा एसटी कर्मचाºयांनी दिवाळीच्या तोंडावर बेमुदत संप पुकारला. त्यामुळे एकट्या गोंदिया आगाराचे चार दिवसात ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले. तर तिरोडा आगाराला सुध्दा १२ लाख रुपयांचा फटका बसल्याची माहिती आहे.चार दिवसांनंतर एसटी रस्त्यावरतब्बल चार दिवसानंतर एसटी बसेस शनिवारी(दि.२१) पासून रस्त्यावर पूर्ववत धावल्या.त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला. तसेच खासगी वाहतुकदारांची गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेली मनमानी देखील कमी झाल्याचे चित्र होते.खासगी वाहतुकदारांचा फायदाएसटी कर्मचाºयांनी ऐन दिवाळीच्या कालावधी संप केल्याने खासगी वाहतुक -दारांची चांगलीच चांदी झाली. ट्रॅव्हल्स आणि काळी-पिवळी चालकांनी प्रवाशांची गर्दी लक्षात घेत मनमर्जीनुसार प्रवास भाड्यात वाढ केली. त्याचा आर्थिक फटका प्रवाशांना सहन करावा लागला.