शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

कर्मचाºयांच्या संपामुळे ३२ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 23:42 IST

राज्यभरातील महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाºयांनी त्यांच्या मागण्यांना घेवून मागील चार दिवसांपासून संप पुकारला होता. या चार दिवसांच्या संपामुळे गोंदिया एसटी आगाराचे ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देचार दिवसांनंतर एसटी संप मागे : काळीपिवळी चालकांची चांदी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यभरातील महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाºयांनी त्यांच्या मागण्यांना घेवून मागील चार दिवसांपासून संप पुकारला होता. या चार दिवसांच्या संपामुळे गोंदिया एसटी आगाराचे ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले. ऐन दिवाळीत एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे काळी पिवळी वाहन चालकांची आणि खासगी वाहतुकदारांची मात्र चांगलीच चांदी झाली.एसटी महामंडळाच्या गोंदिया आगारातंर्गत एकूण ९० बसेस तर तिरोडा आगारात ४४ बसेस आहेत. यापैकी काही बसेस लांब पल्याच्या तर काही बसेस जिल्हा मार्गावर धावतात. या सर्व बसेसच्या दररोज ३०० ते ४०० फेºया होतात. यातून एकट्या गोंदिया आगाराला दररोज ८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. तर तिरोडा आगाराला ४४ बसेसच्या माध्यमातून दररोज ३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. दिवाळीत या उत्पन्नात वाढ होत असते. शिवाय वर्षभराचा तोटा दिवाळीतील उत्पन्नातून भरुन काढण्यास आगाराला मदत होत असल्याची माहिती आहे. मात्र एसटी कर्मचाºयांनी ऐन दिवाळीच्या कालावधीतच चार दिवसांचा संप केला. त्यामुळे महामंडळाची बससेवा पूर्णपणे ठप्प होती. दिवाळीच्या कालावधीत बाहेरगावी ये-जा करणाºया प्रवाशांची संख्या अधिक असते. ग्रामीण भागातील नागरिक एसटीचा प्रवास अधिक सुरक्षित समजतात.त्यामुळे या कालावधीत महामंडळाला देखील चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत अतिरिक्त बसेस सुरू केल्या जातात. मात्र यंदा एसटी कर्मचाºयांनी दिवाळीच्या तोंडावर बेमुदत संप पुकारला. त्यामुळे एकट्या गोंदिया आगाराचे चार दिवसात ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले. तर तिरोडा आगाराला सुध्दा १२ लाख रुपयांचा फटका बसल्याची माहिती आहे.चार दिवसांनंतर एसटी रस्त्यावरतब्बल चार दिवसानंतर एसटी बसेस शनिवारी(दि.२१) पासून रस्त्यावर पूर्ववत धावल्या.त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला. तसेच खासगी वाहतुकदारांची गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेली मनमानी देखील कमी झाल्याचे चित्र होते.खासगी वाहतुकदारांचा फायदाएसटी कर्मचाºयांनी ऐन दिवाळीच्या कालावधी संप केल्याने खासगी वाहतुक -दारांची चांगलीच चांदी झाली. ट्रॅव्हल्स आणि काळी-पिवळी चालकांनी प्रवाशांची गर्दी लक्षात घेत मनमर्जीनुसार प्रवास भाड्यात वाढ केली. त्याचा आर्थिक फटका प्रवाशांना सहन करावा लागला.