शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

घरकुल लाभार्थ्याची ३० हजार रुपयांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 20:54 IST

गंधारी येथील बिरजो पडोटी या वृध्द आदिवासी महिलेला ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्याने घर बांधून देतो असे आश्वासन देऊन ३० हजार रुपयांनी फसवणूक केली. तीन चार वर्ष लोटूनही बिरजो यांना घरकुल न मिळाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देशौचालयाचे खड्डे उघडेच : गंधारी येथील गरजवंत घरकुलाच्या प्रतीक्षेत, प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : गंधारी येथील बिरजो पडोटी या वृध्द आदिवासी महिलेला ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्याने घर बांधून देतो असे आश्वासन देऊन ३० हजार रुपयांनी फसवणूक केली. तीन चार वर्ष लोटूनही बिरजो यांना घरकुल न मिळाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव या आदिवासी बहुल व दुर्गम तालुक्यातील गंधारी हे गाव. या गावात आदिवासी समाजबांधवांची संख्या अधिक आहे. मात्र येथील गरजवंताना अद्यापही घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. घरोघरी शौचालय बांधण्यात आले. मात्र एकाही घराच्या शौचालयाच्या खड्यावर झाकण नाही. त्यामुळे दुर्गंधी व रोगराईला आमंत्रण देत आहे. स्वातंत्र्यांच्या ७२ वर्षानंतरही आजही गंधारी येथील आदिवासी समाजबांधव घरकुलाच्या मुलभूत सुविधेपासून वंचित आहे. तर दुसरीकडे निर्मलग्राम, स्वच्छ गाव या योजनेचा फज्जा उडालेला गंधारी गावात पाहावयास मिळाला.कुंपणच शेत खात असेल तर तक्रार कुणाकडे करावी अशा विवंचनेत गंधारीचे आदिवासी समाजबांधव पडले आहे. गाढवी नदीच्या कुशीत असलेल्या गंधारी गावाची लोकसंख्या ५१२ एवढी आहे. गावात ११७ घरे आहेत. गट ग्रामपंचायत बोंडगाव सुरबनमध्ये या गावाचा समावेश आहे. या गावात सर्वात जास्त आदिवासी बांधव राहतात. जवळपास त्यांची ३०-४० घरे या गावात आहेत. निर्धन, दारिद्र्य अवस्थेत मिळेल ते काम करुन उपजिविका करतात. अज्ञानाच्या अंधारात चाचपडत विकासाच्या किरणांचा अंधूकशा प्रकार नजरेसमोर काजव्या सारखा चमकताना पाहत झोपडीत राहून उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यात दिवस काढत आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. ज्यांना राहण्यासाठी घरे नाहीत, घराची ज्यांना नितांत गरज आहे. जे दारिद्र्यात जीवन जगत आहेत. ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे. पत्त्याच्या बंगल्यासारखी ज्यांची घरे पडू शकतात. अशा घरात केवळ ताडपत्र्यांचा आधारावर ते राहत आहे. केवळ प्लॉस्टिकच्या ताडपत्र्या म्हणजे घराचे छत आहे.अशा तिरपाल, झिल्लीच्या छतात आपल्या मुलाबाळांना घेवून पत्नीसह जिव मुठीत घेवून सोमा सुखराम पडोटी राहत आहेत. परंतु त्यांना अद्यापही घरकुलाचा लाभ मिळाला नाही. असे अनेक गरजवंत आहेत. पण त्यांना अद्यापही घरकुल मिळाले नाही. या गावातील गरजवंताना घरकुलाचा लाभ नाही. शौचालयाचे उघडे खड्डे, योजनेचे नावाखाली आर्थिक शोषण केले जात आहे.एकेकाळी आदर्श गाव म्हणून शासनाने आदर्श ग्राम योजनेत या गावाची निवड झाली होती.

टॅग्स :fraudधोकेबाजीgovernment schemeसरकारी योजना