शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

घरकुल लाभार्थ्याची ३० हजार रुपयांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 20:54 IST

गंधारी येथील बिरजो पडोटी या वृध्द आदिवासी महिलेला ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्याने घर बांधून देतो असे आश्वासन देऊन ३० हजार रुपयांनी फसवणूक केली. तीन चार वर्ष लोटूनही बिरजो यांना घरकुल न मिळाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देशौचालयाचे खड्डे उघडेच : गंधारी येथील गरजवंत घरकुलाच्या प्रतीक्षेत, प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : गंधारी येथील बिरजो पडोटी या वृध्द आदिवासी महिलेला ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्याने घर बांधून देतो असे आश्वासन देऊन ३० हजार रुपयांनी फसवणूक केली. तीन चार वर्ष लोटूनही बिरजो यांना घरकुल न मिळाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव या आदिवासी बहुल व दुर्गम तालुक्यातील गंधारी हे गाव. या गावात आदिवासी समाजबांधवांची संख्या अधिक आहे. मात्र येथील गरजवंताना अद्यापही घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. घरोघरी शौचालय बांधण्यात आले. मात्र एकाही घराच्या शौचालयाच्या खड्यावर झाकण नाही. त्यामुळे दुर्गंधी व रोगराईला आमंत्रण देत आहे. स्वातंत्र्यांच्या ७२ वर्षानंतरही आजही गंधारी येथील आदिवासी समाजबांधव घरकुलाच्या मुलभूत सुविधेपासून वंचित आहे. तर दुसरीकडे निर्मलग्राम, स्वच्छ गाव या योजनेचा फज्जा उडालेला गंधारी गावात पाहावयास मिळाला.कुंपणच शेत खात असेल तर तक्रार कुणाकडे करावी अशा विवंचनेत गंधारीचे आदिवासी समाजबांधव पडले आहे. गाढवी नदीच्या कुशीत असलेल्या गंधारी गावाची लोकसंख्या ५१२ एवढी आहे. गावात ११७ घरे आहेत. गट ग्रामपंचायत बोंडगाव सुरबनमध्ये या गावाचा समावेश आहे. या गावात सर्वात जास्त आदिवासी बांधव राहतात. जवळपास त्यांची ३०-४० घरे या गावात आहेत. निर्धन, दारिद्र्य अवस्थेत मिळेल ते काम करुन उपजिविका करतात. अज्ञानाच्या अंधारात चाचपडत विकासाच्या किरणांचा अंधूकशा प्रकार नजरेसमोर काजव्या सारखा चमकताना पाहत झोपडीत राहून उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यात दिवस काढत आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. ज्यांना राहण्यासाठी घरे नाहीत, घराची ज्यांना नितांत गरज आहे. जे दारिद्र्यात जीवन जगत आहेत. ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे. पत्त्याच्या बंगल्यासारखी ज्यांची घरे पडू शकतात. अशा घरात केवळ ताडपत्र्यांचा आधारावर ते राहत आहे. केवळ प्लॉस्टिकच्या ताडपत्र्या म्हणजे घराचे छत आहे.अशा तिरपाल, झिल्लीच्या छतात आपल्या मुलाबाळांना घेवून पत्नीसह जिव मुठीत घेवून सोमा सुखराम पडोटी राहत आहेत. परंतु त्यांना अद्यापही घरकुलाचा लाभ मिळाला नाही. असे अनेक गरजवंत आहेत. पण त्यांना अद्यापही घरकुल मिळाले नाही. या गावातील गरजवंताना घरकुलाचा लाभ नाही. शौचालयाचे उघडे खड्डे, योजनेचे नावाखाली आर्थिक शोषण केले जात आहे.एकेकाळी आदर्श गाव म्हणून शासनाने आदर्श ग्राम योजनेत या गावाची निवड झाली होती.

टॅग्स :fraudधोकेबाजीgovernment schemeसरकारी योजना