शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

घरकुल लाभार्थ्याची ३० हजार रुपयांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 20:54 IST

गंधारी येथील बिरजो पडोटी या वृध्द आदिवासी महिलेला ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्याने घर बांधून देतो असे आश्वासन देऊन ३० हजार रुपयांनी फसवणूक केली. तीन चार वर्ष लोटूनही बिरजो यांना घरकुल न मिळाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देशौचालयाचे खड्डे उघडेच : गंधारी येथील गरजवंत घरकुलाच्या प्रतीक्षेत, प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : गंधारी येथील बिरजो पडोटी या वृध्द आदिवासी महिलेला ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्याने घर बांधून देतो असे आश्वासन देऊन ३० हजार रुपयांनी फसवणूक केली. तीन चार वर्ष लोटूनही बिरजो यांना घरकुल न मिळाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव या आदिवासी बहुल व दुर्गम तालुक्यातील गंधारी हे गाव. या गावात आदिवासी समाजबांधवांची संख्या अधिक आहे. मात्र येथील गरजवंताना अद्यापही घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. घरोघरी शौचालय बांधण्यात आले. मात्र एकाही घराच्या शौचालयाच्या खड्यावर झाकण नाही. त्यामुळे दुर्गंधी व रोगराईला आमंत्रण देत आहे. स्वातंत्र्यांच्या ७२ वर्षानंतरही आजही गंधारी येथील आदिवासी समाजबांधव घरकुलाच्या मुलभूत सुविधेपासून वंचित आहे. तर दुसरीकडे निर्मलग्राम, स्वच्छ गाव या योजनेचा फज्जा उडालेला गंधारी गावात पाहावयास मिळाला.कुंपणच शेत खात असेल तर तक्रार कुणाकडे करावी अशा विवंचनेत गंधारीचे आदिवासी समाजबांधव पडले आहे. गाढवी नदीच्या कुशीत असलेल्या गंधारी गावाची लोकसंख्या ५१२ एवढी आहे. गावात ११७ घरे आहेत. गट ग्रामपंचायत बोंडगाव सुरबनमध्ये या गावाचा समावेश आहे. या गावात सर्वात जास्त आदिवासी बांधव राहतात. जवळपास त्यांची ३०-४० घरे या गावात आहेत. निर्धन, दारिद्र्य अवस्थेत मिळेल ते काम करुन उपजिविका करतात. अज्ञानाच्या अंधारात चाचपडत विकासाच्या किरणांचा अंधूकशा प्रकार नजरेसमोर काजव्या सारखा चमकताना पाहत झोपडीत राहून उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यात दिवस काढत आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. ज्यांना राहण्यासाठी घरे नाहीत, घराची ज्यांना नितांत गरज आहे. जे दारिद्र्यात जीवन जगत आहेत. ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे. पत्त्याच्या बंगल्यासारखी ज्यांची घरे पडू शकतात. अशा घरात केवळ ताडपत्र्यांचा आधारावर ते राहत आहे. केवळ प्लॉस्टिकच्या ताडपत्र्या म्हणजे घराचे छत आहे.अशा तिरपाल, झिल्लीच्या छतात आपल्या मुलाबाळांना घेवून पत्नीसह जिव मुठीत घेवून सोमा सुखराम पडोटी राहत आहेत. परंतु त्यांना अद्यापही घरकुलाचा लाभ मिळाला नाही. असे अनेक गरजवंत आहेत. पण त्यांना अद्यापही घरकुल मिळाले नाही. या गावातील गरजवंताना घरकुलाचा लाभ नाही. शौचालयाचे उघडे खड्डे, योजनेचे नावाखाली आर्थिक शोषण केले जात आहे.एकेकाळी आदर्श गाव म्हणून शासनाने आदर्श ग्राम योजनेत या गावाची निवड झाली होती.

टॅग्स :fraudधोकेबाजीgovernment schemeसरकारी योजना