शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

३०० कि.मी.कालव्यांचे खोलीकरण व दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 22:24 IST

सिंचनासाठी प्रकल्पातून पाणी सोडले जात असले तरी कालव्यांची दुरवस्था झाली असल्यामुळे पाण्याचा अपव्यय होऊन शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचत नाही.

ठळक मुद्दे४० किमी. मुख्य कालव्याचाही समावेश : आमदार अग्रवाल यांनी केली कामाची पाहणी

आॅनलाईन लोकमतगोंदिया : सिंचनासाठी प्रकल्पातून पाणी सोडले जात असले तरी कालव्यांची दुरवस्था झाली असल्यामुळे पाण्याचा अपव्यय होऊन शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचत नाही. ही बाब हेरून आमदार अग्रवाल यांनी जलसंपदा सचिवांसोबत बैठक घेऊन कालव्यांच्या दुरूस्तीचे निर्देश दिले होते. परिणामी बाघ प्रकल्पांतंर्गत येत असलेल्या ३०० कि.मी. लांबीच्या कालव्यांच्या दुरूस्ती व खोलीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे, यात ४० कि.मी. लांबीच्या मुख्य कालव्याचा समावेश आहे.बाघ प्रकल्प जिल्ह्यातील महत्वपूर्ण प्रकल्प असून सालेकसा तालुक्यात चार हजार, आमगाव तालुक्यात सात हजार व गोंदिया तालुक्यात १२ हजार ५०० हेक्टर अशाप्रकारे एकूण २३ हजार ५०० हेक्टर शेतीला यातून सिंचन केले जाते. मात्र प्रकल्पातील मुख्य व लघू कालव्यांची स्थिती खराब असल्यामुळे आमगाव व सालेकसा तालुक्यातच पाणी वाहून जाते. गोंदिया तालुक्यातील टोकावर असलेल्या शेतीला पाणी पोहचत नाही. परिणामी काटी, बिरसोला, देवरी, सोनबिहरी, छिपीया, पांजरा, गिरोला आदि भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होते.ही बाब लक्षात घेत आमदार अग्रवाल यांनी, मुंबई येथे जलसंपदा सचिव आय.एस.चहल यांच्यासह विभागातील अन्य अधिकाºयांची बैठक घेतली. यात त्यांनी गोंदिया विधानसभा क्षेत्रातील १२ हजार ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली दिसत असले तरिही केवळ १५००-२००० हेक्टर क्षेत्रालाच सिंचनाचा लाभ मिळत असल्याचे सांगीतले. तसेच शेतकºयांचे होत असलेले नुकसान लक्षात घेत तालुक्यातील संपूर्ण ३०० कि.मी. कालव्यांचे खोलीकरण व दुरूस्ती करण्यास सांगीतले. विशेष म्हणजे, यंदा पावसाअभावी रब्बीचा हंगाम नसल्यामुळे हीच संधी साधून लवकरात लवकर काम करण्यास सांगीतले.यावर सचिव चहल यांनी अभियांत्रीकी विभागातील अधिकाºयाना गोंदिया तालुक्यातील ३०० कि.मी. लांबीचे कालवे तसेच सालेकसा, आमगाव तालुका होत गोंदिया तालुक्यात येत असलेल्या सुमारे ४० कि. मी. लांबीच्या मुख्य कालव्याची दुरूस्ती व खोलीकरण करण्याचे निर्देश दिले.यासाठी लागेल तेवढ्या यंत्रणेची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यास सांगीतले. त्यानुसार कालव्यांच्या सफाई व दुरूस्तीचे पहिल्या टप्प्यातील काम पांढराबोडी-दासगाव दरम्यान सुरू आहे. येथे आमदार अग्रवाल यांनी भेट देऊन पाहणी केली व शेतकऱ्यांना या कामबाबत माहिती घेतली. तसेच अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणी जाऊन माहिती घ्याजलसंपदा सचिव चहल व संबंधीत अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी काही काळापूर्वीच कालव्यांच्या सफाईचे काम करण्यात आल्याचे सांगीतले. यावर मात्र आमदार अग्रवाल यांनी आक्षेप घेत किती कि.मी. कालव्यांची सफाई झाल्याचे विचारले असता त्यांच्या या प्रश्नावर अधिकाºयांकडे उत्तर नव्हते. त्यांनी ३०० कि.मी. लांबीच्या कालव्यांत ५-१० कि.मी. कालव्यांच्यी सफाई योग्य बाब नसल्याचे ठणकावून सांगीतले. पाण्या अभावी शेतकरी कंगाल होत असताना शासन फक्त मदतीच्या घोषणा करीत आहे. मात्र हे पुरेसे नसून शासनाने अधिकाºयांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन माहिती घेण्याचे निर्देश देण्याची गरज असल्याचे अग्रवाल म्हणाले.