शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

३०० कि.मी.कालव्यांचे खोलीकरण व दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 22:24 IST

सिंचनासाठी प्रकल्पातून पाणी सोडले जात असले तरी कालव्यांची दुरवस्था झाली असल्यामुळे पाण्याचा अपव्यय होऊन शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचत नाही.

ठळक मुद्दे४० किमी. मुख्य कालव्याचाही समावेश : आमदार अग्रवाल यांनी केली कामाची पाहणी

आॅनलाईन लोकमतगोंदिया : सिंचनासाठी प्रकल्पातून पाणी सोडले जात असले तरी कालव्यांची दुरवस्था झाली असल्यामुळे पाण्याचा अपव्यय होऊन शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचत नाही. ही बाब हेरून आमदार अग्रवाल यांनी जलसंपदा सचिवांसोबत बैठक घेऊन कालव्यांच्या दुरूस्तीचे निर्देश दिले होते. परिणामी बाघ प्रकल्पांतंर्गत येत असलेल्या ३०० कि.मी. लांबीच्या कालव्यांच्या दुरूस्ती व खोलीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे, यात ४० कि.मी. लांबीच्या मुख्य कालव्याचा समावेश आहे.बाघ प्रकल्प जिल्ह्यातील महत्वपूर्ण प्रकल्प असून सालेकसा तालुक्यात चार हजार, आमगाव तालुक्यात सात हजार व गोंदिया तालुक्यात १२ हजार ५०० हेक्टर अशाप्रकारे एकूण २३ हजार ५०० हेक्टर शेतीला यातून सिंचन केले जाते. मात्र प्रकल्पातील मुख्य व लघू कालव्यांची स्थिती खराब असल्यामुळे आमगाव व सालेकसा तालुक्यातच पाणी वाहून जाते. गोंदिया तालुक्यातील टोकावर असलेल्या शेतीला पाणी पोहचत नाही. परिणामी काटी, बिरसोला, देवरी, सोनबिहरी, छिपीया, पांजरा, गिरोला आदि भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होते.ही बाब लक्षात घेत आमदार अग्रवाल यांनी, मुंबई येथे जलसंपदा सचिव आय.एस.चहल यांच्यासह विभागातील अन्य अधिकाºयांची बैठक घेतली. यात त्यांनी गोंदिया विधानसभा क्षेत्रातील १२ हजार ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली दिसत असले तरिही केवळ १५००-२००० हेक्टर क्षेत्रालाच सिंचनाचा लाभ मिळत असल्याचे सांगीतले. तसेच शेतकºयांचे होत असलेले नुकसान लक्षात घेत तालुक्यातील संपूर्ण ३०० कि.मी. कालव्यांचे खोलीकरण व दुरूस्ती करण्यास सांगीतले. विशेष म्हणजे, यंदा पावसाअभावी रब्बीचा हंगाम नसल्यामुळे हीच संधी साधून लवकरात लवकर काम करण्यास सांगीतले.यावर सचिव चहल यांनी अभियांत्रीकी विभागातील अधिकाºयाना गोंदिया तालुक्यातील ३०० कि.मी. लांबीचे कालवे तसेच सालेकसा, आमगाव तालुका होत गोंदिया तालुक्यात येत असलेल्या सुमारे ४० कि. मी. लांबीच्या मुख्य कालव्याची दुरूस्ती व खोलीकरण करण्याचे निर्देश दिले.यासाठी लागेल तेवढ्या यंत्रणेची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यास सांगीतले. त्यानुसार कालव्यांच्या सफाई व दुरूस्तीचे पहिल्या टप्प्यातील काम पांढराबोडी-दासगाव दरम्यान सुरू आहे. येथे आमदार अग्रवाल यांनी भेट देऊन पाहणी केली व शेतकऱ्यांना या कामबाबत माहिती घेतली. तसेच अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणी जाऊन माहिती घ्याजलसंपदा सचिव चहल व संबंधीत अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी काही काळापूर्वीच कालव्यांच्या सफाईचे काम करण्यात आल्याचे सांगीतले. यावर मात्र आमदार अग्रवाल यांनी आक्षेप घेत किती कि.मी. कालव्यांची सफाई झाल्याचे विचारले असता त्यांच्या या प्रश्नावर अधिकाºयांकडे उत्तर नव्हते. त्यांनी ३०० कि.मी. लांबीच्या कालव्यांत ५-१० कि.मी. कालव्यांच्यी सफाई योग्य बाब नसल्याचे ठणकावून सांगीतले. पाण्या अभावी शेतकरी कंगाल होत असताना शासन फक्त मदतीच्या घोषणा करीत आहे. मात्र हे पुरेसे नसून शासनाने अधिकाºयांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन माहिती घेण्याचे निर्देश देण्याची गरज असल्याचे अग्रवाल म्हणाले.