शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

३०० कि.मी.कालव्यांचे खोलीकरण व दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 22:24 IST

सिंचनासाठी प्रकल्पातून पाणी सोडले जात असले तरी कालव्यांची दुरवस्था झाली असल्यामुळे पाण्याचा अपव्यय होऊन शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचत नाही.

ठळक मुद्दे४० किमी. मुख्य कालव्याचाही समावेश : आमदार अग्रवाल यांनी केली कामाची पाहणी

आॅनलाईन लोकमतगोंदिया : सिंचनासाठी प्रकल्पातून पाणी सोडले जात असले तरी कालव्यांची दुरवस्था झाली असल्यामुळे पाण्याचा अपव्यय होऊन शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचत नाही. ही बाब हेरून आमदार अग्रवाल यांनी जलसंपदा सचिवांसोबत बैठक घेऊन कालव्यांच्या दुरूस्तीचे निर्देश दिले होते. परिणामी बाघ प्रकल्पांतंर्गत येत असलेल्या ३०० कि.मी. लांबीच्या कालव्यांच्या दुरूस्ती व खोलीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे, यात ४० कि.मी. लांबीच्या मुख्य कालव्याचा समावेश आहे.बाघ प्रकल्प जिल्ह्यातील महत्वपूर्ण प्रकल्प असून सालेकसा तालुक्यात चार हजार, आमगाव तालुक्यात सात हजार व गोंदिया तालुक्यात १२ हजार ५०० हेक्टर अशाप्रकारे एकूण २३ हजार ५०० हेक्टर शेतीला यातून सिंचन केले जाते. मात्र प्रकल्पातील मुख्य व लघू कालव्यांची स्थिती खराब असल्यामुळे आमगाव व सालेकसा तालुक्यातच पाणी वाहून जाते. गोंदिया तालुक्यातील टोकावर असलेल्या शेतीला पाणी पोहचत नाही. परिणामी काटी, बिरसोला, देवरी, सोनबिहरी, छिपीया, पांजरा, गिरोला आदि भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होते.ही बाब लक्षात घेत आमदार अग्रवाल यांनी, मुंबई येथे जलसंपदा सचिव आय.एस.चहल यांच्यासह विभागातील अन्य अधिकाºयांची बैठक घेतली. यात त्यांनी गोंदिया विधानसभा क्षेत्रातील १२ हजार ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली दिसत असले तरिही केवळ १५००-२००० हेक्टर क्षेत्रालाच सिंचनाचा लाभ मिळत असल्याचे सांगीतले. तसेच शेतकºयांचे होत असलेले नुकसान लक्षात घेत तालुक्यातील संपूर्ण ३०० कि.मी. कालव्यांचे खोलीकरण व दुरूस्ती करण्यास सांगीतले. विशेष म्हणजे, यंदा पावसाअभावी रब्बीचा हंगाम नसल्यामुळे हीच संधी साधून लवकरात लवकर काम करण्यास सांगीतले.यावर सचिव चहल यांनी अभियांत्रीकी विभागातील अधिकाºयाना गोंदिया तालुक्यातील ३०० कि.मी. लांबीचे कालवे तसेच सालेकसा, आमगाव तालुका होत गोंदिया तालुक्यात येत असलेल्या सुमारे ४० कि. मी. लांबीच्या मुख्य कालव्याची दुरूस्ती व खोलीकरण करण्याचे निर्देश दिले.यासाठी लागेल तेवढ्या यंत्रणेची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यास सांगीतले. त्यानुसार कालव्यांच्या सफाई व दुरूस्तीचे पहिल्या टप्प्यातील काम पांढराबोडी-दासगाव दरम्यान सुरू आहे. येथे आमदार अग्रवाल यांनी भेट देऊन पाहणी केली व शेतकऱ्यांना या कामबाबत माहिती घेतली. तसेच अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणी जाऊन माहिती घ्याजलसंपदा सचिव चहल व संबंधीत अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी काही काळापूर्वीच कालव्यांच्या सफाईचे काम करण्यात आल्याचे सांगीतले. यावर मात्र आमदार अग्रवाल यांनी आक्षेप घेत किती कि.मी. कालव्यांची सफाई झाल्याचे विचारले असता त्यांच्या या प्रश्नावर अधिकाºयांकडे उत्तर नव्हते. त्यांनी ३०० कि.मी. लांबीच्या कालव्यांत ५-१० कि.मी. कालव्यांच्यी सफाई योग्य बाब नसल्याचे ठणकावून सांगीतले. पाण्या अभावी शेतकरी कंगाल होत असताना शासन फक्त मदतीच्या घोषणा करीत आहे. मात्र हे पुरेसे नसून शासनाने अधिकाºयांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन माहिती घेण्याचे निर्देश देण्याची गरज असल्याचे अग्रवाल म्हणाले.