शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

३० हजार ५३५ विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: March 1, 2017 00:16 IST

इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती, जमाती व भटक्या विमुक्त जाती यांना शासनातर्फे शिष्यवृत्ती देण्यात येते. परंतु मागील पाच वर्षापूर्वीची

१३ कोटींची मागणी : २१८६ विद्यार्थ्यांची पायपीट कायम गोंदिया : इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती, जमाती व भटक्या विमुक्त जाती यांना शासनातर्फे शिष्यवृत्ती देण्यात येते. परंतु मागील पाच वर्षापूर्वीची शिष्यवृत्ती २१८६ विद्यार्थ्यांना न मिळाल्याने शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची पायपीट सुरूच आहे. जुने व नवीन वर्षाचे ३० हजार ५३५ विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत. सन २०१६-१७ या वर्षाकरीता शिष्यवृत्तीसाठी ३४ हजार ४९३ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज केले आहे. त्या विद्यार्थ्यांपैकी २० हजार ३६४ विद्यार्थ्यांच्या अर्जाची मूळ प्रत समाजकल्याण कार्यालयाला प्राप्त झाली. परंतु १४ हजार १२९ विद्यार्थ्यांच्या अर्जाची मूळ प्रत अजूनपर्यंत पोहोचली नाही. समाजकल्याण विभागाने यापैकी १५ हजार ३२ अर्ज शिष्यवृत्तीसाठी मंजूर केले असून त्यातील ३ हजार ७८७ अर्जाचे बिलही टाकले आहे. मात्र निधीअभावी ११ हजार २४५ प्रकरणे तसेच पडून आहेत. सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी २६ कोटी ८६ हजारांची मागणी असताना शासनाने आतापर्यंत १३ कोटी २७ लाख पाठवले आहे. या आलेल्या पैशापैकी १३ कोटी १५ लाखांची शिष्यवृत्ती समाजकल्याण विभागाने १८ हजार १७३ विद्यार्थ्याना दिली. आता नविन व जुने असे मिळून ३० हजार ५३५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यायची आहे. (तालुका प्रतिनिधी) २१८६ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वांद्यात एक वर्ष लोटल्यावर दुसऱ्या वर्षात मागच्या वर्षातील पैशाची देवाण-घेवाण असल्यास कोषाधिकारी अधिनियम १५१(१) अंतर्गत शासनाकडून अन्वेषण प्रमाणपत्र घ्यायचे असते. परंतु अन्वेषण प्रमाणपत्र न मिळाल्याने सन २०११-१२ ते २०१४-१५ या वर्षातील एकूण २१८६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. १५५४ विद्यार्थ्यांची २ कोटी २ लाख देण्यासाठी २७ सप्टेंबर २०१६ ला, ३९० विद्यार्थ्यांचा १ कोटी १४ लाखाचा प्रस्ताव २९ नोव्हेंबर २०१६ ला, २४२ विद्यार्थ्यांचा ९७ लाखांचा प्रस्ताव १५ फेब्रुवारी २०१७ रोजी पाठविण्यात आला आहे. वर्षभरात २६ कोटींची गरज वर्षभरात २६ कोटी रुपये शिष्यवृत्तीसाठी लागतात. त्यापैकी १३ कोटी ६९ लाख ७४ हजार रुपये मिळाले आहे. त्यापैकी १३ कोटी ७ लाख ८५ हजार वाटप करण्यात आले. सद्यस्थितीत ६७ लाख ८९ हजार समाजकल्याण विभागाकडे शिल्लक आहेत. १३ कोटी ९६ लाख ५१ हजार रुपयांची मागणी आहे.