शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

२९ कृषी केंद्रांना बियाणे विकण्यास बंदी

By admin | Updated: June 28, 2016 01:27 IST

खरीप हंगामाच्या तयारीत लागलेल्या बळीराजाची फसवणूक होऊ नये आणि शेतकऱ्यांना लागणाऱ्या बी-बियाण्यांची विक्री

नरेश रहिले ल्ल गोंदियाखरीप हंगामाच्या तयारीत लागलेल्या बळीराजाची फसवणूक होऊ नये आणि शेतकऱ्यांना लागणाऱ्या बी-बियाण्यांची विक्री नियमानुसार व्हावी यासाठी कृषी विभागाकडून कृषी केंद्रांची तपासणी सुरू आहे. जिल्हाभरातील २१८ कृषी केंद्रावर अचानक धाड घालून तपासणी केली असता जिल्ह्यातील २९ कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना तृट्या पूर्ण करण्यासाठी २१ दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे.कृषी केंद्रांकडे साठा पुस्तक नसणे, दरफलक न लावणे, विक्री परवान्यात विक्री करीत असलेल्या कंपन्यांच्या बियाण्यांचा समावेश नसणे अशा विविध कारणांसाठी गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव, सालेकसा, देवरी, सडक-अर्जुनी, गोरेगाव आणि आमगाव या तालुक्यातील २९ केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडील ५८९ क्विंटल धानाचे बियाणे विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामासाठी ४४ हजार ३०० क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. त्यापैकी ७० टक्के बियाणे उपलब्ध झाल्याची माहिती कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे यांंनी दिली. २९ कृषी केंद्राना बियाणे विक्री बंदचे आदेश देण्यात आले असून येत्या २१ दिवसात त्रुट्याची पूर्तता करा. अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. तृट्या पूर्ण करणाऱ्या कृषी केंद्रांना बियाणे विक्री करण्यास मूभा दिली जाणार आहे.अधिकृत केंद्रातूनच खरेदी कराशेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत विक्री परवाना असणाऱ्या कृषी केंद्रांमधूनच बियाण्यांची खरेदी करावी. यासंदर्भात काही गडबड आढळल्यास कृषी विभाग गोंदियाकडे (०७१८२-२५०३९५, ९४२२८३१४३४, ९४२२८३४७१६) संपर्क करावा. कृषी केंद्रांनी नियमानुसार आपल्या दुकानात दरपत्रक लावावे, साठा रजिस्टर ठेवावे आणि विक्री परवान्यातील कंपन्यांची नावे नमूद करावी, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मोहीम अधिकारी अनूप शुक्ला यांनी सांगितले.३० हजार मेट्रीक टन खत उपलब्ध जिल्ह्यातील धान पिकासाठी दरवर्षी ४२ ते ४४ हजार मेट्रीक टन खताची आवश्यकता असते. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३० हजार मेट्रीक टन पर्यंत खताचा साठा उपलब्ध आहे. आवश्यकतेनुसार साठा पुरेपूर असल्याचे सांगण्यात आले.आठ कृषी केंद्राना कारणे दाखवा नोटीसतृट्या आढळलेल्या कृषी केंद्र संचालकांना जिल्हा भरारी पथकाने कारणे दाखवा नोटीस बजावले आहेत. त्यात मेंढे कृषी केंद्र ठाणा, श्रीनाथ कृषी केंद्र ठाणा, श्री कृषी केंद्र साखरीटोला, राज कृषी केंद्र हरदोली, चाहत कृषी केंद्र कवडी, चिखलोंडे कृषी केंद्र नागरा, वैनगंगा कृषी केंद्र मुंडीकोटा, पांडव सहकारी संस्था नवेझरी यांचा समावेश आहे.कारवाईसाठी ९ पथके बोगस बियाणे किंवा खते विक्री करणाऱ्या कृषी केंद्राची तपासणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक व जिल्ह्याच्या ठिकाणी एक असे ९ पथक तयार करण्यात आले आहे. परराज्यातील बियाणांवर बंदी आहे. महाराष्ट्रात महागुजरात, अंकुर सिड्स, बायर्स, न्युजीविडू, वसंत अ‍ॅग्रोटॅक, निर्मल सिड्स असे ३५ कंपन्याचे विविध प्रकारचे वाण जिल्ह्यात विक्री केले जातात.- शेतकऱ्यांना आवाहन४शेतकऱ्यांनी कृषि निविष्ठा (बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके) खरेदी करतांना अधिकृत परवानाधारक कृषि केंद्रातून मान्यता प्राप्त कंपनीचे व वाणाचे बियाणे घ्यावे, बियाणे खरेदी करतांना बॅगवर टॅग लावलेले आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे, बियाणांच्या बॅगवर सिंगल टॅग म्हणजे सत्यदर्शक व डबल टॅग म्हणजे प्रमाणित बियाणे असे असते, बियाणांचे बॅगवर लावलेल्या छापील टॅगवर लॉट नंबर, अंतिम वापर दिनांक व इतर माहिती नमूद आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे, खरेदी केलेल्या कृषि निविष्ठाचे पक्के बिल घ्यावे, बिलामध्ये लॉट नंबर, बॅच नंबर, प्रति नग किंमत नमूद आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे, बियाणांच्या पिशवीसह टॅग व पक्के बिल हंगाम संपेपर्यंत सांभाळून ठेवावे, कृषि निविष्ठाच्या बॅग, कन्टेनरवर छापील किंमत पेक्षा जास्त देऊ नये.