शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

२९ कृषी केंद्रांना बियाणे विकण्यास बंदी

By admin | Updated: June 28, 2016 01:27 IST

खरीप हंगामाच्या तयारीत लागलेल्या बळीराजाची फसवणूक होऊ नये आणि शेतकऱ्यांना लागणाऱ्या बी-बियाण्यांची विक्री

नरेश रहिले ल्ल गोंदियाखरीप हंगामाच्या तयारीत लागलेल्या बळीराजाची फसवणूक होऊ नये आणि शेतकऱ्यांना लागणाऱ्या बी-बियाण्यांची विक्री नियमानुसार व्हावी यासाठी कृषी विभागाकडून कृषी केंद्रांची तपासणी सुरू आहे. जिल्हाभरातील २१८ कृषी केंद्रावर अचानक धाड घालून तपासणी केली असता जिल्ह्यातील २९ कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना तृट्या पूर्ण करण्यासाठी २१ दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे.कृषी केंद्रांकडे साठा पुस्तक नसणे, दरफलक न लावणे, विक्री परवान्यात विक्री करीत असलेल्या कंपन्यांच्या बियाण्यांचा समावेश नसणे अशा विविध कारणांसाठी गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव, सालेकसा, देवरी, सडक-अर्जुनी, गोरेगाव आणि आमगाव या तालुक्यातील २९ केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडील ५८९ क्विंटल धानाचे बियाणे विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामासाठी ४४ हजार ३०० क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. त्यापैकी ७० टक्के बियाणे उपलब्ध झाल्याची माहिती कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे यांंनी दिली. २९ कृषी केंद्राना बियाणे विक्री बंदचे आदेश देण्यात आले असून येत्या २१ दिवसात त्रुट्याची पूर्तता करा. अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. तृट्या पूर्ण करणाऱ्या कृषी केंद्रांना बियाणे विक्री करण्यास मूभा दिली जाणार आहे.अधिकृत केंद्रातूनच खरेदी कराशेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत विक्री परवाना असणाऱ्या कृषी केंद्रांमधूनच बियाण्यांची खरेदी करावी. यासंदर्भात काही गडबड आढळल्यास कृषी विभाग गोंदियाकडे (०७१८२-२५०३९५, ९४२२८३१४३४, ९४२२८३४७१६) संपर्क करावा. कृषी केंद्रांनी नियमानुसार आपल्या दुकानात दरपत्रक लावावे, साठा रजिस्टर ठेवावे आणि विक्री परवान्यातील कंपन्यांची नावे नमूद करावी, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मोहीम अधिकारी अनूप शुक्ला यांनी सांगितले.३० हजार मेट्रीक टन खत उपलब्ध जिल्ह्यातील धान पिकासाठी दरवर्षी ४२ ते ४४ हजार मेट्रीक टन खताची आवश्यकता असते. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३० हजार मेट्रीक टन पर्यंत खताचा साठा उपलब्ध आहे. आवश्यकतेनुसार साठा पुरेपूर असल्याचे सांगण्यात आले.आठ कृषी केंद्राना कारणे दाखवा नोटीसतृट्या आढळलेल्या कृषी केंद्र संचालकांना जिल्हा भरारी पथकाने कारणे दाखवा नोटीस बजावले आहेत. त्यात मेंढे कृषी केंद्र ठाणा, श्रीनाथ कृषी केंद्र ठाणा, श्री कृषी केंद्र साखरीटोला, राज कृषी केंद्र हरदोली, चाहत कृषी केंद्र कवडी, चिखलोंडे कृषी केंद्र नागरा, वैनगंगा कृषी केंद्र मुंडीकोटा, पांडव सहकारी संस्था नवेझरी यांचा समावेश आहे.कारवाईसाठी ९ पथके बोगस बियाणे किंवा खते विक्री करणाऱ्या कृषी केंद्राची तपासणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक व जिल्ह्याच्या ठिकाणी एक असे ९ पथक तयार करण्यात आले आहे. परराज्यातील बियाणांवर बंदी आहे. महाराष्ट्रात महागुजरात, अंकुर सिड्स, बायर्स, न्युजीविडू, वसंत अ‍ॅग्रोटॅक, निर्मल सिड्स असे ३५ कंपन्याचे विविध प्रकारचे वाण जिल्ह्यात विक्री केले जातात.- शेतकऱ्यांना आवाहन४शेतकऱ्यांनी कृषि निविष्ठा (बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके) खरेदी करतांना अधिकृत परवानाधारक कृषि केंद्रातून मान्यता प्राप्त कंपनीचे व वाणाचे बियाणे घ्यावे, बियाणे खरेदी करतांना बॅगवर टॅग लावलेले आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे, बियाणांच्या बॅगवर सिंगल टॅग म्हणजे सत्यदर्शक व डबल टॅग म्हणजे प्रमाणित बियाणे असे असते, बियाणांचे बॅगवर लावलेल्या छापील टॅगवर लॉट नंबर, अंतिम वापर दिनांक व इतर माहिती नमूद आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे, खरेदी केलेल्या कृषि निविष्ठाचे पक्के बिल घ्यावे, बिलामध्ये लॉट नंबर, बॅच नंबर, प्रति नग किंमत नमूद आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे, बियाणांच्या पिशवीसह टॅग व पक्के बिल हंगाम संपेपर्यंत सांभाळून ठेवावे, कृषि निविष्ठाच्या बॅग, कन्टेनरवर छापील किंमत पेक्षा जास्त देऊ नये.