शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

२९ कृषी केंद्रांना बियाणे विकण्यास बंदी

By admin | Updated: June 28, 2016 01:27 IST

खरीप हंगामाच्या तयारीत लागलेल्या बळीराजाची फसवणूक होऊ नये आणि शेतकऱ्यांना लागणाऱ्या बी-बियाण्यांची विक्री

नरेश रहिले ल्ल गोंदियाखरीप हंगामाच्या तयारीत लागलेल्या बळीराजाची फसवणूक होऊ नये आणि शेतकऱ्यांना लागणाऱ्या बी-बियाण्यांची विक्री नियमानुसार व्हावी यासाठी कृषी विभागाकडून कृषी केंद्रांची तपासणी सुरू आहे. जिल्हाभरातील २१८ कृषी केंद्रावर अचानक धाड घालून तपासणी केली असता जिल्ह्यातील २९ कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना तृट्या पूर्ण करण्यासाठी २१ दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे.कृषी केंद्रांकडे साठा पुस्तक नसणे, दरफलक न लावणे, विक्री परवान्यात विक्री करीत असलेल्या कंपन्यांच्या बियाण्यांचा समावेश नसणे अशा विविध कारणांसाठी गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव, सालेकसा, देवरी, सडक-अर्जुनी, गोरेगाव आणि आमगाव या तालुक्यातील २९ केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडील ५८९ क्विंटल धानाचे बियाणे विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामासाठी ४४ हजार ३०० क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. त्यापैकी ७० टक्के बियाणे उपलब्ध झाल्याची माहिती कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे यांंनी दिली. २९ कृषी केंद्राना बियाणे विक्री बंदचे आदेश देण्यात आले असून येत्या २१ दिवसात त्रुट्याची पूर्तता करा. अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. तृट्या पूर्ण करणाऱ्या कृषी केंद्रांना बियाणे विक्री करण्यास मूभा दिली जाणार आहे.अधिकृत केंद्रातूनच खरेदी कराशेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत विक्री परवाना असणाऱ्या कृषी केंद्रांमधूनच बियाण्यांची खरेदी करावी. यासंदर्भात काही गडबड आढळल्यास कृषी विभाग गोंदियाकडे (०७१८२-२५०३९५, ९४२२८३१४३४, ९४२२८३४७१६) संपर्क करावा. कृषी केंद्रांनी नियमानुसार आपल्या दुकानात दरपत्रक लावावे, साठा रजिस्टर ठेवावे आणि विक्री परवान्यातील कंपन्यांची नावे नमूद करावी, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मोहीम अधिकारी अनूप शुक्ला यांनी सांगितले.३० हजार मेट्रीक टन खत उपलब्ध जिल्ह्यातील धान पिकासाठी दरवर्षी ४२ ते ४४ हजार मेट्रीक टन खताची आवश्यकता असते. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३० हजार मेट्रीक टन पर्यंत खताचा साठा उपलब्ध आहे. आवश्यकतेनुसार साठा पुरेपूर असल्याचे सांगण्यात आले.आठ कृषी केंद्राना कारणे दाखवा नोटीसतृट्या आढळलेल्या कृषी केंद्र संचालकांना जिल्हा भरारी पथकाने कारणे दाखवा नोटीस बजावले आहेत. त्यात मेंढे कृषी केंद्र ठाणा, श्रीनाथ कृषी केंद्र ठाणा, श्री कृषी केंद्र साखरीटोला, राज कृषी केंद्र हरदोली, चाहत कृषी केंद्र कवडी, चिखलोंडे कृषी केंद्र नागरा, वैनगंगा कृषी केंद्र मुंडीकोटा, पांडव सहकारी संस्था नवेझरी यांचा समावेश आहे.कारवाईसाठी ९ पथके बोगस बियाणे किंवा खते विक्री करणाऱ्या कृषी केंद्राची तपासणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक व जिल्ह्याच्या ठिकाणी एक असे ९ पथक तयार करण्यात आले आहे. परराज्यातील बियाणांवर बंदी आहे. महाराष्ट्रात महागुजरात, अंकुर सिड्स, बायर्स, न्युजीविडू, वसंत अ‍ॅग्रोटॅक, निर्मल सिड्स असे ३५ कंपन्याचे विविध प्रकारचे वाण जिल्ह्यात विक्री केले जातात.- शेतकऱ्यांना आवाहन४शेतकऱ्यांनी कृषि निविष्ठा (बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके) खरेदी करतांना अधिकृत परवानाधारक कृषि केंद्रातून मान्यता प्राप्त कंपनीचे व वाणाचे बियाणे घ्यावे, बियाणे खरेदी करतांना बॅगवर टॅग लावलेले आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे, बियाणांच्या बॅगवर सिंगल टॅग म्हणजे सत्यदर्शक व डबल टॅग म्हणजे प्रमाणित बियाणे असे असते, बियाणांचे बॅगवर लावलेल्या छापील टॅगवर लॉट नंबर, अंतिम वापर दिनांक व इतर माहिती नमूद आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे, खरेदी केलेल्या कृषि निविष्ठाचे पक्के बिल घ्यावे, बिलामध्ये लॉट नंबर, बॅच नंबर, प्रति नग किंमत नमूद आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे, बियाणांच्या पिशवीसह टॅग व पक्के बिल हंगाम संपेपर्यंत सांभाळून ठेवावे, कृषि निविष्ठाच्या बॅग, कन्टेनरवर छापील किंमत पेक्षा जास्त देऊ नये.