शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

लॉकडाऊनमध्ये परतली सहा राज्यांतून २८३ बालके ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:25 IST

नरेश रहिले गोंदिया : पोट भरण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकंती करणाऱ्या आई-वडिलांसोबत स्थलांतरित होणाऱ्या बालकांचे भविष्य अंधकारमय राहू ...

नरेश रहिले

गोंदिया : पोट भरण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकंती करणाऱ्या आई-वडिलांसोबत स्थलांतरित होणाऱ्या बालकांचे भविष्य अंधकारमय राहू नये यासाठी शासनाने आरटीई कायद्यांतर्गत प्रत्येक मुलाला तो त्याच्या नैतिक अधिकारापासून वंचित राहू नये यासाठी शिक्षणाचा मूलभूत अधिकार कायदा अमलात आणला. या कायद्यांतर्गत ६ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांची वारंवार पाहणी केली जाते. कोरोनाच्या काळात देशातील विविध राज्यांत आई-वडिलांसाेबत कामासाठी इतर राज्यांत गेलेली बालके गोंदिया जिल्ह्यात परतली आहेत.

मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, गुजरात, पंजाब व पश्चिम बंगाल या सहा राज्यांत आई-वडिलांसोबत कामाला गेलेली २८३ बालके लॉकडाऊनच्या काळात गोंदिया जिल्ह्यात परतली. त्या सर्व बालकांचा शोध गोंदिया जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने घेतला. त्या बालकांची नावे शाळेत दाखल आहेत किंवा नाही याची खात्री शिक्षण विभागाने करून घेतली. ज्यांचे नाव शाळेत दाखल नाही अशा बालकांना शाळेत दाखल करून त्यांना शिक्षणाचे हमीपत्र दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, समन्वयक कुलदीपिका बोरकर यांनी स्थलांतरित बालकांच्या हालचालींवर करडी नजर ठेवून लॉकडाऊनच्या काळात किती बालके आली आणि जिल्ह्यातून बाहेर गेली यावर नजर ठेवली.

बॉक्स

सर्वाधिक बालके छत्तीसगडमधून परतली

गोंदिया जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात गोंदिया जिल्ह्यात परतलेल्या बालकांची संख्या २८३ आहे. त्यापैकी २२० बालके छत्तीसगड राज्यातून गोंदियात परतली आहेत. त्यात १२४ मुले व ९६ मुलींचा समावेश आहे. मध्यप्रदेशातून २१ मुले, २७ मुली अशी ४८, तेलंगणामधून ५ मुले, ५ मुली अशी १० बालके, पंजाबमधून मुलगा, मुलगी, पश्चिम बंगालमधून २ मुले जिल्ह्यात परतली आहेत.

बॉक्स

इतर जिल्ह्यातून परतली ६६ बालके

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत असलेली बालके लॉकडाऊनच्या काळात स्थलांतर होऊन गोंदिया जिल्ह्यात परतली. त्यात नागपूर जिल्ह्यातून ३६, यवतमाळ ८, चंद्रपूर ३, भंडारा ९, गडचिराेली ४, पुणे २, अमरावती १, वर्धा ३ बालके स्थलांतरित होऊन गोंदिया जिल्ह्यात आली आहेत.