शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

नक्षलग्रस्त भागात उभारणार २८ टॉवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:15 IST

गोंदिया जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना इंटरनेटच्या सेवेचा लाभ घेता यावा. माहितीचे आदानप्रदान करणे सुलभ व्हावे, नक्षली कारवायांना पायबंद लावण्यास मदत व्हावी, .....

ठळक मुद्देकनेक्टिव्हिटी वाढविणार : २०१२ च्या सर्वेक्षणातील १७ टॉवर सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना इंटरनेटच्या सेवेचा लाभ घेता यावा. माहितीचे आदानप्रदान करणे सुलभ व्हावे, नक्षली कारवायांना पायबंद लावण्यास मदत व्हावी, यासाठी नक्षलग्रस्त भागात तीन आणि जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात १५ मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहेत. तर यापूर्वी शासनाची मंजुरी मिळालेले १० टॉवर लवकरच उभारण्यात येणार आहे.केंद्र व राज्य सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून शहर आणि गावांना जोडण्याचा संकल्प केला आहे. दुर्गम भागात इंटरनेट, मोबाईलची सेवा मिळाल्यास या भागातील नागरिकांची पायपीट थांबेल.कामे वेळेत होण्यास आणि माहितीची आदान प्रदान करण्यास मदत होईल. तसेच नक्षलप्रभावीत भागात नक्षल्यांच्या कारवाया वेळीच हाणून पाडण्यासाठी सुध्दा या मोबाईल टॉवरची मोठी मदत होईल. केंद्र सरकारने कॅशलेसची संकल्पना पुढे आणली. मात्र कॅशलेस व्यवहार करण्यासाठी पाहीजे त्या प्रमाणात साधने उपलब्ध नसल्यामुळे कॅशलेस सेवेला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. शासनाने मोबाईलद्वारे पेटीएमच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन केले. परंतु त्यासाठी पर्याप्त साधने उपलब्ध होत नसल्यामुळे याकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कव्हरेज राहात नसल्यामुळे हा व्यवहार होऊच शकत नाही. पंतप्रधानांनी कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. मात्र, सुविधांअभावी नागरिक कॅशलेस व्यवहार करण्यास असमर्थ ठरत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोबाईलला कव्हरेजच राहात नाही. बहुतांश ठिकाणी मोबाईल टॉवर नाहीत. जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असल्याने शासनाने सन २०१२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार कालीमाटी, कातुर्ली, टाकरी, लोहारा, पाथरी, मुंडीपार, जमाकुडो, फुक्कीमेटा, डवकी, येडमागोंदी, धाबेटेकडी, भरनोली, नवनीतपूर, बिजेपार, लटोरी, सोनेखारी व धानोरी या १७ ठिकाणी टॉवर उभारण्यात आले आहेत. नक्षलग्रस्त भागासाठी १० टॉवरला शासनाने मंजूरी दिली आहे. त्या टॉवरचे काम सुरू करण्यासाठी ई-निवीदा प्रक्रिया झाली आहे. त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. तर १८ नविन टॉवर उभारण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या १८ पैकी ३ टॉवर जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त भागात तर १५ टॉवर सीमा भागात उभारण्यात येणार आहेत. यासंबंधीचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे.