शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलग्रस्त भागात उभारणार २८ टॉवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:15 IST

गोंदिया जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना इंटरनेटच्या सेवेचा लाभ घेता यावा. माहितीचे आदानप्रदान करणे सुलभ व्हावे, नक्षली कारवायांना पायबंद लावण्यास मदत व्हावी, .....

ठळक मुद्देकनेक्टिव्हिटी वाढविणार : २०१२ च्या सर्वेक्षणातील १७ टॉवर सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना इंटरनेटच्या सेवेचा लाभ घेता यावा. माहितीचे आदानप्रदान करणे सुलभ व्हावे, नक्षली कारवायांना पायबंद लावण्यास मदत व्हावी, यासाठी नक्षलग्रस्त भागात तीन आणि जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात १५ मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहेत. तर यापूर्वी शासनाची मंजुरी मिळालेले १० टॉवर लवकरच उभारण्यात येणार आहे.केंद्र व राज्य सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून शहर आणि गावांना जोडण्याचा संकल्प केला आहे. दुर्गम भागात इंटरनेट, मोबाईलची सेवा मिळाल्यास या भागातील नागरिकांची पायपीट थांबेल.कामे वेळेत होण्यास आणि माहितीची आदान प्रदान करण्यास मदत होईल. तसेच नक्षलप्रभावीत भागात नक्षल्यांच्या कारवाया वेळीच हाणून पाडण्यासाठी सुध्दा या मोबाईल टॉवरची मोठी मदत होईल. केंद्र सरकारने कॅशलेसची संकल्पना पुढे आणली. मात्र कॅशलेस व्यवहार करण्यासाठी पाहीजे त्या प्रमाणात साधने उपलब्ध नसल्यामुळे कॅशलेस सेवेला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. शासनाने मोबाईलद्वारे पेटीएमच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन केले. परंतु त्यासाठी पर्याप्त साधने उपलब्ध होत नसल्यामुळे याकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कव्हरेज राहात नसल्यामुळे हा व्यवहार होऊच शकत नाही. पंतप्रधानांनी कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. मात्र, सुविधांअभावी नागरिक कॅशलेस व्यवहार करण्यास असमर्थ ठरत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोबाईलला कव्हरेजच राहात नाही. बहुतांश ठिकाणी मोबाईल टॉवर नाहीत. जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असल्याने शासनाने सन २०१२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार कालीमाटी, कातुर्ली, टाकरी, लोहारा, पाथरी, मुंडीपार, जमाकुडो, फुक्कीमेटा, डवकी, येडमागोंदी, धाबेटेकडी, भरनोली, नवनीतपूर, बिजेपार, लटोरी, सोनेखारी व धानोरी या १७ ठिकाणी टॉवर उभारण्यात आले आहेत. नक्षलग्रस्त भागासाठी १० टॉवरला शासनाने मंजूरी दिली आहे. त्या टॉवरचे काम सुरू करण्यासाठी ई-निवीदा प्रक्रिया झाली आहे. त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. तर १८ नविन टॉवर उभारण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या १८ पैकी ३ टॉवर जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त भागात तर १५ टॉवर सीमा भागात उभारण्यात येणार आहेत. यासंबंधीचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे.