शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

२६२ प्रेमवीरांचे घडविले शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2016 01:47 IST

जातीयवादाला थारा न देता सर्वधर्म समभावाची संकल्पना साकारण्यासाठी जिल्ह्यातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव

नरेश रहिले ल्ल गोंदियाजातीयवादाला थारा न देता सर्वधर्म समभावाची संकल्पना साकारण्यासाठी जिल्ह्यातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी पुढाकार घेतला आहे. ही मोहीम सुरू झाल्यापासून आजपर्यंत समित्यांनी जिल्ह्यात १७० आंतरजातीय तर ९२ प्रेमविवाह घडवून आणले. जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यांतर्गत ५५६ महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या असून या समित्यांनी आंतरजातीय व प्रेमविवाह घडवून आणले. गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ११ आंतरजातीय विवाह घडवून आणले. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ६ आंतरजातीय तर ६ प्रेमविवाह घडवून आणले. रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ३ आंतरजातीय आणि ५ प्रेमविवाह घडवून आणले. तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ९ आंतरजातीय तर ५ प्रेमविवाह घडवून आणले. गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ७ प्रेमविवाह घडवून आणले. दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत तंटामुक्त समित्यांनी ६ आंतरजातीय तर ६ प्रेमविवाह घडवून आणले आहेत.आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ८ आंतरजातीय घडवून आणले. सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ३० आंतरजातीय तर २० प्रेमविवाह घडवून आणले. अविकसित आणि नक्षलग्रस्त असताना सुद्धा या भागात झालेले हे आंतरजातीय विवाह कौतुकास्पद ठरत आहे.गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ११ आंतरजातीय तर ५ प्रेमविवाह घडवून आणले. देवरी पोलीस ठाण्यांतर्गत तंटामुक्त समित्यांनी ८ प्रेमविवाह घडवून आणले. चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ६ आंतरजातीय तर ८ प्रेमविवाह घडवून आणले. अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी १६ आंतरजातीय तर २ प्रेमविवाह घडवून आणला. केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत तंटामुक्त समित्यांनी ४ आंतरजातीय तर ९ प्रेमविवाह घडवून आणले. नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ५ आंतरजातीय तर ७ प्रेमविवाह घडवून आणले. डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत ४९ आंतरजातीय विवाह घडवून आणण्यात तंटामुक्त गाव समित्यांना यश आले आहे.जिल्ह्यात एकूण १७० आंतरजातीय तर ९२ प्रेमविवाह समित्यांनी घडवून आणले. या विवाहांना सुरूवातीला मुलगा व मुलगी यांच्या नातेवाईकांचा तीव्र विरोध असायचा. मात्र तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे समुपदेशन केले आणि कुठे आई-वडिलांच्या संमतीने तर कुठे त्यांच्या विरोधाला न जुमानता सज्ञान प्रेमी युगलांचे विवाह लावून दिले.असे केले सामाजिक कार्य४राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्याबरोबर जातीय सलोखा कायम राखणे, अंधश्रध्दा निर्मूलन करणे, स्त्री भू्रणहत्येवर आळा घालणे, महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणे, वृक्षारोपण करणे व गावाच्या विकासासाठी सण, उत्सव, मेळावे पोलीस बंदोबस्ताशिवाय शांततेत पार पाडणे, महापुरूषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या शांततेत पार पाडण्यासाठी समित्यांनी प्रयत्न केले. इतकेच नाही तर जातीय बंधनांना झुगारून गावात आंतरजातीय विवाहाचा पायंडा तंटामुक्त समित्यांनी घातला.