शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

२६२ प्रेमवीरांचे घडविले शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2016 01:47 IST

जातीयवादाला थारा न देता सर्वधर्म समभावाची संकल्पना साकारण्यासाठी जिल्ह्यातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव

नरेश रहिले ल्ल गोंदियाजातीयवादाला थारा न देता सर्वधर्म समभावाची संकल्पना साकारण्यासाठी जिल्ह्यातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी पुढाकार घेतला आहे. ही मोहीम सुरू झाल्यापासून आजपर्यंत समित्यांनी जिल्ह्यात १७० आंतरजातीय तर ९२ प्रेमविवाह घडवून आणले. जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यांतर्गत ५५६ महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या असून या समित्यांनी आंतरजातीय व प्रेमविवाह घडवून आणले. गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ११ आंतरजातीय विवाह घडवून आणले. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ६ आंतरजातीय तर ६ प्रेमविवाह घडवून आणले. रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ३ आंतरजातीय आणि ५ प्रेमविवाह घडवून आणले. तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ९ आंतरजातीय तर ५ प्रेमविवाह घडवून आणले. गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ७ प्रेमविवाह घडवून आणले. दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत तंटामुक्त समित्यांनी ६ आंतरजातीय तर ६ प्रेमविवाह घडवून आणले आहेत.आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ८ आंतरजातीय घडवून आणले. सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ३० आंतरजातीय तर २० प्रेमविवाह घडवून आणले. अविकसित आणि नक्षलग्रस्त असताना सुद्धा या भागात झालेले हे आंतरजातीय विवाह कौतुकास्पद ठरत आहे.गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ११ आंतरजातीय तर ५ प्रेमविवाह घडवून आणले. देवरी पोलीस ठाण्यांतर्गत तंटामुक्त समित्यांनी ८ प्रेमविवाह घडवून आणले. चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ६ आंतरजातीय तर ८ प्रेमविवाह घडवून आणले. अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी १६ आंतरजातीय तर २ प्रेमविवाह घडवून आणला. केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत तंटामुक्त समित्यांनी ४ आंतरजातीय तर ९ प्रेमविवाह घडवून आणले. नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ५ आंतरजातीय तर ७ प्रेमविवाह घडवून आणले. डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत ४९ आंतरजातीय विवाह घडवून आणण्यात तंटामुक्त गाव समित्यांना यश आले आहे.जिल्ह्यात एकूण १७० आंतरजातीय तर ९२ प्रेमविवाह समित्यांनी घडवून आणले. या विवाहांना सुरूवातीला मुलगा व मुलगी यांच्या नातेवाईकांचा तीव्र विरोध असायचा. मात्र तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे समुपदेशन केले आणि कुठे आई-वडिलांच्या संमतीने तर कुठे त्यांच्या विरोधाला न जुमानता सज्ञान प्रेमी युगलांचे विवाह लावून दिले.असे केले सामाजिक कार्य४राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्याबरोबर जातीय सलोखा कायम राखणे, अंधश्रध्दा निर्मूलन करणे, स्त्री भू्रणहत्येवर आळा घालणे, महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणे, वृक्षारोपण करणे व गावाच्या विकासासाठी सण, उत्सव, मेळावे पोलीस बंदोबस्ताशिवाय शांततेत पार पाडणे, महापुरूषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या शांततेत पार पाडण्यासाठी समित्यांनी प्रयत्न केले. इतकेच नाही तर जातीय बंधनांना झुगारून गावात आंतरजातीय विवाहाचा पायंडा तंटामुक्त समित्यांनी घातला.