शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
2
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
3
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
4
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
5
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
6
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
7
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
8
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
9
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
10
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
11
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
12
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
13
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
14
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
15
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
16
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
17
Mumbai: नवरात्री दांडिया कार्यक्रमात राडा, जमावाकडून तरुणाला मारहाण, गोरेगाव येथील घटना!
18
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
19
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!

२६२ पोलीस कुटुंबांना मिळणार हक्काचा निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:52 IST

दिवसाचे २४ तास शिस्त, गस्त व बंदोबस्त करून नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांना हक्काची वसाहत नसल्याने पोलिसांना आपल्या कुटुंबाला घेऊन भाड्याच्या खोलीत राहावे लागत होते.

ठळक मुद्देपहिल्यांदाच मिळाला निधी : चार ठाण्यातील पोलिसांसाठी १४९ कोटी मंजूर

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवसाचे २४ तास शिस्त, गस्त व बंदोबस्त करून नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांना हक्काची वसाहत नसल्याने पोलिसांना आपल्या कुटुंबाला घेऊन भाड्याच्या खोलीत राहावे लागत होते. आ.गोपालदास अग्रवाल व पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील चार पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना हक्काची वसाहत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून १४९ कोटी रूपये राज्य सरकारने मंजूर केले आहे.जिल्ह्यात १६ पोलीस ठाणे आहेत. २४ तास लोकांचे संरक्षण करणाºया पोलिसांची स्वतंत्र वसाहत बहुतांश ठिकाणी नाही. ज्या ठिकाणी वसाहत आहे. त्या ठिकाणच्या जीर्ण इमारतीतून पाणी गळत होते. नाल्या घाणीने तुंबलेल्या होत्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना त्या क्वार्टरमध्ये राहणे अवघड झाले होते. जोराचा वारा आल्यास छत कधी कोसळून पडेल याचा नेम नव्हता. पोलीस कर्मचाºयांना हक्काची वसाहत असावी, यासाठी मागील अनेक वर्षांपासून आ. अग्रवाल व पोलीस विभागाचा पाठपुरावा सुरू होता. विद्यमान पोलीस अधीक्षक पाटील भुजबळ यांनी पोलीस ठाणे व पोलिसांच्या वसाहतीचा तिढा सोडविण्यासाठी शासन स्तरावर सतत पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शासन दरबारी लावून धरले. त्यामुळे जिल्ह्यातील ४ पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांच्या वसाहतीसाठी व जिथे पोलीस ठाण्याची इमारत नाही. त्यासाठी एकूण १४९ कोटी रूपये मंजूर केले आहे.गोंदिया शहर ठाण्यातील कर्मचाºयांसाठी वसाहत मनोहर चौकात असलेल्या जुन्या पोलीस वसाहतीमध्ये चार-ते पाच मजली इमारत बांधण्यासाठी ५१ कोटी रूपये मंजूर झाले आहेत. या वसाहतीचे काम करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुध्दा करण्यात आली आहे.गोंदिया शहर व रामनगर या दोन पोलीस ठाण्यातील १४० कर्मचाºयांसाठी ही इमारत राहणार आहे. रामनगर पोलीस ठाण्याची चार मजली इमारत व रावणवाडी पोलीस पोलीस ठाण्याची इमारत व रावणवाडीच्या ३८ कर्मचाºयांसाठी ५४ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. सालेकसा पोलीस ठाण्याची प्रशासकीय इमारत व १२ अधिकारी व ७२ कर्मचारी असे ८४ क्वार्टरकरीता ४४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या चारही पोलीस ठाण्यातील २६२ पोलीस कर्मचाºयांना हक्काची वसाहत मिळणार आहे.जमिनीची होती अडचणपोलिसांची वसाहत निर्माण करण्यासाठी जमिनीची अडचण होती. रावणवाडी येथील जमीन वनविभागाची असल्याने तिथे समस्या निर्माण झाली होती. या चारही पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीसाठी आता जमिनीची समस्या मार्गी लागली आहे.फेज-२ मध्ये पुन्हा चार पोलीस ठाणेपहिल्या टप्यात गोंदिया जिल्ह्यातील १६ पैकी ४ पोलीस ठाणे घेण्यात आले. दुसऱ्या टप्यात आमगाव, तिरोडा, अर्जुनी-मोरगाव व नवेगावबांध या चार पोलीस ठाण्याच्या इमारती व कर्मचाऱ्यांच्यासाठी वसाहती निर्माण केल्या जाणार आहेत.त्यासाठी शासन स्तरावर सतत पाठपुरावा सुरू आहे.

टॅग्स :Policeपोलिस