शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

चार विधानसभा क्षेत्रासाठी २६२ उमेदवारी अर्जांची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. सोमवारपर्यंत या चारही मतदारसंघातून एकूण २६२ उमेदवारी अर्जांची उचल करण्यात आली. तर आतापर्यंत केवळ एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देअर्जुनी मोरगाव मतदारसंघात सर्वाधिक उचल : केवळ एक उमेदवारी अर्ज दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. सोमवारपर्यंत या चारही मतदारसंघातून एकूण २६२ उमेदवारी अर्जांची उचल करण्यात आली. तर आतापर्यंत केवळ एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.गोंदिया जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ असून राजकीय घडमोंडीना वेग आला आहे.युती आणि आघाडीने अद्यापही उमेदवार जाहीर केले नाही. त्यामुळे एकाही राजकीय पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रासाठी ४५ जणांनी १०१ अर्जाची उचल केली आहे. तिरोडा विधानसभा क्षेत्रासाठी २३ अर्जाची उचल करण्यात आली आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्रासाठी १०४ अर्जाची उचल करण्यात आली आहे. त्यात एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. आमगाव विधानसभा क्षेत्रासाठी ३४ अर्जाची उचल करण्यात आली आहे. चारही विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारपर्यंत एकूण २६२ अर्जाची उचल करण्यात आली आहे. मतदारसंघनिहाय उमेदवारी अर्जांची उचल करणाऱ्यावर नजर टाकली असता सर्वाधिक अर्जांची उचल अर्जुनी मोरगाव मतदारसंघात तर सर्वात कमी अर्जांची उचल तिरोडा मतदारसंघातून करण्यात आली आहे.शेवटच्या दोन दिवसात होणार गर्दीयुती आणि आघाडीतर्फे जागा वाटपाचे चित्र दोन दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होणार आहे.बहुतेक राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी ३ किंवा ४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासन सुध्दा सज्ज झाले आहे. 

आता उत्सुकता केवळ उमेदवारांचीयुती आणि आघाडीच्या नेत्यांनी जिल्ह्यातील चारही मतदारसंघासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन उमेदवारांच्या याद्या तयार केल्या आहेत. निवडणुकी दरम्यान पक्षात बंडखोरी होऊ नये म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असतांना उमेदवारी जाहीर करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघाचा उमेदवार कोण याचीच आता सर्वांना उत्सुकता लागली आहे.

दिग्गज उमेदवार भरणार शेवटच्या दिवशी अर्जविधानसभा निवडणुकीसाठी ४ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे अधिकृत उमेदवार शेवटच्या दिवशी शक्ती प्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. शक्ती प्रदर्शन करण्यासाठी या तिन्ही पक्षांकडून नियोजन केले जात असल्याचे चित्र आहे.