शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

चार विधानसभा क्षेत्रासाठी २६२ उमेदवारी अर्जांची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. सोमवारपर्यंत या चारही मतदारसंघातून एकूण २६२ उमेदवारी अर्जांची उचल करण्यात आली. तर आतापर्यंत केवळ एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देअर्जुनी मोरगाव मतदारसंघात सर्वाधिक उचल : केवळ एक उमेदवारी अर्ज दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. सोमवारपर्यंत या चारही मतदारसंघातून एकूण २६२ उमेदवारी अर्जांची उचल करण्यात आली. तर आतापर्यंत केवळ एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.गोंदिया जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ असून राजकीय घडमोंडीना वेग आला आहे.युती आणि आघाडीने अद्यापही उमेदवार जाहीर केले नाही. त्यामुळे एकाही राजकीय पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रासाठी ४५ जणांनी १०१ अर्जाची उचल केली आहे. तिरोडा विधानसभा क्षेत्रासाठी २३ अर्जाची उचल करण्यात आली आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्रासाठी १०४ अर्जाची उचल करण्यात आली आहे. त्यात एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. आमगाव विधानसभा क्षेत्रासाठी ३४ अर्जाची उचल करण्यात आली आहे. चारही विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारपर्यंत एकूण २६२ अर्जाची उचल करण्यात आली आहे. मतदारसंघनिहाय उमेदवारी अर्जांची उचल करणाऱ्यावर नजर टाकली असता सर्वाधिक अर्जांची उचल अर्जुनी मोरगाव मतदारसंघात तर सर्वात कमी अर्जांची उचल तिरोडा मतदारसंघातून करण्यात आली आहे.शेवटच्या दोन दिवसात होणार गर्दीयुती आणि आघाडीतर्फे जागा वाटपाचे चित्र दोन दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होणार आहे.बहुतेक राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी ३ किंवा ४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासन सुध्दा सज्ज झाले आहे. 

आता उत्सुकता केवळ उमेदवारांचीयुती आणि आघाडीच्या नेत्यांनी जिल्ह्यातील चारही मतदारसंघासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन उमेदवारांच्या याद्या तयार केल्या आहेत. निवडणुकी दरम्यान पक्षात बंडखोरी होऊ नये म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असतांना उमेदवारी जाहीर करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघाचा उमेदवार कोण याचीच आता सर्वांना उत्सुकता लागली आहे.

दिग्गज उमेदवार भरणार शेवटच्या दिवशी अर्जविधानसभा निवडणुकीसाठी ४ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे अधिकृत उमेदवार शेवटच्या दिवशी शक्ती प्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. शक्ती प्रदर्शन करण्यासाठी या तिन्ही पक्षांकडून नियोजन केले जात असल्याचे चित्र आहे.