शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

चार विधानसभा क्षेत्रासाठी २६२ उमेदवारी अर्जांची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. सोमवारपर्यंत या चारही मतदारसंघातून एकूण २६२ उमेदवारी अर्जांची उचल करण्यात आली. तर आतापर्यंत केवळ एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देअर्जुनी मोरगाव मतदारसंघात सर्वाधिक उचल : केवळ एक उमेदवारी अर्ज दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. सोमवारपर्यंत या चारही मतदारसंघातून एकूण २६२ उमेदवारी अर्जांची उचल करण्यात आली. तर आतापर्यंत केवळ एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.गोंदिया जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ असून राजकीय घडमोंडीना वेग आला आहे.युती आणि आघाडीने अद्यापही उमेदवार जाहीर केले नाही. त्यामुळे एकाही राजकीय पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रासाठी ४५ जणांनी १०१ अर्जाची उचल केली आहे. तिरोडा विधानसभा क्षेत्रासाठी २३ अर्जाची उचल करण्यात आली आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्रासाठी १०४ अर्जाची उचल करण्यात आली आहे. त्यात एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. आमगाव विधानसभा क्षेत्रासाठी ३४ अर्जाची उचल करण्यात आली आहे. चारही विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारपर्यंत एकूण २६२ अर्जाची उचल करण्यात आली आहे. मतदारसंघनिहाय उमेदवारी अर्जांची उचल करणाऱ्यावर नजर टाकली असता सर्वाधिक अर्जांची उचल अर्जुनी मोरगाव मतदारसंघात तर सर्वात कमी अर्जांची उचल तिरोडा मतदारसंघातून करण्यात आली आहे.शेवटच्या दोन दिवसात होणार गर्दीयुती आणि आघाडीतर्फे जागा वाटपाचे चित्र दोन दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होणार आहे.बहुतेक राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी ३ किंवा ४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासन सुध्दा सज्ज झाले आहे. 

आता उत्सुकता केवळ उमेदवारांचीयुती आणि आघाडीच्या नेत्यांनी जिल्ह्यातील चारही मतदारसंघासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन उमेदवारांच्या याद्या तयार केल्या आहेत. निवडणुकी दरम्यान पक्षात बंडखोरी होऊ नये म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असतांना उमेदवारी जाहीर करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघाचा उमेदवार कोण याचीच आता सर्वांना उत्सुकता लागली आहे.

दिग्गज उमेदवार भरणार शेवटच्या दिवशी अर्जविधानसभा निवडणुकीसाठी ४ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे अधिकृत उमेदवार शेवटच्या दिवशी शक्ती प्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. शक्ती प्रदर्शन करण्यासाठी या तिन्ही पक्षांकडून नियोजन केले जात असल्याचे चित्र आहे.