शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

‘ओजस’ शाळेत २५ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:01 IST

विद्यार्थ्यांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शासकीय शाळांना आता चांगले दिवस येऊ लागले. मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग व शालेय शिक्षण विभागाच्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ठळक मुद्देतेजस शाळांचा विचार नाही : शहीद जान्या तिम्यात मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विद्यार्थ्यांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शासकीय शाळांना आता चांगले दिवस येऊ लागले. मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग व शालेय शिक्षण विभागाच्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गोरेगाव येथील शहीद जान्या-तिम्या जि.प.उच्च प्राथमिक शाळेत ‘ओजस’ आंतरराष्ट्रीय शाळा सत्र २०१८-१९ पासून सुरूवात करण्यात येत आहे. २५ विद्यार्थ्यांना नर्सरी ते केजी-२ चे शिक्षण दिले जाणार आहे.आंतरराष्ट्रीय शाळा तयार करण्याच्या पहिल्या टप्यात १३ शाळांची ओजस म्हणून निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय शाळांना महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या आंतरराष्ट्रीय कक्षातून मार्गदर्शन व सहकार्य मिळणार आहे. एक ओजस शाळेच्या अंतर्गत नऊ तेजस आंतरराष्ट्रीय शाळा तयार करण्यात येणार आहे. परंतु या तेजस शाळा संदर्भात विचार करण्यात आला नाही. राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी विदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी पुढाकार घेतला आहे.शाळा लोकसहभागावर चालणारओजस आंतरराष्ट्रीय शाळेची सुरूवात यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून होत आहे. शासनमान्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम राहील. ही शाळा लोकसहभागावर चालणार आहे. या शाळेसाठी राज्यस्तरीय संस्थेकडून चाचणी परीक्षेद्वारे गुणवंत शिक्षकांची निवड केली जाणार आहे. बालकांच्या सर्वांगीण बौद्धीक, शारीरिक व शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाणार आहे.आनंददायी कृतीतून मिळणार शिक्षणशासनमान्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम, दर्जेदार व गुणवत्तायुक्त शिक्षण, प्रशस्त वर्गखोल्या, मोठी पटांगणे, खेळणी साहित्य, तज्ञ महिला शिक्षिका,डिजीटल शिक्षण, वाहतूक व्यवस्था व आनंददायी कृतीतून शिक्षण दिले जाणार आहे.शाळांत भौतिक, शैक्षणिक व मूलभूत सोयी आंतरराष्ट्रीय ओजस शाळेत मिळतील. गोंदिया जिल्ह्यात ओजस शाळा निर्मीतीमुळे शासकीय शाळांमध्ये स्पर्धा निर्माण होईल. त्यासाठी पालकांनी शाळेत नाव दाखल करावे.- उल्हास नरड, प्राथमिक शिक्षणाधिकारी गोंदिया

टॅग्स :Schoolशाळा